शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

VIDEO : कोल्हापूरमध्ये उडाली भातकापणीची धांदल

By admin | Updated: October 20, 2016 13:26 IST

सध्या ग्रामीण भागात खरीप काढणीची एकच धांदल उडाली आहे

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. २० -  सध्या ग्रामीण भागात खरीप काढणीची एकच धांदल उडाली आहे. परतीच्या पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने बळिराजाची धावपळ उडाली असून शिवारं माणसांनी अक्षरश: फुलली आहेत. भात, भुईमुगाची चांगली वाढ झाली असून पिकांना चांगला उतारा मिळत असून, भाताचे गुंठ्याला दीड पोत्याचे उत्पादन होत आहे. 
गेल्या वर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप पिके करपून गेली होती. खरीप पिकांना झटका बसल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले होते. त्यानंतर पुरेशा पावसाअभावी रब्बीचा हंगामही वाया गेला. जानेवारीनंतर तर पाणीकपातीने शेतकरी कासावीस झाला आणि अशा परिस्थितीत त्याने खरिपाची पेरणी केली. पण जूनपासूनच मान्सूनने दमदार हजेरी लावली. जून ते आॅगस्टपर्यंत एकसारखा पाऊस राहिल्याने भात, भुईमूग पिकांची वाढ जोमात झाली. भाताला पोषक असाच पाऊस राहिल्याने किडीचा प्रादुर्भाव अजिबात झाला नसल्याने पिकांची जोमदार वाढ झाली. 
गेल्या आठ-दहा दिवसांपासून भात, भुईमूग, सोयाबीन काढणीस सुरुवात झाली आहे. दसºयात परतीच्या पावसाने रोज हजेरी लावण्यास सुरुवात केल्याने काढणीत अडथळा निर्माण झाला होता. गेले काही दिवस पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने भातकापणीची एकच धांदल उडाली आहे. दिवाळी तोंडावर असल्याने तत्पूर्वी भातकापणी पूर्ण करण्यासाठी शेतक-यांनी गडबड सुरू आहे. पोषक वातावरण राहिल्याने भाताचे उत्पादन चांगले मिळत आहे. शेतकºयाच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘माती मळल्यासारखे भात मळले जात आहे.’ भाताचा गुंठ्याला दीड  पोत्याचा उतारा मिळत आहे.  गेल्यावर्षीच्या दुष्काळाची भरपाई यावर्षी निघेल असे शेतक-यांचे मत आहे.