शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

VIDEO : महाराष्ट्राचे राजवस्त्र पैठणीला लागली उतरती कळा...

By admin | Updated: July 25, 2016 14:43 IST

येवला शहराची आर्थिक बाजारपेठ अवलंबून असणा-या पैठणीला सध्या उतरती कळा लागली आहे.

विणकर चिंतेत : रेशमाचे भाव वाढले ; पैठणीचे दर घसरले.दत्ता महाले

ऑनलाइन लोकमत

येवला (नाशिक), दि. २५ -  येवला शहराची आर्थिक बाजारपेठ अवलंबून असणा-या पैठणीला सध्या उतरती कळा लागली असून, ऐन दुष्काळात तेरावा महिना म्हणून गेल्या सहा ते सात महिन्यात रेशमाचे भाव १००० ते १२०० रुपयाने वाढले आहेत. त्यामुळे सिंगल व डबल पदर रेशमी पैठणीचे भाव १००० रुपयांनी घसरल्याने विणकरांची चिंता वाढली आहे.शेतक-याच्या कांद्याला अडतीचा दांडू अडवा आला आणि कांद्याचा वांधा झाल्याने शेतकरी अडचणीत आले. तशीच परिस्थिती येवल्याच्या पैठणी बाबत सध्या झाली आहे. शहराची मुख्य बाजारपेठ ही कांदा व पैठणीवर अवलंबून आहे. पैठणीची घसरण सुरु झाल्याने आता शहराच्या बाजारपेठेवर त्याचा परिणाम जाणवत असून बाजारपेठ मंदावली आहे. जानेवारी महिन्यामध्ये अडवाण रेशमाचे भाव २३०० रुपये किलो होते, तर उभार रेशीम २८०० रुपये किलो होते. त्यादरम्यान सिंगल पदरी पैठणीला ५००० रुपये भाव मिळत होता. तर डबल पदराला ५५०० रु पये भाव मिळत होता. वर्षाची सुरुवात चांगली झाली होती.

घरी एक अथवा दोन हातमाग असणारांचे बरे चालले होते. परंतु गेल्या सहा  महिन्यात येवल्याच्या पैठणीला उतरती कळा लागली असल्याचे विणकरांचे म्हणणे आहे. जुलै महिन्यात अडवाण रेशमाचे भाव ३५०० रुपये प्रती किलो झाले तर उभार रेशीम ३७०० रुपये प्रती किलो एवढे वाढले होते. आणि सध्या पैठणीच्या विक्री किमतीला घसरण लागली असून, सिंगल पदरी पैठणीला ४३०० रुपये भाव मिळत असून डबल पदरी पैठणीला ४८०० रुपये भाव मिळत आहे. पैठणीच्या बाबत मंदीचे सावट नेमके नैसर्गिक आहे की कृत्रिम याबाबत कारागीर चर्चा करीत आहे.  सिंगल पदर पैठणी तयार करण्यासाठी किमान पाच ते सहा दिवस लागतात. परंतु सध्या आठवडाभर काम करूनही केवळ ५०० ते ६०० रुपये पदरी पडत असल्याने विणकर मंदीच्या सावटामुळे निराश झाला आहे.

भाव घसरल्याने कामाचा वेगदेखील कमी झाला आहे. विणकर सरासरी दिवसाला ८ ते १० तास काम करतो मात्र पैठणीच्या भावातील घसरणीमुळे काम करूनही पैसा दिसत नसल्याने दिवसभरात चार ते पाच तास काम विणकर करत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या मालाला उठाव नसल्याने पैठणी विणकराकडून खरेदी करणे देखील व्यापा-यांनी कमी केले आहे. एक अथवा दोन हातमाग असणारे विणकर व पन्नास ते शंभर पैठणीचे नग सांभाळण्याची क्षमता नसलेल्या विणकराना या मंदीचा फटका मोठ्या प्रमाणवर बसत आहे. पुणे, मुंबई शहरात व्यापा-यांना पैठणी विकली तर भाव मिळतो. परंतु दोन चार पैठणीचे नग विक्रीसाठी घेऊन जाणे सर्वसामान्य विणकराला परवडत नाही.  त्यामुळे तयार नग हे गावातच कमी भावात विकण्याशिवाय पर्याय नाही. स्थानिक व्यापारी बाजार पेठेतील उठाव पाहूनच भाव ठरवतात. सर्वसामान्य पैठणी उत्पादक विणकर व मजूर यांच्यात एकवाक्यता नसल्याने पैठणीचे व्यापारी कमी अधिक दराने पैठणी खरेदी करत असतात. शिवाय आठवडा भर पैठणीचा नग तयार करून त्यात जर काही चूक निघाली तर पुन्हा ४०० ते ५०० रुपयाने नगाचा भाव घसरतो. सध्या जेमतेम रोजीरोटी कशी बशी भागविण्याची परिस्थिती सर्वसामान्य विणकर व मजुरावर आलेली आहे.

केंद्र सरकारने रास्त भावात रेशीम उपलब्ध करून देण्यासाठी स्थानीक पातळीवर किमान चार ते पाच केंद्र सुरु करावे. महिलांचे राजवस्त्र म्हणून कागदावर पैठणीला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली असली तरी सध्या पैठणीची कलाकुसर तयार करणार्या सर्वसामान्य विणकराना सक्रीय कृतियुक्त दिलासा विविध योजना राबवून देण्याची गरज आहे. 400 वर्षाच्या प्रदीर्घ प्रवास करणारी पैठणी मोठमोठ्या समारभव फॅॅशन शो मधून झळकत असली तरी या पैठणी व्यवसायाला घरघर लागली असून हवा तसा राजाश्रय मिळत नसल्याने पैठणीचे अर्थकारण सर्वसामान्य विणकराला अधोगतीकडे नेत आहे.

तळागाळातील विणकराना उर्जितावस्था आणण्यासाठी शासनाने अनुदानावर रेशीम द्यावे. पैठणीची खरेदी योग्य भावात व्यापा-यांनी करावी. वाढलेल्या वीजिबलामुळे विणकरांचे कंबरडे मोडले गेले आहे. पैठणी विणकरांसाठी अल्प दराने वीज पुरवठा करावा  - कार्तिक दत्तात्रय मुंगीकर, पैठणी विणकर,येवला.