शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- कळव्यात 35 हजार झोपडपट्टीवासीयांचा धडक मोर्चा

By admin | Updated: December 26, 2016 15:11 IST

ऑनलाइन लोकमत ठाणे, दि. 26 -  ठाणे महानगर पालिकेने कळवा प्रभाग समितीच्या अंतर्गत असणाऱ्या झोपड्या पाडण्याचा ठराव पारीत केला ...

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 26 -  ठाणे महानगर पालिकेने कळवा प्रभाग समितीच्या अंतर्गत असणाऱ्या झोपड्या पाडण्याचा ठराव पारीत केला आहे. या ठरावाच्या निषेधार्थ सुमारे 35 हजार झोपडीधारकांनी आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा नाका येथे मोर्चा नेला. दरम्यान, यावेळी आ. आव्हाड यांनी शिवसेना- भाजपवर टीका केली. या सत्ताधाऱ्यांना ठाण्याचे स्मशान करायचे आहे. 
 
पण, लक्षात ठेवा या सुंदर स्मशानात सेना- भाजपची चित्ता ठाणेकरच रचतील, असा इशारा यावेळी आ. आव्हाड यांनी दिला. ठाणे महानगर पालिकेने ठाण्यातील झोपड्यांवर कारवाई करण्याचा निऱ्णय घेतला असता, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अधिवेशनामध्ये आवाज उठवून या कारवाईला स्थगिती मिळवली होती. मात्र, महासभेमध्ये सेना- भाजपने ठराव करुन सदर झोपड्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
त्याच्या निषेधार्थ सोमवारी हा मोर्चा काढण्यात आला. मनिषा नगर, जानकी नगर, खारीगाव, घोळाई नगर, आतकोनेश्वर नगर आदी भागातील सुमारे 35 हजार नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मनिषा नगरमधून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामुळे नवी मुंबई आणि रेतीबंदरकडे जाणारी वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. यावेळी आ. आव्हाड यांनी पालिका प्रशासनावर टीका केली. 
2000 पर्यंतच्या झोपडयांना अभय देण्याचा कायदा असतानाही 80 वर्षांपूर्वीच्या झोपडया पाडण्याचा घाट घातला आहे.
 
शहर सुंदर करण्याच्या नादात प्रशासकीय अधिकारी आणि सत्ताधारी लोकांना बेघर करीत आहेत. या सत्ताधाऱ्यांनी सौंदर्याची व्याख्या काय केली आहे, हे सांगणे अवघड आहे. बायकोच्या गालावर मुरुम आला तर सुंदर बायकोला घटस्फोट देण्याचाच हा प्रकार आहे. मात्र, या भागातील डकही झोपडी तोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावरच उतरु; हे शहर आमच्या घामाने सजले आहे.   
 
त्यामुळे जर गोरगरीबांना बेघर केले. तर, हे गोगरीब बंड करतील  आणि त्यातून हे सत्ताधारी नगरसेवक माजी नगरसेवक म्हणून गणले जातील. झोपडया पाडून आयुक्त जयस्वाल, ठराव मांडणारे भाजपचे मिलींद पाटणकर आणि अनुमोदन देणाऱ्या सेनेच्या अनिता गौरी यांना या शहराचे सुंदर स्मशानात रुपांतर करायचे आहे. पण, त्यांनी लक्षात ठेवावे; या स्मशानात सेना- भाजपची चिता रचल्याशिवाय हा गरीब माणूस स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला. 
 
या वेळी हजारो झोपडीधारकांसह मनोहर साळवी, मिलींद पाटील, मनाली पाटील, अपर्णा साळवी, महेशश साळवी, रिटा यादव, अक्षय ठाकूर, मुकूद केणी, प्रमिला केणी आदी मान्यवर उपथित होते. 

(छायाचित्र- विशाल हळदे)