शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

VIDEO : गणेश उत्सव तलावांसाठी ठरतोय कर्दनकाळ, निर्माल्यामुळे तलावांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: September 8, 2016 12:21 IST

तलावाचे शहर म्हणून बुलडाणा शहरातचा इंग्रज काळापासून नावलौकिक आहे. शहर परिसरातील सात तलावांचा ऐतिहासिक वारसा जपता जपता सध्या शहरात केवळ तीन तलावांचे अस्तित्व शिल्लक आहे.

नीलेश शहाकार, ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. ८ -  तलावाचे शहर म्हणून बुलडाणा शहरातचा इंग्रज काळापासून नावलौकिक आहे. शहर परिसरातील सात तलावांचा ऐतिहासिक वारसा जपता जपता सध्या शहरात केवळ तीन तलावांचे अस्तित्व शिल्लक आहे. परंतु याही तलावांच्या वैभवाला आता प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. सणासुदीच्या या दिवसांमध्ये देवपुजेचे निर्माल्य नागरिकांकडून बेधडकपणे शहरातील तलावांमध्ये फेकले जात आहे. यामुळे तलाव प्रदूषित होवून पर्यावरणास धोका निर्माण होत आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे शहरातील तार तलाव, लेंडी तलाव केंव्हाचेच नामशेष झाले आहेत. त्यातच इंग्रजकाळात शहराला पाणी पुरवठा करणाया संगम तलावाला निर्माल्य, घरकुती कचरा व पाणपर्णी वनस्पतीने विळखा घातला आहे.त्यामुळे तलावाच्या काठशेजारी कचºयाचे ढिगारे साचलले दिसतात. त्यामुळे लवकर या समस्येकडे लक्ष न दिल्यास भविष्यात बुलडाणा- औरंगाबाद मार्गावरील संगम तलाव नामशेष होण्याची शक्यता निर्माण होवून शकते. इंग्रजांनी १८६७ साली थंड हवेच्या बुलडाणा शहराला जिल्ह्याचा दर्जा प्राप्त करून दिला होता.त्यावेळी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी शहराच्या चारही बाजुला तलावाची निर्मिती करण्यात आली होती. त्यामध्ये संगम तलाव, तार तलाव, लेंडी तलाव व सरकारी तलाव यांचा समावेश आहे. कितीतरी वर्षे शहराला संगम तलावातून पाणी पुरवठा करण्यात येत होता.  तर लेंडी तलाव व तार तलाव यांचा वापरासाठी व कपडे धुण्यासाठी वापर करण्यात येत होता. स्वातंत्र्यानंतर या चारही तलावाला अवकळा प्राप्त झाली आहे. स्थानिक प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तार तलाव व लेंडी तलाव केव्हाचेच नामशेष झाले आहेत. तर आता इंग्रजकालीन पाणी पुरवठा करणा-या संगम तलावाचे व सरकारी तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याबाबत आता नागरिकांनी जागृक होण्याची गरज आहे. परिसर स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे  संगम तलावाचे सौंदर्य वाढविण्यासाठी आता विशेष लक्ष देत, प्रशासनाकडून येथे नागरिकांच्या सोईसाठी येथे ‘वॉकिंग ट्रैक’ तयार करण्याचे काम सुरु आहे. मात्र प्रशासनाचे तलावातील अस्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. तलाव प्रदूषित होण्याला सर्वात मोठे कारण गणेश उत्सवात मूर्ती विसर्जन, निर्माल्य, कचरा तलावात फेकण्याचे आहे.⁠⁠⁠⁠