शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
3
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
4
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
5
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
6
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
7
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
8
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
9
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
10
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
11
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
12
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
13
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
14
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
15
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
16
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
17
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
18
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
19
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
20
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली

VIDEO : शिक्षणातून घडणारी संस्कृतीच करेल देशाचे संरक्षण- राज्यपाल

By admin | Updated: October 24, 2016 17:19 IST

आज समाजात आणि देशात असुरक्षीततेची भावना व्यक्त होत आहे, गावाची आणि देशाची सुरक्षीतता संवेदनशील बनली आहे. अत्यंत प्रगल्भ सांस्कृतिक वारसा असलेला हा देश सतराव्या शतकापर्यंत जगाला मार्गदर्शक होता.

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 24 -  आज समाजात आणि देशात असुरक्षीततेची भावना व्यक्त होत आहे, गावाची आणि देशाची सुरक्षीतता संवेदनशील बनली आहे. अत्यंत प्रगल्भ सांस्कृतिक वारसा असलेला हा देश सतराव्या शतकापर्यंत जगाला मार्गदर्शक होता. संस्कृतीची हीच ताकद लक्षात घेता सैन्य, बॉम्ब किंवा सर्जिकल स्ट्राईकची गरज नाही, शिक्षणातून घडणारे संवेदनशील शांत मन आणि त्यातून उभी राहणारी संस्कृतीच गावाचे आणि देशाच्या संरक्षणाचे काम करू शकेल असे मत राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.

नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची १५१ वी जयंती आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त गोखले एज्युकेशन सोसायटी व इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ एज्युकेशन फॉर वर्ल्ड पीस यासंस्थेच्या वतीने आयोजित सुशासन आणि शांततेसाठी शिक्षण या विषयाच्या परिषदेच्या उद्घाटनाप्रंसगी राज्यपाल बोलत होते. येथील एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष अरूण निगवेकर होते. तर व्यासपीठावर अणु उर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर, शिक्षण तज्ज्ञ तथा गोखले एज्युकेशन सोसायटीचे सरचिटणिस डॉ. मो. स. गोसावी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी शिक्षण तज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी एक्सलन्स अवॉर्ड अणू उर्जा शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना प्रदान करण्यात आला. एक लाख रूपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.पालघर की इथोपीया? राज्यपालांचा सवाल-पालघर येथील आदिवासी बालकांच्या कुपोषणाच्या विषयावर बोलताना राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी या ठिकाणी भूक आणि कुपोषणाने पडणारे बळी बघितल्यावर हे इथोपिया तर नाही ना असा प्रश्न पडत असल्याचे मत व्यक्त केले. सध्या पालघर येथील कुपोषीत बालकांची छायाचित्रे माध्यमात येत आहेत. भूकेने येथे अनेकांचे बळी जात आहेत, ही दुर्देवी बाब असल्याचे सांगून राज्यपालांनी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने डहाणू येथे राष्ट्रीय कौशल्य विद्यापीठ स्थापन केले जात आहे, त्या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अशा प्रकारच्या कौशल्याधीष्ठीत शिक्षणक्रमांमुळेच आदिवासींसारख्या मागास समाजाच्या समस्या सुटतील असेही ते म्हणाले.