शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात वस्त्रोद्योगाला चालना देणार

By admin | Updated: January 18, 2015 00:56 IST

विदर्भात मोठ्या प्रमाणात कापूस पिकत असतानाही त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी या भागात वस्त्रोद्योगाला चालना देण्याची

वस्त्रोद्योग परिषदेत गडकरींची ग्वाही : संशोधनावर भर देण्याचे आवाहननागपूर : विदर्भात मोठ्या प्रमाणात कापूस पिकत असतानाही त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी या भागात वस्त्रोद्योगाला चालना देण्याची गरज असून यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.टेक्सटाईल्स असोसिएशन आॅफ इंडियाच्या विदर्भ शाखेतर्फे येथील देशपांडे सभागृहात आयोजित १२ व्या आंतरराष्ट्रीय आणि ७० व्या अ.भा. टेक्सटाईल्स कॉन्फरन्सच्या उद््घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून नितीन गडकरी बोलत होते. व्यासपीठावर माजी खा. दत्ता मेघे, माजी आमदार गिरीश गांधी यांच्यासह टेक्सटाईल्स असो.चे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद सिन्हा, उपाध्यक्ष के.डी. सिंघवी, माजी अध्यक्ष डी.आर. मेहता, सी.डी. मायी, कॉन्फरन्सचे अध्यक्ष हेमंत सोनारे, हरीश पारेख, व्ही.डी. झोपे, आर.के. दुबे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अजय पाटील उपस्थित होते.गडकरी म्हणाले की, ‘कापूस ते कापड’ असे स्वप्न या भागातील शेतकऱ्यांनी पाहिले होते. त्यातून रोजगार निर्मितीची अपेक्षा होती. मात्र दुर्दैवाने ते पूर्ण झाले नाही. यासाठी या भागातील राजकीय नेतृत्वाचेही अपयश कारणीभूत आहे. या भागात वस्रोद्योगाला चालना द्यायची असेल तर पारंपरिक उपाययोजनांना तिलांजली देऊन नवीन संशोधनावर भर द्यावा लागेल. त्यादृष्टीने टेक्सटाईल असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न व्हावे. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू.उद्योगक्षेत्राला चालना देतानाच उद्योगाविषयी मानसिकता बदलावर गडकरी यांनी भर दिला. उद्योग सुरू होण्याऐवजी तो बंद कसा पडेल असेच प्रयत्न अलीकडच्या काळात केले जाते. कधी सरकारी अधिकारी अडथळे आणतात तर कधी त्यासाठी स्थानिक कारणे असतात. उद्योग सुरळीत चालला पाहिजे अशी मानसिकता निर्माण व्हवी. गुंतवणूक वाढली तर रोजगार वाढेल व रोजगार वाढला तर दरडोई उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी सुखी होईल. यासाठी प्रत्येक गावात कापसापासून सूत काढण्याचे तंत्रज्ञान विकसित व्हावे, उद्योगाकडून सूत खरेदीची व्यवस्था व्हावी, या दृष्टीनेही प्रयत्न होण्याची गरज आहे, असे गडकरी म्हणाले.प्रास्ताविक हेमंत सोनारे यांनी केले. या परिषदेचा हेतू त्यांनी स्पष्ट केला. यावेळी अरविंद सिन्हा, डी.आर. मेहता यांची भाषणे झाली. दोन दिवस ही परिषद चालणार आहे. (प्रतिनिधी)नांदेडजवळ वॉटर पोर्टनांदेडजवळ वॉटर पोर्ट तयार करून तेथून विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस दक्षिणेत पाठविण्याची सोय उपलब्ध करून देऊ. यामुळे कापूस वाहतुकीचा खर्च कमी होईल, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.यांचा झाला सत्कारटेक्सटाईल असोसिएशनतर्फे कार्यक्रमात शेतकऱ्यांपासून तर उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात वसंत भोंगाडे (सिंदी-जि. वर्धा) अरेंद्रम बासू, हरीश पारेख, ए.व्ही. मंत्री, आर.आर. अग्रवाल यांचा समावेश होता. असोसिएशनच्या दिल्ली शाखेला ‘बेस्ट युनिट’ ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.