शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: मुख्यमंत्र्यांसह, विखे, देशमुख यांचे अर्ज ठरले वैध; निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळले आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 05:55 IST

अर्जाच्या माहितीवर घेतलेले आक्षेपही निवडणूक निर्णय अधिका-यांनी फेटाळून लावून त्यांचे अर्ज वैध ठरविले.

नागपूर/अहमदनगर/सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी वैध ठरविला. प्रतिज्ञापत्रावरील नोटरीच्या मुदतीवर घेण्यात आलेला आक्षेप अधिका-यांनी फेटाळला. याबाबत कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहे. तसेच गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अर्जाच्या माहितीवर घेतलेले आक्षेपही निवडणूक निर्णय अधिका-यांनी फेटाळून लावून त्यांचे अर्ज वैध ठरविले.

काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख, जय जवान जय किसानचे उमेदवार प्रशांत पवार व आम आदमी पार्टीचे उमेदवार अमोल हाडके यांनी शनिवारी अर्ज छाननीवेळी मुख्यमंत्र्यांच्या अर्जाबाबत आक्षेप घेत, तो रद्द करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी अर्जासोबत दाखल केलेल्या नमुना २६ मधील प्रतिज्ञापत्रावरील नोटरीच्या सीलवर २८ डिसेंबर २०१८ ही तारीख नमूद आहे, तर नोटरीच्या शिक्क्यावर ३ आॅक्टोबर २०१९ ही तारीख आहे. त्यामुळे शपथपत्र अवैध आहे, तसेच रामगिरीसारख्या शासकीय बंगल्याची थकबाकी नसल्याचेही नमूद केले आहे. ही माहिती लपविल्याने त्यांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरवावे अशी मागणी विरोधकांनी केली.

निवडणूक निर्णय अधिकारी शेखर घाडगे यांनी सुनावणीनंतर सर्व आक्षेप फेटाळून लावले. अधिका-यांनी संबंधितांना अधिकृत आदेशाची प्रतही दिली. दोन तास चाललेल्या सुनावणीत विरोधकांच्या बाजूने अ‍ॅड. सतीश उके यांनी तर मुख्यमंत्र्यांकडून अ‍ॅड. उदय डबले व अ‍ॅड. रितेश कालरा यांनी बाजू मांडली. मुख्यमंत्र्यांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून संदीप जोशी यांनी सर्व आवश्यक कागदपत्र निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे सादर केले.

राधाकृष्ण विखे यांच्या अर्जावर काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी आक्षेप नोंदविला होता. प्रतिज्ञापत्रावर मारलेल्या शिक्क्याची मुदत कधी संपते, याचा उल्लेख नव्हता, असे त्यांनी सांगितले. नोटरीचे नूतनीकरण हे २०२१ सालापर्यंत आहे, असे सुनावणीत स्पष्ट झाले.सुभाष देशमुख यांनी विनापरवाना घराचे बांधकाम केल्याची तक्रार करताना अपक्ष उमेदवार आप्पाराव कोरे यांनी अर्जावर हरकत घेतली. मात्र, सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, देशमुख यांना दोषी ठरविण्यात आले नसल्याचा युक्तिवाद त्यांच्या बाजूने करण्यात आले. त्यानंतर, हरकत फेटाळून लावण्यात आली.

नांदेड उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डी. पी. सावंत यांनी अर्जासोबत सादर केलेल्या ए व बी फॉर्मवरील नमुना स्वाक्षरीबाबत घेण्यात आलेले आक्षेपही निवडणूक निर्णय अधिकाºयांनी फेटाळले. मात्र, ए व बी फॉर्म न जोडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड मतदारसंघातील उमेदवार प्रशांत शितोळे यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला आहे. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रमेश गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला आहे.एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर मतदार संघातून भाजपकडून अर्ज दाखल केला होता. मात्र, ए व बी फॉर्म न जोडल्याने हा अर्ज बाद झाला. पक्षाने त्यांची कन्या रोहिणी यांना उमेदवारी दिली आहे.६७ मतदारसंघांत ७७७ अर्ज वैध : अर्जांची शनिवारी छाननी झाल्यानंतर मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील ६७ विधानसभा मतदारसंघांत ७७७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेसोबत असलेल्या मित्रपक्षांना भाजपने जागा दाखविली. जागा दाखविली म्हणजे मित्रपक्षांना त्यांच्या उमेदवारांसाठी जागा दिल्या.- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुखआमच्या वाट्याला केवळ सहा जागा आल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यावेळची विधानसभा निवडणूक युतीसाठी अवघड आहे.- रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019nagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम