शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
4
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
5
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
6
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
7
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
8
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
9
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
10
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
11
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
12
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
13
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
14
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
15
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
16
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
17
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
18
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
19
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
20
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीपूर्वीच विदर्भ राज्याचा निर्धार

By admin | Updated: July 27, 2014 01:18 IST

विधानसभा निवडणुकीपूर्वी तीन महिन्यांचा काळ वेगळ्या विदर्भासाठी अनुकूल आहे. विदर्भ राज्य झाले नाही, तर जनता सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती सत्ताधाऱ्यांसह इतर राजकीय पक्षांमध्ये

विविध संघटनांनी घेतली शपथ : क्रांतिदिनी ‘बस देखो, रेल देखो’ आंदोलनवर्धा : विधानसभा निवडणुकीपूर्वी तीन महिन्यांचा काळ वेगळ्या विदर्भासाठी अनुकूल आहे. विदर्भ राज्य झाले नाही, तर जनता सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती सत्ताधाऱ्यांसह इतर राजकीय पक्षांमध्ये निर्माण झाली पाहिजे. हा काळ हातातून निघून गेला की राज्यकर्त्यांना कोंडीत पकडणे अशक्य आहे. तेव्हा विदर्भ राज्याचे आंदोलन अधिक तीव्र करण्याची हीच संधी आता हातून जावू द्यायची नाही, असा निर्धार शनिवारी येथे विदर्भवाद्यांनी केला. वेगळ्या विदर्भासाठी जनमंच आणि आम्ही वर्धेकर समितीच्यावतीने स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयात आयोजित सभेत जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘वेगळ्या विदर्भाची’ शपथ घेतली. तसेच येत्या ९ आॅगस्ट रोजी क्रांतिदिनाचे औचित्य साधून विदर्भात ‘बस देखो, रेल देखो’च्या माध्यमातून आंदोलन तीव्र करण्याचा निर्धारही करण्यात आला. शांततेच्या मार्गाने होणाऱ्या या आंदोलनात प्रत्येक प्रवाश्याला ‘विदर्भ बंधनाचा’ धागा बांधण्यात येणार आहे. शेतकरी नेते विजय जावंधिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, विदर्भ समन्वयक चंद्रकांत वानखेडे, सल्लागार प्रा. शरद पाटील, प्रकाश इटनकर, महासचिव राजीव जगताप, उपाध्यक्ष प्रमोद पांडे, विदर्भ साहित्य संघाचे प्रदीप दाते उपस्थित होते. अटलबिहारी वाजपेयींचे सरकार इतर राजकीय पक्षांच्या कुबड्यांवर चालत होते. शिवसेनेच्या विरोधी भूमिकेमुळे विदर्भ वेगळा झाला नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी भुवनेश्वर येथे भाजपने वेगळ्या विदर्भ राज्याचा ठराव घेतला. आता केंद्रात भाजपचे सरकार बहुमतात आहे. शिवसेनाही दुखावेल, असेही वाटत नाही, मात्र सत्ता येताच भाजपचा सूर बदलला आहे. उलट महाराष्ट्रात सत्तांतर होईल. सत्ता आल्यास चार वर्षे राज्य करायचे आणि नंतर विदर्भ राज्य वेगळे करायचे. मग पुढील निवडणूक त्या आधारे जिंकायची, हा राजकीय डाव आहे. तो हाणून पाडत विदर्भ राज्य पदरात पाडण्याची हीच सुवर्णसंधी आहे. हे विधानसभा निवडणुकीपूर्वीच शक्य आहे, याकडे जनमंचचे चंद्रकांत वानखेडे, प्रा. शरद पाटील व मान्यवरांनी लक्ष वेधले. जावंधिया यांनी या लढ्यात प्रत्येकाने स्वत:ला झोकून देण्याचे आवाहन केले. मोदी सरकार ज्या पद्धतीने राज्य कारभार करीत आहे, असेच सुरू राहिले तर केवळ दोन वर्षांत कापूस शेतकऱ्यांना खाईत लोटल्याशिवाय राहणार नाही. समाजातील इतर घटकांनाही याची झळ पोहचले. शेतकऱ्यांना या संकटातून काढण्यासाठी विदर्भाचा लढा प्रत्येकाने लढण्याची गरज आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. संचालन नाट्यदिग्दर्शक हरीश इथापे, तर आभार कवी संजय इंगळे तिगावकर यांनी केले.(जिल्हा प्रतिनिधी)