शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

‘तो’ व्हिडीओ बनावट

By admin | Updated: September 9, 2016 03:00 IST

गणपती विसर्जनादरम्यान कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन डगळे यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याबाबतचा जो व्हिडीओ सध्या सर्वत्र प्रसारित झाला आहे,

कल्याण : गणपती विसर्जनादरम्यान कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन डगळे यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याबाबतचा जो व्हिडीओ सध्या सर्वत्र प्रसारित झाला आहे, त्यामध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप जरीमरी सेवा मंडळाचे सचिव नाना सूर्यवंशी यांनी केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. सूर्यवंशी म्हणाले की, मंगळवारी डगळे यांनीच एका घरगुती गणपती विसर्जनाच्या वेळी तलावाबाहेरील रिक्षाथांब्याजवळ वाजंत्री बंद करायला लावली. त्यानंतर, ढोल फोडले. त्यांना स्वयंसेवकांनी रोखले असता त्या स्वयंसेवकांना व ज्या घरातील तो गणपती होता, त्या व्यक्तीला शिवीगाळ करून दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर, त्यांनीच मुलांना तलावात खेचले. पाण्यात त्या मुलाची स्वत:चा जीव वाचवण्यासाठी त्यांच्याशी झटापट झाली असावी. उर्वरित ३ मुले ते दोघे पाण्यातून बाहेर आल्यानंतर त्यांचे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडली होती. मात्र, त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले गेले. डगळे यांना बुडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा एक व्हिडीओ सध्या सर्वत्र फिरत आहे. मात्र, त्या व्हिडीओत काहीतरी छेडछाड करू न या प्रकरणाला वेगळे वळण देण्यात आले आहे, असा आरोप सूर्यवंशी यांनी केला. आमच्याकडील व्हिडीओमध्ये डगळे हे मुलांना मारताना आणि त्यांनीच त्या मुलांना पाण्यात ढकलल्याचे दिसते आहे.पोलिसांनी अटक केलेल्या त्या चारही मुलांना मंडळातर्फे कायदेशीर मदत दिली जाईल. तसेच मंगळवारच्या घटनेनंतर थांबवण्यात आलेले गणपती विसर्जन करण्याबाबत शुक्रवारी बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. शिवसेनेचा पोलिसांना पाठिंबासध्या पोलिसांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या घटनेबाबत शिवसेना पोलिसांच्या पाठीशी आहे. समाजकंटक आणि कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी मागणी करणारे एक निवेदन गुरु वारी शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यासह किशोर मानकामे, संतोष चव्हाण, प्रकाश तेलगोटे, श्रीराम मिराशी, हेमंत म्हात्रे, महिला पदाधिकारी स्मिता बाबर आदींनी डोंबिवली सहायक पोलीस आयुक्त सूर्यकांत घाडगे यांना दिले. अजून जनता पोलिसांबरोबर आहे. त्यामुळे पोलिसांमध्येही विश्वास निर्माण झाला आहे. जनता व पोलिसांनी एकत्र मिळून आता काम केले पाहिजे. यासाठी राजकीय मंडळींनी पुढाकार घेतला पाहिजे असे या वेळी घाडगे म्हणाले. पोलिसांवर बराच ताण असतो. अशावेळी जर नागरिक आणि पोलिसांत विश्वास असेल तर असे मारहाणीचे प्रसंग घडण्याचे प्रमाणही कमी होईल, असेही ते म्हणाले.