शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : शिक्षणातून घडणारी संस्कृतीच करेल देशाचे संरक्षण- राज्यपाल

By admin | Updated: October 24, 2016 17:19 IST

आज समाजात आणि देशात असुरक्षीततेची भावना व्यक्त होत आहे, गावाची आणि देशाची सुरक्षीतता संवेदनशील बनली आहे. अत्यंत प्रगल्भ सांस्कृतिक वारसा असलेला हा देश सतराव्या शतकापर्यंत जगाला मार्गदर्शक होता.

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 24 -  आज समाजात आणि देशात असुरक्षीततेची भावना व्यक्त होत आहे, गावाची आणि देशाची सुरक्षीतता संवेदनशील बनली आहे. अत्यंत प्रगल्भ सांस्कृतिक वारसा असलेला हा देश सतराव्या शतकापर्यंत जगाला मार्गदर्शक होता. संस्कृतीची हीच ताकद लक्षात घेता सैन्य, बॉम्ब किंवा सर्जिकल स्ट्राईकची गरज नाही, शिक्षणातून घडणारे संवेदनशील शांत मन आणि त्यातून उभी राहणारी संस्कृतीच गावाचे आणि देशाच्या संरक्षणाचे काम करू शकेल असे मत राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.

नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची १५१ वी जयंती आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त गोखले एज्युकेशन सोसायटी व इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ एज्युकेशन फॉर वर्ल्ड पीस यासंस्थेच्या वतीने आयोजित सुशासन आणि शांततेसाठी शिक्षण या विषयाच्या परिषदेच्या उद्घाटनाप्रंसगी राज्यपाल बोलत होते. येथील एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष अरूण निगवेकर होते. तर व्यासपीठावर अणु उर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर, शिक्षण तज्ज्ञ तथा गोखले एज्युकेशन सोसायटीचे सरचिटणिस डॉ. मो. स. गोसावी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी शिक्षण तज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी एक्सलन्स अवॉर्ड अणू उर्जा शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना प्रदान करण्यात आला. एक लाख रूपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.पालघर की इथोपीया? राज्यपालांचा सवाल-पालघर येथील आदिवासी बालकांच्या कुपोषणाच्या विषयावर बोलताना राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी या ठिकाणी भूक आणि कुपोषणाने पडणारे बळी बघितल्यावर हे इथोपिया तर नाही ना असा प्रश्न पडत असल्याचे मत व्यक्त केले. सध्या पालघर येथील कुपोषीत बालकांची छायाचित्रे माध्यमात येत आहेत. भूकेने येथे अनेकांचे बळी जात आहेत, ही दुर्देवी बाब असल्याचे सांगून राज्यपालांनी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने डहाणू येथे राष्ट्रीय कौशल्य विद्यापीठ स्थापन केले जात आहे, त्या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अशा प्रकारच्या कौशल्याधीष्ठीत शिक्षणक्रमांमुळेच आदिवासींसारख्या मागास समाजाच्या समस्या सुटतील असेही ते म्हणाले.