शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - छतावरील सौरऊर्जेचा पर्याय टाळता नाही येणार - कुलदीप जैन

By admin | Updated: June 10, 2017 15:17 IST

नजीक भविष्यात छतावरील सौरऊर्जेचा पर्याय स्वीकारावा लागेल. तो टाळता येणार नाही. प्रत्यक्षात सौरऊर्जा वापराचा हा पर्याय टाळता येणार नाही.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 10 - नजीक भविष्यात छतावरील सौरऊर्जेचा पर्याय स्वीकारावा लागेल. तो टाळता येणार नाही. प्रत्यक्षात सौरऊर्जा वापराचा हा पर्याय टाळता येणार नाही असे मत ‘क्लीनमॅक्स सोलार’चे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप जैन यांनी लोकमत ऊर्जा समिटमध्ये व्यक्त केले. 
 
खासगी ग्राहक त्यांचे जे अर्थगणित आहे त्यावर रुफटॉप एनर्जीचा निर्णय घेतील. तुमची खासगी कंपनी असेल तर कंपनीच्या मालकावर तो निर्णय अवलंबून असेल. तंत्रज्ञान स्वीकारायला थोडा वेळ लागेल पण पुढच्या पाच-सातवर्षात रुफटॉप सोलार एनर्जीचा जास्तीत जास्त वापर सुरु झालेला असेल असे कुलदीप जैन यांनी सांगितले. इलेक्ट्रीसिटीच्या वापरामध्ये वाढ होणार आहे, त्यानुसार उत्पादन व वितरणाचे नियोजन करावे लागेल असे त्यांनी सांगितले.
 
दरम्यान सौरऊर्जेच्या क्षेत्रात उत्तम प्रकारे काम सुरु असून, या क्षेत्रात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.उत्पादनांच्या किंमती परवडू शकतील अशा पद्धतीने कमी होत आहेत, तंत्रज्ञानाचा वेगाने विकास होत असल्याने या क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत असे रवीन ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष  विजय करिया यांनी सांगितले. सौरऊर्जेबरोबर पवन ऊर्जेकडे लक्ष द्यावे, सरकराने नियंत्रकाच्या भूमिकेऐवजी सुविधा पुरवण्याची भूमिका घ्यावी अशी सूचनाही त्यांनी केली. 
 
महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे संचालक विश्वास पाठक म्हणाले की, सर्व धोरण वीज निर्मिती भोवती फिरते, वीज निर्मितीच्या बरोबरीने वितरणावर लक्ष देण्याची गरज आहे असे यांनी सांगितले. वितरकांना उपलब्ध असलेल्या दराने वीज विकत घ्यावी लागते, मात्र वितरण करताना कमी दराने वीज विकावी अशी अपेक्षा केली जाते असे विश्वास पाठक यांनी सांगितले. 
 
लोकांच्या व सरकारच्या अपेक्षा वीज वितरकांना पूर्ण कराव्या लागतात. लोकांपर्यंत वीज पोहचली पाहिजे हे पाहण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राकडे अतिरिक्त वीज आहे, पण आपण वीज पुरवठयावर अवलंबून राहतो, काही वेळा काही कारणांमुळे वीज पुरवणारे वेळेत वीज पुरवठा करु शकत नाहीत असे संजीव कुमार यांनी सांगितले. कमी वीज पुरवठा होतो त्यामुळे त्यादृष्टीने धोरण आखले गेले पाहिजे, एखादवेळ वीज पुरवठा केला नाही तर त्यात दंडाची तरतूद नसली पाहिजे असे संजीव कुमार म्हणाले.