शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय"; कार्यकर्त्यांच्या हाणामारीवरुन CM फडणवीस भडकले
2
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
3
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
4
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
5
IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर या दिग्गजांनी काढली जड्डूची चूक; आता गंभीर म्हणाला...
6
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
7
जगातला एकमेव अनोखा देश, 'या' देशाला राजधानीच नाही! तुम्हाला माहितीये का?
8
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
9
महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा
10
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
11
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
12
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
13
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ
14
हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
15
Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 
16
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा
17
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
18
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
19
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
20
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!

VIDEO : वाशिम जिल्ह्यातील अनेक गावांत उघड्यावर होतात अंत्यसंस्कार!

By admin | Updated: October 7, 2016 14:31 IST

वाशिम जिल्ह्यांतील अनेक गावांमध्ये सुसज्ज स्मशानभूमी तर सोडाच; पण मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाटी साधी टिनशेडही नाही.

सुनील काकडे, ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ७ -  जिल्ह्यातील ७९२ गावांपैकी अधिकांश गावांमध्ये अद्याप सुसज्ज स्मशानभूमी तर सोडाच; पण मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी साधे ‘टिनशेड’ देखील उभारले गेलेले नाही. परिणामी, विकासाच्या वाटा धूसर झालेल्या संबंधित गावांमधील ग्रामस्थांना उघड्यावरच अंत्यसंस्कार उरकावे लागत आहेत. 
 
महाराष्ट्रातील अनेक बडी शहरे सद्या ‘मेट्रो सिटी’च्या नावाने ओळखल्या जावू लागली आहेत. मात्र, वाशिमसारख्या मागासलेल्या जिल्ह्यांच्या विकासाकडे शासनकर्त्यांचे अद्याप पुरेसे लक्ष नसल्याची बाब अविकसीत खेड्यांकडे वळल्यानंतर प्रकर्षाने अधोरेखीत होते. ४९१ ग्रामपंचायती आणि ७९२ गावे मिळून १ जुलै १९९८ मध्ये नव्याने उदयास आलेल्या वाशिम जिल्ह्यातील खेड्यांमध्ये वास्तव्य करणारे नागरिक आजही सर्वांगीण विकासापासून कोसोदूर आहेत. 
 
जीवन जगत असताना विविध समस्यांचा धैर्याने सामना करणाºयांची किमान मृत्यूनंतर तरी अवहेलना व्हायला नको, यासाठी प्रत्येक ठिकाणी ‘टिनशेड’, बैठक व्यवस्थेसह सुसज्ज स्मशानभूमी असायला हवी. मात्र, जिल्ह्यातील अधिकांश गावांमध्ये सुसज्ज स्मशानभूमीची व्यवस्था नसल्यामुळे ग्रामस्थांना उघड्यावरच अंत्यविधी उरकावा लागतो. उन्हाळा आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हा प्रकार चालूनही जातो. मात्र, पावसाळ्याच्या दिवसांत धो-धो पाऊस कोसळत असताना अशाच बिकट परिस्थितीत मृतदेहांना अग्नी द्यावा लागतो. तथापि, प्रशासकीय उदासिनतेमुळे मृतदेहांची अशाप्रकारे विटंबना होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे.