शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

VIDEO : कारल्याच्या शेतीतून त्यांनी शोधली आर्थिक समृध्दी

By admin | Updated: September 10, 2016 13:17 IST

धानाची शेती सतत तोट्यात येत असल्याने हिंमत न हरता याच शेतीच्या भरवशावर आर्थिक समृध्दीचा मार्ग देसाईगंज तालुक्यातील अनेक गावातील शेतक-यांनी शोधला

पुरूषोत्तम भागडकर, ऑनलाइन लोकमत
देसाईगंज (गडचिरोली), दि. १० - धानाची शेती सतत तोट्यात येत असल्याने हिंमत न हरता याच शेतीच्या भरवशावर आर्थिक समृध्दीचा मार्ग देसाईगंज तालुक्यातील अनेक गावातील शेतक-यांनी शोधला. हा मार्ग शोधताना त्यांनी भाजीपाला वर्गातील कारल्याची शेती सुरू केली व देसाईगंजच्या ग्रामीण भागातील हे कारले नागपूर मार्ग आता दुबईच्या बाजारपेठेत पोहोचले आहे. कारल्याच्या माध्यमातून या शेतक-यांच्या पदरात मोठा आर्थिक लाभ पडला असल्याने या भागातील २० च्या वर शेतकºयांना कारल्याने अच्छे दिन आणले आहे. 
१९८० च्या वनकायद्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात सिंचन प्रकल्प रखडलेले आहे. देसाईगंज हा जिल्ह्याचा जुना तालुका. येथे भंडारा जिल्ह्याच्या इटिया डोह प्रकल्पाचे पाणी काही भागात मिळते. बाकी सर्व भाग पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. अशा विपरित व बिकट परिस्थितीत अनेक वर्षांपासून धानाची शेती करणाºया शेतकºयांच्या शेतीत ‘राम’ उरला नव्हता. कर्जबाजारीपणा, नापिकी, दरवर्षी नैसर्गिक संकट याने पिंजून गेलेल्या शेतकºयांनी भाजीपाला शेतीकडे वळण्याचा निश्चय केला व कारल्याच्या शेतीला पसंती दिली. तालुक्यातील  फरी, एकलपूर, गौरनगर, हरदोली, उसेगाव या भागातील शेतकºयांनी कारले लागवडीला सुरूवात केली. सुरूवातीच्या काळात मालाला व्यापारी मिळत नव्हता. अशा वेळी परिसरातील मोहटोला, किन्हाळा भागात हे कारले विकले जायचे. हळूहळू देसाईगंजच्या रस्त्यावर कारल्यांचा बाजार भरायला सुरूवात झाली. त्यानंतर येथून हळूहळू कारले नागपूरकडे पाठविले जाऊ लागले. त्यानंतर नागपूरच्या व्यापाºयांनी देसाईगंजच्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केले व कारले उत्पादकांकडे मालाची मागणी वाढली. हळूहळू देसाईगंजच्या बाजारात २०-२० किलो कारल्यांच्या पॉलिथीन बॅग तयार करून पॅकींग होऊ लागल्या व हा माल नागपूर मार्ग दुबईच्या शारजा शहरात थेट जाऊ लागला. त्यामुळे कारले उत्पादक शेतकरी सुखावून गेले. त्यानंतर अनेक शेतकºयांनी कारल्यासोबतच दोडके, वांगे, चवळी, वालफल्ली, मिरची याचेही उत्पादन घेण्यास सुरूवात केली. अजून हा माल सातासमुद्रापार पोहोचला नसला तरी त्यालाही भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याचा निश्चय या भागातील शेतकºयांनी व्यक्त केला आहे.
 
पिढीजात भाजी लागवडीचे काम
देसाईगंज तालुक्यात माळी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. फरीसह अनेक गावातील शेतकरी गेल्या तीन पिढ्यांपासून भाजीपाला पिकाची शेती करतात. अत्यल्प जमिनीतूनही सर्व प्रकारचा शेतमाल घेण्याचे कसब त्यांच्या अंगी आहे. त्यामुळे कारल्याचे उत्पादनही त्यांनी अत्यंत भरपूर प्रमाणात येईल, अशी व्यवस्था केली आहे. यासाठी माती परीक्षण, कृषी विभागाचे मार्गदर्शन करून त्यावर फवारणी आदी बाबी ते करीत असतात. या एकूणच कारला उत्पादनाच्या यशोगाथेबद्दल बोलताना  शिवराजपूरचे शेतकरी सिध्दार्थ शंकर भेंडारे सांगत होते. आमची वडिलोपार्जित दोन एकर शेती आहे. दीड एकरात कारले, चवळी, वालफल्ली  याचे उत्पादन घेतो. सिंचनाची सोय नाही. फक्त पावसाळ्यातच ही शेती आपण करतो. अर्धा एकरात धान लावतो. जून ते जानेवारी या कालावधीत ७० हजार रूपयांचे उत्पन्न भाजीपाला पिकाच्या भरवशावर काढतो. तर रामचंद्र मोहुर्ले एकूणच भाजीपाला लागवडीबाबत लोकमतशी बोलताना म्हणाले,  माळी समाजाचे असल्याने वडिलोपार्जित धंदा पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेताच्या बांधावर पूर्वी तूर लावत होतो. जेमतेम आर्थिक उत्पन्न मिळायचे. आता भाजीपाला पिकाकडे वळल्याने थोडाफार फायदा मिळू लागला आहे.
  
भाजीपाल्यावर भरवशावर सिंचनाची सोय केली
फरी गावचे शेतकरी अभिमन भिवा दिघोरे अभिमानाने सांगत होते. दोन हंगामात भाजीपाल्याची शेती करतो. दीड एकर जागेत बोअरवेल खोदली. शेततळे निर्माण केले. भाजीपाल्यासाठी पाल्याची सोय झाली. त्यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन वाढले व आमच्या जीवनात आर्थिक समृध्दीचा नवा मार्ग मिळाला