शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

VIDEO : नाशिकमध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस, शेतक-यांचं प्रचंड नुकसान

By admin | Updated: April 30, 2017 16:39 IST

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 30 - नाशिकमधील सटाणा तालुक्यात अनेक गावात वादळी वा-यासहीत अवकाळी पाऊस व गारपीटदेखील झाली. चांदवड, ...

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 30 - नाशिकमधील सटाणा तालुक्यात अनेक गावात वादळी वा-यासहीत अवकाळी पाऊस व गारपीटदेखील झाली. चांदवड, मालेगाव, अंबासन, आसखेडासह अन्य गावांमध्ये वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे शेतक-यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. 
 
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे द्राक्ष, डाळिंब, कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आर्थिक नुकसानीत अधिक भर पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. 
 
दरम्यान, शनिवारी सांगली व मराठवाड्यातील लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी भागाला गारपिटीचा तडाखा बसला. विजांच्या कडकडाटात, वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने परिसराला अक्षरक्ष: झोडपून काढले.
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले, तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांची मापाविना बाजार समितीत पडून असलेली हजारो क्विंटल तूर भिजली. 
 
लातूर आणि बीड जिल्ह्यातील अनेक गावांना या पावसाचा तडाखा बसला. यामुळे आंबा तसेच द्राक्ष बागांचे नुकसान झाले. बीड जिल्ह्यात चौसाळ्यासह हिंगणी खुर्द व बुद्रुक परिसरात पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी तयार करुन ठेवलेल्या ज्वारी खळ्यांचे नुकसान झाले. उस्मानाबाद जिल्ह्यात वीज पडून तीन दुभती जनावरे दगावली.  
 
हजारो क्विंटल तूर भिजली
मराठवाड्यातील लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात गारपिट झाली. चाकूर, जळकोट आणि जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली हजारो क्विंटल तूर या पावसामुळे भिजली़ गेल्या अनेक दिवसांपासून बाजार समितीच्या आवारात ही तूर मापाविना पडून होती, परिणामी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
 
(कोकणात अवकाळी पावसाची शक्यता)
तर दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तापमानात सातत्याने वाढ होताना पाहायला मिळतेय. मात्र या वाढत्या तापमानातून कोकणवासीयांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. उन्हाच्या काहिलीनं राज्य होरपळत असताना येत्या 24 तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात अवकाळी पावसाचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. राज्यात सर्वत्र उन्हाच्या प्रचंड तडाख्यानं लोकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. तर महाराष्ट्रात उष्माघातानं आतापर्यंत 11 बळी गेल्याचंही समोर आलं आहे.
 
महाबळेश्वर आणि रत्नागिरीत कमाल तापमान 34 अंशांपर्यंत नोंदवलं गेलं आहे. भीरा येथे तापमान पुन्हा 43 अंशांपर्यंत गेलं आहे, तर विदर्भातल्या अकोल्यातही 43, अमरावती 40, ब्रह्मपुरी 45, बुलडाणा 39, चंद्रपूर 44, नागपूर आणि वर्धा येथे 43, यवतमाळमध्ये 42 अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवलं गेलं आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात येत्या काळात उष्मा आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील तापमानात मोठी वाढ नोंदवली गेली असली तरी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पुढील 24 तासांत गडगडाटासह पावसाच्या सरींची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे.
 

https://www.dailymotion.com/video/x844wlk