शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

VIDEO - छतावरील सौरऊर्जेचा पर्याय टाळता नाही येणार - कुलदीप जैन

By admin | Updated: June 10, 2017 15:17 IST

नजीक भविष्यात छतावरील सौरऊर्जेचा पर्याय स्वीकारावा लागेल. तो टाळता येणार नाही. प्रत्यक्षात सौरऊर्जा वापराचा हा पर्याय टाळता येणार नाही.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 10 - नजीक भविष्यात छतावरील सौरऊर्जेचा पर्याय स्वीकारावा लागेल. तो टाळता येणार नाही. प्रत्यक्षात सौरऊर्जा वापराचा हा पर्याय टाळता येणार नाही असे मत ‘क्लीनमॅक्स सोलार’चे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप जैन यांनी लोकमत ऊर्जा समिटमध्ये व्यक्त केले. 
 
खासगी ग्राहक त्यांचे जे अर्थगणित आहे त्यावर रुफटॉप एनर्जीचा निर्णय घेतील. तुमची खासगी कंपनी असेल तर कंपनीच्या मालकावर तो निर्णय अवलंबून असेल. तंत्रज्ञान स्वीकारायला थोडा वेळ लागेल पण पुढच्या पाच-सातवर्षात रुफटॉप सोलार एनर्जीचा जास्तीत जास्त वापर सुरु झालेला असेल असे कुलदीप जैन यांनी सांगितले. इलेक्ट्रीसिटीच्या वापरामध्ये वाढ होणार आहे, त्यानुसार उत्पादन व वितरणाचे नियोजन करावे लागेल असे त्यांनी सांगितले.
 
दरम्यान सौरऊर्जेच्या क्षेत्रात उत्तम प्रकारे काम सुरु असून, या क्षेत्रात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.उत्पादनांच्या किंमती परवडू शकतील अशा पद्धतीने कमी होत आहेत, तंत्रज्ञानाचा वेगाने विकास होत असल्याने या क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत असे रवीन ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष  विजय करिया यांनी सांगितले. सौरऊर्जेबरोबर पवन ऊर्जेकडे लक्ष द्यावे, सरकराने नियंत्रकाच्या भूमिकेऐवजी सुविधा पुरवण्याची भूमिका घ्यावी अशी सूचनाही त्यांनी केली. 
 
महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे संचालक विश्वास पाठक म्हणाले की, सर्व धोरण वीज निर्मिती भोवती फिरते, वीज निर्मितीच्या बरोबरीने वितरणावर लक्ष देण्याची गरज आहे असे यांनी सांगितले. वितरकांना उपलब्ध असलेल्या दराने वीज विकत घ्यावी लागते, मात्र वितरण करताना कमी दराने वीज विकावी अशी अपेक्षा केली जाते असे विश्वास पाठक यांनी सांगितले. 
 
लोकांच्या व सरकारच्या अपेक्षा वीज वितरकांना पूर्ण कराव्या लागतात. लोकांपर्यंत वीज पोहचली पाहिजे हे पाहण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राकडे अतिरिक्त वीज आहे, पण आपण वीज पुरवठयावर अवलंबून राहतो, काही वेळा काही कारणांमुळे वीज पुरवणारे वेळेत वीज पुरवठा करु शकत नाहीत असे संजीव कुमार यांनी सांगितले. कमी वीज पुरवठा होतो त्यामुळे त्यादृष्टीने धोरण आखले गेले पाहिजे, एखादवेळ वीज पुरवठा केला नाही तर त्यात दंडाची तरतूद नसली पाहिजे असे संजीव कुमार म्हणाले.