शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

VIDEO : अकोल्यात अक्षय केमिकल कंपनीत अग्नितांडव

By admin | Updated: January 1, 2017 02:15 IST

 अकोला, दि. ३१-    एमआयडीसी क्रमांक-४ मधील अक्षय केमिकल्स कारखान्याला भीषण आग लागून कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक झाला. ...

 अकोला, दि. ३१-    एमआयडीसी क्रमांक-४ मधील अक्षय केमिकल्स कारखान्याला भीषण आग लागून कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक झाला. ही घटना शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या बंबांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमानंतर सकाळी १0 वाजताच्या सुमारास आग आटोक्यात आली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली नव्हती. 
एमआयडीसी क्रमांक-४ मधील परिसरात गोरक्षण रोडवर राहणारे उद्योजक शैलेश भगवानदास भुतडा यांचा अक्षय केमिकल्स नावाचा कारखाना आहे. कारखान्यामध्ये एरंडीपासून तेल काढल्यानंतर त्याचे औषध बनविण्यात येते. यासोबतच इतर रसायनेसुद्धा बनविण्यात येतात. शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास कारखान्यामध्ये अचानक आग लागली. पाहता-पाहता आगीने रुद्ररूप धारण केले. कारखान्यातील २0 ते २५ कर्मचार्‍यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीचे रुद्ररूप पाहता, कारखान्यातील कर्मचार्‍यांचे प्रयत्न अपुरे पडले. महापालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती मिळताच, घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या बंबांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला; परंतु आग मोठय़ा प्रमाणात कारखान्यात पसरल्याने विझविण्यामध्ये अडचणी येत होत्या. संपूर्ण कारखाना आणि कारखान्यातील माल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने, कारखान्यात कोणालाच प्रवेश करता येत नव्हता. कारखान्याच्या बाहेरूनच पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सकाळी १0 वाजेपर्यंत सुरू होते. अखेर १0 वाजताच्या नंतर अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी आगीवर नियंत्रण मिळविले; परंतु तोपर्यंत कारखान्यातील कोट्यवधी रुपयांचा माल व महागडी यंत्रे जळून खाक झाली होती. 
 
एरंडी तेल उत्पादनांमुळे आगीचा भडका
अक्षय केमिकल्स कारखान्यामध्ये एरंडी तेलापासून उत्पादने तयार करण्यात येतात. आग लागल्यावर तेलाच्या उत्पादनांनी पेट घेतला. त्यामुळे आणखीनच आगीचा भडका उडाला. आग लागली तेव्हा सुदैवाने कारखान्यात कोणी कर्मचारी नव्हते. अन्यथा वित्तहानीसोबतच प्राणहानीसुद्धा झाली असती.
 
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता
शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. कारखान्याचे संचालक शैलेश भुतडा यांनी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत तक्रार दिली नव्हती. त्यामुळे कारखान्यातील किती कोटीचा माल जळून नष्ट झाला, हे स्पष्ट होऊ शकले नाही. 
 
दीड कोटी रुपयांचे नुकसान
आगीमध्ये कारखान्यातील यंत्र, एकूण उत्पादने मिळून अंदाजे दीड कोटी रुपयांच्यावर नुकसान झाल्याचा दावा कारखान्याचे संचालक शैलेश भुतडा यांनी केला आहे. 
 
रात्रपाळीत तीन कामगार
संचालक शैलेश भुतडा यांच्या सांगण्यानुसार अक्षय केमिकल्स कारखान्यामध्ये एकूण नऊ कर्मचारी तीन पाळीत काम करतात. शुक्रवारी रात्रपाळीमध्ये तीन कर्मचारी काम करीत होते. कारखान्याला आग लागली, तेव्हा तीनही कर्मचारी आत होते.
 
 
 
 
 
 

https://www.dailymotion.com/video/x844mxl