शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
2
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
3
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
4
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
5
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
6
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
7
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
8
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
9
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
10
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
11
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
12
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
13
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
14
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
15
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
16
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
17
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
18
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
19
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
20
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता

VIDEO- शेतीच्या मालासाठी शेतकऱ्यांचे वाहन ठरते गाढव!

By admin | Updated: September 1, 2016 19:13 IST

शेतातून शेतमाल घरी आणण्यासाठी शेतकरी बैलबंडी, ट्रॅक्टर व अन्य साधनांचा वापर करतात.

गोवर्धन गावंडे/ऑनलाइन लोकमत

हिवरखेड, दि. 1 - शेतातून शेतमाल घरी आणण्यासाठी शेतकरी बैलबंडी, ट्रॅक्टर व अन्य साधनांचा वापर करतात. परंतु, हिवरखेड येथील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून शेतमाल आणण्यासाठी स्वातंत्र्य काळापासून चांगला रस्ता नसल्यामुळे आजही शेतातून शेतमाल घरी आणण्यासाठी गाढवांचा उपयोग करावा लागतो.

हिवरखेड परिसरातील मुंजावार हा रस्ता पावसाळ्यामध्ये चार महिने चिखलयुक्त असतो. त्या रस्त्याने पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना बियाणे, खते न्यावे लागतात. तसेच पीक आल्यानंतर मूग, उडीद, ज्वारी, सोयाबीन आदी पिके घरी आणण्यासाठी वा शेतात नेण्यासाठी मागील ५० वर्षांपासून गाढवाचा वाहन म्हणून उपयोग करावा लागतो. शेती रस्त्यावर बैलबंडी वा ट्रॅक्टरचा उपयोग होत नाही. या परिसरात १०० हेक्टर शेती असून, संबंधित शेतकऱ्यांना पेरणीपासून तर शेतमाल घरी आणण्यासाठी जून ते सप्टेंबरपर्यंत गाढवांचा उपयोग करावा लागतो.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरसुद्धा ही परिस्थिती बदलेली नाही. मागील कित्येक वर्षांपासून या परिसरातील शेतकऱ्यांना विविध कार्यालयाच्या चकरा मारून त्यांच्या हाती फक्त निराशा आली. तरी या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना वनवासातून मुक्त करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. या परिसरातील शेतकऱ्यांनी कागदपत्राची पूर्तता करूनसुद्धा त्याचा काहीच फायदा झालेला नाही. पाणी-पाऊस वाढल्यास शेतकऱ्यांचा शेतातील माल पावसात भिजतो व खराब होतो. त्याला त्याचा योग्य भाव मिळत नसल्याचे एकंदरित चित्र पहावयास मिळत आहे.