शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

VIDEO - विहिरीत पडलेल्या बिबटाला मिळाले जीवदान

By admin | Updated: August 18, 2016 17:27 IST

बार्शिटाकळी तालुक्यातील चिंचोळी वरखेड गावालगतच्या नाल्याकाठी असलेल्या शेतशिवारातील विहिरीत मध्यरात्री बिबट पडले

- राम देशपांडे अकोला, दि. 18 : बार्शिटाकळी तालुक्यातील चिंचोळी वरखेड गावालगतच्या नाल्याकाठी असलेल्या शेतशिवारातील विहिरीत मध्यरात्री बिबट पडले. धारदार दातांच्या आधारे विहिरीतील लोखंडी सळी पकडून असलेल्या या बिबटाला सकाळी ९.१५ च्या सुमारास बाहेर काढण्यात वनविभागाचे अधिकारी व बचाव पथकातील सहकार्‍यांना यश आले.

बार्शिटाकळी तालुक्यातील चिंचोळी वरखेड हे गाव काटेपूर्णा अभयारण्याच्या सीमेवर आहे. गावालतच्या नाल्याकाठी सरपंच आधंळे यांच्या शेतातील विहिरीत बुधवार व गुरूवारच्या मध्यरात्री बिबट पडले असल्याची माहिती गावातील लोकांना कळली. पहाटे ६ च्या सुमारास सरपंच आंधळे यांनी ही बाब वनविभागाच्या अधिकार्‍यांना दिली. माहिती मिळताच वपरिक्षेत्र अधिकारी अशोक वायाळ यांनी बचाव पथकासह घटनास्थळ गाठले. विहिरीला संरक्षित भिंत वा कुठलेही आवरण नसल्याने, विहिरीत पडलेले २.५ ते ३ वर्षांचे हे बिबट आपल्या धारदार दातांच्या आधारे लोखंडी सळी पकडून होते.

बार्शिटाकळीचे वनपाल शेख हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. वन अधिकार्‍यांच्या नेतृत्वात बचाव पथकातील वनरक्षक सुनील राऊत, निलेश सोनोने, सिद्धार्थ जोंधळे, सर्पमित्र मुन्ना उर्फ शे. मोहम्मद व अनील चौधरी यांनी चोहू बाजूने दोर बांधलेली खाट विहिरीत सोडली. महतप्रयासानंतर ९.१५ च्या सुमारास खाटेच्या आधारे विहिरीतून बाहेर पडलेल्या बिबटाने अभयारण्याच्या दिशेने धूम ठोकली. घटनास्थणी ग्रमस्थांनी गर्दी केली होती. विहिरीत पडलेले बिबट पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीला पांगविण्यासाठी वनविभागाच्या चमूला वेगळे परिश्रम घ्यावे लागले. काटेपूर्णा आणि मेळघाट अभयारण्यालगतच्या शेतशिवारांमधील बहुतांश विहिरींना संरक्ष भिंती नसल्याने जंगलातील श्‍वापदे त्यात पडत असून, या विहिरीच जंगलातील राजाची शिकार करीत असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने जागतिक व्याघ्र दिनी प्रकाशित केले होते. त्यानंतरही शेतकरी व वनविभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने जंगली श्‍वापदे त्यात पडत असल्याचे हे ताजे उदारहण म्हणावे लागेल.----अभयारण्यालगतच्या शेतशिवारांमधी बहुतांश विहिरींना संरक्षित भिंती नाहीत. त्यावर आवरण देखील टाकले जात नाही. परिणामी, तहान व भूक भागविण्यासाठी लगतच्या शेतशिवारांमध्ये फिरणार्‍या जंगलातील श्‍वापदांना जीव गमवावा लागतो. शेतकर्‍यांनी अशा विहिरींना संरक्षित कठडे व आवारण घालावेत.- अशोक वायाळवनपरिक्षेत्र अधिकारी, काटेपूर्णा