शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
6
वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
7
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
8
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
9
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
10
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
11
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
12
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
13
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
14
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
15
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
16
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
17
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
18
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
19
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
20
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती

मराठवाड्यासह विदर्भावर दुष्काळाचे ढग दाटले!

By admin | Updated: November 21, 2014 01:55 IST

राज्यातील पन्नासपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १९ हजार ५९ गावांपैकी सुमारे १७ हजार गावे विदर्भ व मराठवाड्यातील असल्याचे समोर आले आहे

पुणे : राज्यातील पन्नासपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १९ हजार ५९ गावांपैकी सुमारे १७ हजार गावे विदर्भ व मराठवाड्यातील असल्याचे समोर आले आहे. तसेच पावसाअभावी गेल्या वर्षी पेक्षा येथील जलसाठाही अत्यल्प असल्याने दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली़ पावसाने ओढ दिल्याने व परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम संकटात आहे. याशिवाय पावसाअभावी व भू-जल उपशावर नियंत्रण नसल्याने सुमारे सहा हजार गावांतील पाणीपातळी कमालीची घटली आहे़ यंदा रब्बी हंगाम देखिल अडचणीत सापडला आहे़ कोकण व पुणे विभाग वगळता उर्वरित महाराष्ट्रावर तीव्र दुष्काळाचे सावट आहे. अवकाळी पावसाने काही पिकांना दिलासा दिला असला तरी ५० हजार हेक्टरवरील डाळिंब, द्राक्ष, भात, केळी, सोयाबीन, नागली व भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.नुकतीच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या जाहीर केली आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्णात सर्वाधिक २ हजार ५० गावे प्रभावित झाली असून, सोलापुर जिल्ह्णात ८० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर खरिपाची लागवड झाली नसल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)