शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

VIDEO: अजब ! नागाने दुस-या जिवंत नागाला केलं फस्त

By admin | Updated: June 14, 2017 17:33 IST

मानवनिर्मित हस्तक्षेपामुळे निसर्गास धोका : पोर्ले तर्फ ठाणे येथील जंगलातील प्रकार   सरदार चौगुले / ऑनलाइन लोकमत    कोल्हापूर, ...

मानवनिर्मित हस्तक्षेपामुळे निसर्गास धोका : पोर्ले तर्फ ठाणे येथील जंगलातील प्रकार
 
सरदार चौगुले / ऑनलाइन लोकमत 
 
कोल्हापूर, दि. 14 - मानवनिर्मित हस्तक्षेपामुळे निसर्गातील अनेक परिसंस्थांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. परिणामी, काही प्राणी जगण्यासाठी आपल्यातीलच लहान प्राण्यांची शिकार करताना दिसत आहेत. असाच काहीसा प्रकार पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील तळीमाळाच्या टेकडीवरील जंगलात अनुभवायास मिळाला. येथे एका मोठ्या नागाने लहान नागाला भक्ष्य म्हणून गिळंकृत केल्याचा प्रकार निदर्शनास आला. 
 
(VIDEO: सापाने गिळला जिवंत साप आणि नंतर....)
 
महिला सरपण आणण्यासाठी भरदुपारी टेकडीकडे चालली होती. काटेरी झुडपांच्या आडोशाला दोन नागांचे फुसफुसणे आणि त्यांची झुंज तिने पाहिली. तिने सर्पमित्र दिनकर चौगुले यांना हा प्रकार सांगितला. घटनास्थळी पोहोचल्यानंतर मात्र त्यांना एका मोठ्या साडेपाच फुटाच्या नागाने (कॉमन कोब्रा) दुसऱ्या साडेतीन फुटाच्या नागाला अर्धमेला करून गिळण्यास सुरुवात केली होती. नागाने दहा मिनिटात आपल्याच जातीचे भक्ष्य फस्त केले. त्यानंतर दिनकर चौगुले यांनी मोठ्या नागाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले होते. . 
 
https://www.dailymotion.com/video/x8453rv
कॉमन कोब्राने (नाग) नागालाच गिळताना पाहिलेले नाही. डोंगरातील आगीच्या प्रकारामुळे मुख्य भक्ष्य जागा सोडून जात आहेत. आठ महिन्यांपूर्वी दहा फुटांचा अजगर अन्नाच्या शोधात लोकवस्तीत आला होता. त्यामुळे पर्यावरणातील अन्नसाखळी टिकवणे काळाची गरज आहे, हे विसरून चालणार नाही. 
-दिनकर चौगुले, सर्पमित्र,
 
1- भारतात चार प्रकारचे कोब्रा आढळून येतात. यातील फक्त किंग कोब्रा इतर साप खातो. तर बाकीचे ब्लॅक कोब्रा, मोनोसिल्याटेड कोब्रा व कॉमन कोब्रा यांचे मुख्य भक्ष्य सरडे, बेडूक व उंदीर आहे. कॉमन कोब्रा भारतात सर्वत्र आढळतात.
 
2 - लोकांनी वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी चुकीच्या समजुतीमुळे डोंगर व जंगलांना आग लावणे थांबवावे. ग्लेडेशिया व आक्रेशिया-सारख्या परदेशी वंशांच्या झाडांजवळ लहान प्राणी व पक्षी जात नाहीत. कारण या झाडांच्या पानांच्या वासाने वन्यप्राणी बेशुद्ध होतात. त्यामुळे वनविभागाने वृक्ष लागवड करताना भारतीय वंशांचीच झाडे लावावीत, असे काही निसर्गमित्रांचे मत आहे.