शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

VIDEO - विहिरीत पडलेल्या बिबटाला मिळाले जीवदान

By admin | Updated: August 18, 2016 17:27 IST

बार्शिटाकळी तालुक्यातील चिंचोळी वरखेड गावालगतच्या नाल्याकाठी असलेल्या शेतशिवारातील विहिरीत मध्यरात्री बिबट पडले

- राम देशपांडे अकोला, दि. 18 : बार्शिटाकळी तालुक्यातील चिंचोळी वरखेड गावालगतच्या नाल्याकाठी असलेल्या शेतशिवारातील विहिरीत मध्यरात्री बिबट पडले. धारदार दातांच्या आधारे विहिरीतील लोखंडी सळी पकडून असलेल्या या बिबटाला सकाळी ९.१५ च्या सुमारास बाहेर काढण्यात वनविभागाचे अधिकारी व बचाव पथकातील सहकार्‍यांना यश आले.

बार्शिटाकळी तालुक्यातील चिंचोळी वरखेड हे गाव काटेपूर्णा अभयारण्याच्या सीमेवर आहे. गावालतच्या नाल्याकाठी सरपंच आधंळे यांच्या शेतातील विहिरीत बुधवार व गुरूवारच्या मध्यरात्री बिबट पडले असल्याची माहिती गावातील लोकांना कळली. पहाटे ६ च्या सुमारास सरपंच आंधळे यांनी ही बाब वनविभागाच्या अधिकार्‍यांना दिली. माहिती मिळताच वपरिक्षेत्र अधिकारी अशोक वायाळ यांनी बचाव पथकासह घटनास्थळ गाठले. विहिरीला संरक्षित भिंत वा कुठलेही आवरण नसल्याने, विहिरीत पडलेले २.५ ते ३ वर्षांचे हे बिबट आपल्या धारदार दातांच्या आधारे लोखंडी सळी पकडून होते.

बार्शिटाकळीचे वनपाल शेख हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. वन अधिकार्‍यांच्या नेतृत्वात बचाव पथकातील वनरक्षक सुनील राऊत, निलेश सोनोने, सिद्धार्थ जोंधळे, सर्पमित्र मुन्ना उर्फ शे. मोहम्मद व अनील चौधरी यांनी चोहू बाजूने दोर बांधलेली खाट विहिरीत सोडली. महतप्रयासानंतर ९.१५ च्या सुमारास खाटेच्या आधारे विहिरीतून बाहेर पडलेल्या बिबटाने अभयारण्याच्या दिशेने धूम ठोकली. घटनास्थणी ग्रमस्थांनी गर्दी केली होती. विहिरीत पडलेले बिबट पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीला पांगविण्यासाठी वनविभागाच्या चमूला वेगळे परिश्रम घ्यावे लागले. काटेपूर्णा आणि मेळघाट अभयारण्यालगतच्या शेतशिवारांमधील बहुतांश विहिरींना संरक्ष भिंती नसल्याने जंगलातील श्‍वापदे त्यात पडत असून, या विहिरीच जंगलातील राजाची शिकार करीत असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने जागतिक व्याघ्र दिनी प्रकाशित केले होते. त्यानंतरही शेतकरी व वनविभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने जंगली श्‍वापदे त्यात पडत असल्याचे हे ताजे उदारहण म्हणावे लागेल.----अभयारण्यालगतच्या शेतशिवारांमधी बहुतांश विहिरींना संरक्षित भिंती नाहीत. त्यावर आवरण देखील टाकले जात नाही. परिणामी, तहान व भूक भागविण्यासाठी लगतच्या शेतशिवारांमध्ये फिरणार्‍या जंगलातील श्‍वापदांना जीव गमवावा लागतो. शेतकर्‍यांनी अशा विहिरींना संरक्षित कठडे व आवारण घालावेत.- अशोक वायाळवनपरिक्षेत्र अधिकारी, काटेपूर्णा