शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

VIDEO : जीर्ण पूल देतोय अपघातास निमंत्रण

By admin | Updated: September 23, 2016 18:47 IST

जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे आणि मोठी वाहतूक असलेले पूल नादुरुस्त आहेत. यामध्ये मंगरुळपीर येथील अरूणावती नदीवरच्या पुलाचा समावेश आहे. जीर्ण झालेल्या या पुलावरून

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 23 - जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे आणि मोठी वाहतूक असलेले पूल नादुरुस्त आहेत. यामध्ये मंगरुळपीर येथील अरूणावती नदीवरच्या पुलाचा समावेश आहे. जीर्ण झालेल्या या पुलावरून दिवसाला शेकडो वाहने धावत असतात. अशात एखादवेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 
मंगरुळपीर येथील अरुणावती नदीचे उन्हाळ्यातच लोकसहभागातून खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले. याचा चांगला परिणाम पाहायला मिळत असून, पावसाळा संपण्यापूर्वीच कोरड्या होणाºया या नदीच्या पात्रात आता सात ते आठ फुट खोल पाणी सतत वाहताना दिसते. या नदीवर मंगरुळपीर आणि मानोरा मार्गावर जवळपास शतकभरापूर्वी एक पूल बांधण्यात आला आहे. या पुलासवरून अकोला, दिग्रस, यवतमाळ, पुसद अशा मोठ्या शहरांसाठी सतत बसगाड्या, ट्रक आणि इतर वाहनांची वाहतूक सुरू असते. हा पूल जीर्ण झाला आहे. या पुलाचे कठडे तुटून हा पुल अगदी मोकळा झाला आहे. त्याशिवास पुलाचे नदीपात्रातील खांब खोलवर उघडे पडले आहेत. त्यामुळे एखादवेळी पाण्याचा प्रवाह वाढून हा पुल तुटण्याची शक्यता आहे. अशावेळी पुलावरून एखादे मोठे प्रवासी वाहन धावत असल्यास मोठा अपघात घडून जिवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पुलाची तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यक झाले आहे. याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यायला हवी.