शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

विदर्भ राज्याची मागणी दिल्लीत रेटणार

By admin | Updated: July 15, 2014 01:06 IST

१०८ वर्षे जुनी असलेल्या वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीकडे आतापर्यंत सर्वच राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे आता या मागणीसाठी २४ जुलै रोजी थेट दिल्लीतच जंतर मंतरवर विदर्भ राज्य

पत्रपरिषद : विदर्भ राज्य आंदोलन समितीची माहितीअमरावती : १०८ वर्षे जुनी असलेल्या वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीकडे आतापर्यंत सर्वच राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे आता या मागणीसाठी २४ जुलै रोजी थेट दिल्लीतच जंतर मंतरवर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने धरणे देऊन ही मागणी पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याकडे रेटून धरणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रमुख वामनराव चटप, रामभाऊ नेवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. समितीच्या विभागीय कार्यकर्ता मेळाव्यासाठी ते शहरात आले होते. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित मेळाव्यात पुढे बोलताना ते म्हणाले, विदर्भ राज्यसाठी अहिंसेच्या मार्गाने आतापर्यंत अनेक आंदोलने केलीत; मात्र दखल घेण्यात आली नाही. जुनीच मागणी असलेल्या विदर्भ राज्याकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष करुन तेलंगणा राज्य नव्याने निर्माण केले. विदर्भाच्या बाबतीत केंद्र व राज्य शासनाने नेहमीच अन्यायाची भूमिका घेतली आहे. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष कायम आहे. आतापर्यंत केवळ पश्चिम महाराष्ट्राचाच विकास करण्यात राज्यकर्त्यांनी धन्यता मानली. त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार विधानसभा निवडणुकीपूर्वी विदर्भ राज्य निर्माण करण्याबाबत घोषणा करावी, त्यानंतर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणीही पंतप्रधानांकडे केली जाणार असल्याचे चटप यांनी सांगितले. जंतर मंतरवर होणाऱ्या धरणे आंदोलनात विदर्भातील ११ जिल्ह्यांतून प्रत्येकी १०० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. विदर्भातील खासदारांनी आंदोलनाला भेट देऊन त्यांची भूमिका आंदोलनस्थळी स्पष्ट करण्याची आमची मागणी आहे. याचवेळी विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी तेलंगणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या राज्यातील खासदारांचाही पाठींबा मागण्यात आला आहे.या आंदोलनाला विदर्भातील विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. लोकशाहीत जनमताचा कौल महत्त्वाचा मानला जातो. यादृष्टीने विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जनमत चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये जनमताचा उत्स्फूर्त कौल मिळाला. उर्वरित सात जिल्ह्यातही लवकरच जनमत चाचण्या घेण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. ४ आणि ५ सप्टेंबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नागपुरात अधिवेशन आयोजित आहे. केंद्र शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार समितीने केला आहे. पत्रपरिषदेला वामनराव चटप, श्रीनिवास खांदेवाले, दीपक निलावार, प्रफुल्ल पाटील, जगदीश नाना बोंडे, अरुण केदार, प्रवीण महाजन, रामभाऊ नेवले, चंद्रशेखर देशमुख, नितीन मोहोड, दीपक सब्जीवाले, माया पाटील, पुसदेकर, रंजना मामर्डे, संजय कोल्हे, नंदा पराते यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)