शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

विदर्भात कापूस पिकाच्या व्यवस्थापनावर भर!

By admin | Updated: March 26, 2016 02:12 IST

खरीप हंगामाचे नियोजन आतापासूनच; अतिघनता लागवडीवर शासन लक्ष देणार.

अकोला: विदर्भातील कापूस हे नगदी पीक आहे; परंतु पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे सलग चार ते पाच वर्षांपासून उत्पादन घटले असल्याने शेतकरी या पिकाच्या बाबतीत साशंक असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कापसाच्या व्यवस्थापनावर भर दिला असून, येत्या खरीप हंगामात अतिउच्च घनता पद्धतीचा वापर वाढण्यासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. अतिघनता लागवड करण्यासाठी यावर्षी शासनही लक्ष देणार आहे.विदर्भात कापसाचे क्षेत्र जवळपास १५ लाख हेक्टरच्या वर आहे. तथापि, अलीकडे हे क्षेत्र कमी होत आहे. या पृष्ठभूमीवर यावर्षी कापसाचे क्षेत्र कायम ठेवण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून दक्षता घेतली जात आहे. शेतकर्‍यांनी कृषी विद्यापीठाची एकेएच 0८१ व एकेएच 0७ या अति उच्च घनता लागवड करावी, यासाठी या कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन केंद्राने कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर व शेतकर्‍यांच्या शेतावर प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे; परंतु असे असले तरी या दोन जातीचे बियाणे शेतकर्‍यांना कितपत उपलब्ध होईल, यावर सर्व अवलंबून आहे. कापूस पिकाच्या अतिउच्च घनता लागवडीसाठी शासनाने यावर्षी लक्ष केंद्रित केले असून, यासंदर्भात लवकरच कृषी विद्यापीठ, कृषी विभागाला आदेश दिले जाणार असल्याचे वृत्त आहे. या बाबत कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाकडून कापूस पिकाचे आधुनिक व्यवस्थापन या विषयावर बुधवारी प्रशिक्षण घेण्यात येत आहे. यामध्ये कापूस विकास संचालनालय नागपूरचा सहभाग आहे. कापूस विदर्भातील नगदी पीक असल्याने कापूस तंत्रज्ञानामध्ये विविध पद्धतींचा अवंलब करता येणे शक्य आहे. अधिक उत्पादनाकरिता शिफारस केलेल्या कापसाच्या जाती आणि सुधारित तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास उत्पादनात निश्‍चित भर पडून नफा मिळवता येतो. अति घनता लागवडीचा अवलंब केल्यास हेक्टरी झाडांची संख्या वाढ होते, हे विशेष.