शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ राज्याची मागणी दिल्लीत रेटणार

By admin | Updated: July 15, 2014 01:06 IST

१०८ वर्षे जुनी असलेल्या वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीकडे आतापर्यंत सर्वच राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे आता या मागणीसाठी २४ जुलै रोजी थेट दिल्लीतच जंतर मंतरवर विदर्भ राज्य

पत्रपरिषद : विदर्भ राज्य आंदोलन समितीची माहितीअमरावती : १०८ वर्षे जुनी असलेल्या वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीकडे आतापर्यंत सर्वच राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे आता या मागणीसाठी २४ जुलै रोजी थेट दिल्लीतच जंतर मंतरवर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने धरणे देऊन ही मागणी पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याकडे रेटून धरणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रमुख वामनराव चटप, रामभाऊ नेवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. समितीच्या विभागीय कार्यकर्ता मेळाव्यासाठी ते शहरात आले होते. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित मेळाव्यात पुढे बोलताना ते म्हणाले, विदर्भ राज्यसाठी अहिंसेच्या मार्गाने आतापर्यंत अनेक आंदोलने केलीत; मात्र दखल घेण्यात आली नाही. जुनीच मागणी असलेल्या विदर्भ राज्याकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष करुन तेलंगणा राज्य नव्याने निर्माण केले. विदर्भाच्या बाबतीत केंद्र व राज्य शासनाने नेहमीच अन्यायाची भूमिका घेतली आहे. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष कायम आहे. आतापर्यंत केवळ पश्चिम महाराष्ट्राचाच विकास करण्यात राज्यकर्त्यांनी धन्यता मानली. त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार विधानसभा निवडणुकीपूर्वी विदर्भ राज्य निर्माण करण्याबाबत घोषणा करावी, त्यानंतर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणीही पंतप्रधानांकडे केली जाणार असल्याचे चटप यांनी सांगितले. जंतर मंतरवर होणाऱ्या धरणे आंदोलनात विदर्भातील ११ जिल्ह्यांतून प्रत्येकी १०० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. विदर्भातील खासदारांनी आंदोलनाला भेट देऊन त्यांची भूमिका आंदोलनस्थळी स्पष्ट करण्याची आमची मागणी आहे. याचवेळी विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी तेलंगणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या राज्यातील खासदारांचाही पाठींबा मागण्यात आला आहे.या आंदोलनाला विदर्भातील विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. लोकशाहीत जनमताचा कौल महत्त्वाचा मानला जातो. यादृष्टीने विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जनमत चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये जनमताचा उत्स्फूर्त कौल मिळाला. उर्वरित सात जिल्ह्यातही लवकरच जनमत चाचण्या घेण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. ४ आणि ५ सप्टेंबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नागपुरात अधिवेशन आयोजित आहे. केंद्र शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार समितीने केला आहे. पत्रपरिषदेला वामनराव चटप, श्रीनिवास खांदेवाले, दीपक निलावार, प्रफुल्ल पाटील, जगदीश नाना बोंडे, अरुण केदार, प्रवीण महाजन, रामभाऊ नेवले, चंद्रशेखर देशमुख, नितीन मोहोड, दीपक सब्जीवाले, माया पाटील, पुसदेकर, रंजना मामर्डे, संजय कोल्हे, नंदा पराते यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)