शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

निवडणुकीपूर्वीच विदर्भ राज्याचा निर्धार

By admin | Updated: July 27, 2014 01:18 IST

विधानसभा निवडणुकीपूर्वी तीन महिन्यांचा काळ वेगळ्या विदर्भासाठी अनुकूल आहे. विदर्भ राज्य झाले नाही, तर जनता सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती सत्ताधाऱ्यांसह इतर राजकीय पक्षांमध्ये

विविध संघटनांनी घेतली शपथ : क्रांतिदिनी ‘बस देखो, रेल देखो’ आंदोलनवर्धा : विधानसभा निवडणुकीपूर्वी तीन महिन्यांचा काळ वेगळ्या विदर्भासाठी अनुकूल आहे. विदर्भ राज्य झाले नाही, तर जनता सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती सत्ताधाऱ्यांसह इतर राजकीय पक्षांमध्ये निर्माण झाली पाहिजे. हा काळ हातातून निघून गेला की राज्यकर्त्यांना कोंडीत पकडणे अशक्य आहे. तेव्हा विदर्भ राज्याचे आंदोलन अधिक तीव्र करण्याची हीच संधी आता हातून जावू द्यायची नाही, असा निर्धार शनिवारी येथे विदर्भवाद्यांनी केला. वेगळ्या विदर्भासाठी जनमंच आणि आम्ही वर्धेकर समितीच्यावतीने स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयात आयोजित सभेत जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘वेगळ्या विदर्भाची’ शपथ घेतली. तसेच येत्या ९ आॅगस्ट रोजी क्रांतिदिनाचे औचित्य साधून विदर्भात ‘बस देखो, रेल देखो’च्या माध्यमातून आंदोलन तीव्र करण्याचा निर्धारही करण्यात आला. शांततेच्या मार्गाने होणाऱ्या या आंदोलनात प्रत्येक प्रवाश्याला ‘विदर्भ बंधनाचा’ धागा बांधण्यात येणार आहे. शेतकरी नेते विजय जावंधिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, विदर्भ समन्वयक चंद्रकांत वानखेडे, सल्लागार प्रा. शरद पाटील, प्रकाश इटनकर, महासचिव राजीव जगताप, उपाध्यक्ष प्रमोद पांडे, विदर्भ साहित्य संघाचे प्रदीप दाते उपस्थित होते. अटलबिहारी वाजपेयींचे सरकार इतर राजकीय पक्षांच्या कुबड्यांवर चालत होते. शिवसेनेच्या विरोधी भूमिकेमुळे विदर्भ वेगळा झाला नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी भुवनेश्वर येथे भाजपने वेगळ्या विदर्भ राज्याचा ठराव घेतला. आता केंद्रात भाजपचे सरकार बहुमतात आहे. शिवसेनाही दुखावेल, असेही वाटत नाही, मात्र सत्ता येताच भाजपचा सूर बदलला आहे. उलट महाराष्ट्रात सत्तांतर होईल. सत्ता आल्यास चार वर्षे राज्य करायचे आणि नंतर विदर्भ राज्य वेगळे करायचे. मग पुढील निवडणूक त्या आधारे जिंकायची, हा राजकीय डाव आहे. तो हाणून पाडत विदर्भ राज्य पदरात पाडण्याची हीच सुवर्णसंधी आहे. हे विधानसभा निवडणुकीपूर्वीच शक्य आहे, याकडे जनमंचचे चंद्रकांत वानखेडे, प्रा. शरद पाटील व मान्यवरांनी लक्ष वेधले. जावंधिया यांनी या लढ्यात प्रत्येकाने स्वत:ला झोकून देण्याचे आवाहन केले. मोदी सरकार ज्या पद्धतीने राज्य कारभार करीत आहे, असेच सुरू राहिले तर केवळ दोन वर्षांत कापूस शेतकऱ्यांना खाईत लोटल्याशिवाय राहणार नाही. समाजातील इतर घटकांनाही याची झळ पोहचले. शेतकऱ्यांना या संकटातून काढण्यासाठी विदर्भाचा लढा प्रत्येकाने लढण्याची गरज आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. संचालन नाट्यदिग्दर्शक हरीश इथापे, तर आभार कवी संजय इंगळे तिगावकर यांनी केले.(जिल्हा प्रतिनिधी)