शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : शिक्षणातून घडणारी संस्कृतीच करेल देशाचे संरक्षण- राज्यपाल

By admin | Updated: October 24, 2016 17:19 IST

आज समाजात आणि देशात असुरक्षीततेची भावना व्यक्त होत आहे, गावाची आणि देशाची सुरक्षीतता संवेदनशील बनली आहे. अत्यंत प्रगल्भ सांस्कृतिक वारसा असलेला हा देश सतराव्या शतकापर्यंत जगाला मार्गदर्शक होता.

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 24 -  आज समाजात आणि देशात असुरक्षीततेची भावना व्यक्त होत आहे, गावाची आणि देशाची सुरक्षीतता संवेदनशील बनली आहे. अत्यंत प्रगल्भ सांस्कृतिक वारसा असलेला हा देश सतराव्या शतकापर्यंत जगाला मार्गदर्शक होता. संस्कृतीची हीच ताकद लक्षात घेता सैन्य, बॉम्ब किंवा सर्जिकल स्ट्राईकची गरज नाही, शिक्षणातून घडणारे संवेदनशील शांत मन आणि त्यातून उभी राहणारी संस्कृतीच गावाचे आणि देशाच्या संरक्षणाचे काम करू शकेल असे मत राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.

नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची १५१ वी जयंती आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त गोखले एज्युकेशन सोसायटी व इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ एज्युकेशन फॉर वर्ल्ड पीस यासंस्थेच्या वतीने आयोजित सुशासन आणि शांततेसाठी शिक्षण या विषयाच्या परिषदेच्या उद्घाटनाप्रंसगी राज्यपाल बोलत होते. येथील एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष अरूण निगवेकर होते. तर व्यासपीठावर अणु उर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर, शिक्षण तज्ज्ञ तथा गोखले एज्युकेशन सोसायटीचे सरचिटणिस डॉ. मो. स. गोसावी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी शिक्षण तज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी एक्सलन्स अवॉर्ड अणू उर्जा शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना प्रदान करण्यात आला. एक लाख रूपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.पालघर की इथोपीया? राज्यपालांचा सवाल-पालघर येथील आदिवासी बालकांच्या कुपोषणाच्या विषयावर बोलताना राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी या ठिकाणी भूक आणि कुपोषणाने पडणारे बळी बघितल्यावर हे इथोपिया तर नाही ना असा प्रश्न पडत असल्याचे मत व्यक्त केले. सध्या पालघर येथील कुपोषीत बालकांची छायाचित्रे माध्यमात येत आहेत. भूकेने येथे अनेकांचे बळी जात आहेत, ही दुर्देवी बाब असल्याचे सांगून राज्यपालांनी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने डहाणू येथे राष्ट्रीय कौशल्य विद्यापीठ स्थापन केले जात आहे, त्या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अशा प्रकारच्या कौशल्याधीष्ठीत शिक्षणक्रमांमुळेच आदिवासींसारख्या मागास समाजाच्या समस्या सुटतील असेही ते म्हणाले.