शहरं
Join us  
Trending Stories
1
कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर
2
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
3
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
4
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
5
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
6
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
7
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  
8
४ ग्रह, ४ राजयोग: १० राशींवर लक्ष्मी प्रसन्न, भरघोस भरभराट; बक्कळ पैसा, बंपर लाभ, वरदान काळ!
9
धक्कादायक! गाण्याचा आवाज कमी करायला सांगितल्याने पती चिडला, पत्नीवर फेकले टॉयलेट क्लीनर
10
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
11
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
12
बुलेट ट्रेनचं देशातील पहिलं रेल्वे स्टेशन बांधून तयार, या दोन स्थानकांदरम्यान धावणार पहिली ट्रेन
13
Somavati Amavasya 2025: पितरांच्या फोटोची जागा तर अयोग्य नाही? सोमवती अमवास्येला करा बदल!
14
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
15
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 
16
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
17
Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?
18
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
19
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
20
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार

VIDEO- राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना मारहाण

By admin | Updated: April 17, 2017 17:57 IST

राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 17 - राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबादमधील सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये आज दुपारी गायकवाडांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांनी रत्नाकर गायकवाड यांना मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मारहाणीत गायकवाडांच्या छातीला दुखापत झाल्याचंही समजतं आहे. मुंबईतील आंबेडकर भवन पाडकामाच्या रागातून रत्नाकर गायकवाड यांना मारहाण केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. गायकवाड यांना मारहाण करीत असताना पत्नी सोडवण्यासाठी मध्ये गेली असता त्यांनाही मारहाण झाली आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी दोन महिला आणि चार पुरुष कार्यकर्त्यांना अटक केली आहे. गायकवाडांना संतापातून मारहाण करण्यात आल्याचं वक्तव्य आनंदराज आंबेडकरांनी केलं आहे. तर प्रकाश आंबेडकरांनी या मारहाणीच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. रत्नाकर गायकवाड यांच्यावर अमित भुईगड, श्रीरंग ससाणे, शांताबाई धुळे, दिनेश साळवे, गौतम गवळी, रेखाबाई उजागरे यांनी हल्ला केला असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.  (रत्नाकर गायकवाड यांना अटक करा)तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले आणि त्यांच्या चळवळीचे केंद्र राहिलेले आंबेडकर भवन आणि बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस, मुंबई 25 जून 2016 रोजी रात्री 2 वाजता रत्नाकर गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांनी पाडली होती. त्यानंतर रत्नाकर गायकवाडांविरोधात बौद्ध अनुयायांचा संताप उफाळून आला होता. त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी करणारे निवेदन सत्यशोधक समाज जिल्हा चंद्रपूरतर्फे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले होते. सरकार एकीकडे कोटी रुपये खर्च करून डॉ. आंबेडकरांच्या संबंधित वास्तू आणि ठिकाणाची स्मारके बनवित असताना त्यांनी ज्या बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस आणि आंबेडकर भवनमधून बहुजनांसाठी ऐतिहासिक चळवळ चालविली. तीन- तीन वृत्तपत्रे काढली, ती वास्तूच रत्नाकर गायकवाड व त्यांच्या साथीदारानी जमीनदोस्त केली. त्यामुळे देशातील करोडो जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यासाठी सरकारने त्यांना त्वरित अटक करावी. अन्यथा राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू शकतो, असा इशारा सत्यशोधक समाजाने दिला आहे. सरकार एकीकडे करोडो रुपये खर्च करुन डॉ. आंबेडकरांच्या संबंधित वास्तू आणि ठिकाणाची स्मारके बनवित असताना त्यांनी ज्या बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस व आंबेडकर भवनमधून बहुजनांसाठी ऐतिहासिक चळवळ चालविली. तीन- तीन वृत्तपत्रे काढली, ती वास्तूच रत्नाकर गायकवाड व त्यांच्या साथीदारानी जमीनदोस्त केली. त्यामुळे देशातील करोडो जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यासाठी सरकारने त्यांना त्वरित अटक करावी. अन्यथा राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते, असा इशारा सत्यशोधक समाजाने दिला होता.(रत्नाकर गायकवाड यांना तत्काळ अटक करा)गेल्या काही दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ऐतिहासिक वास्तूमधून बहुजन समाजाची स्वाभिमानी चळवळ चालविली तसेच बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमधून जनता, प्रबुद्ध भारत, मूकनायक, अशी नियतकालिके काढली, तीच वास्तू उद्ध्वस्त करण्यात आली आहे. त्यामुळे एक प्रकारे हा बाबासाहेबांच्या चळवळीवर चढविलेला हल्ला आहे. हे कृत्य करणाऱ्या रत्नाकर गायकवाड़ व त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करीत सिंधुदुर्गातील आंबेडकरप्रेमी जनतेने 8 जुलै रोजी कणकवली शहरातून प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.