शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वखार महामंडळ घोटाळ्याचा अकोला येथे बळी

By admin | Updated: February 5, 2016 04:10 IST

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात कंत्राटदारांचे रॅकेट सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारत असून नवीन कंत्राटदारांच्या निविदा मंजूर होणारच नाहीत,

यदु जोशी/ नितीन गव्हाळे , मुंबई/ अकोलामहाराष्ट्र राज्य वखार महामंडळात कंत्राटदारांचे रॅकेट सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारत असून नवीन कंत्राटदारांच्या निविदा मंजूर होणारच नाहीत, अशा पद्धतीने संगनमत केले जात असल्याचे ‘लोकमत’ने दिलेले वृत्त ताजे असतानाच या रॅकेटचा फटका बसलेल्या अकोला येथील एका कंत्राटदाराने दोन दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली.संतोष सावजी (४२) असे या कंत्राटदाराचे नाव असून, ‘मी टेंडर भरायला नको होते. ते भरण्याची मी चूक केली. मोठमोठ्या लोकांमध्ये मी मोठ्या रकमेचे टेंडर भरले. माझ्या कुटुंबाला वाचविण्यासाठी मी आत्महत्या करीत आहे,’ असे सावजी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. सावजी हे वखार महामंडळाच्या अन्नधान्य वाहतुकीच्या निविदा नियमितपणे भरत असत. गेली १०-१२ वर्षे ते या व्यवसायात होते. मात्र अलीकडे सावजी हे काही बड्या कंत्राटदारांच्या जाचाला त्रासले होते. त्यांनी जादा दराच्या निविदा भराव्यात किंवा निविदाच भरू नयेत, यासाठी त्यांच्यावर सातत्याने दबाव येत होता, अशी माहिती आहे.वखार महामंडळातील कंत्राटदार, पुणे येथील मुख्यालयाचे अधिकारी आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांतील काही अधिकारी यांच्या संगनमताने विशिष्ट कंत्राटदारांचेच चांगभले होत असल्याची उघड चर्चा आहे. तसेच गेल्या ६-७ वर्षांत अव्वाच्या सव्वा दराने अन्नधान्य पुरवठ्याची कंत्राटे देण्यात आली. यात गब्बर झालेले कंत्राटदार लहान कंत्राटदारांची मुस्कटदाबी करतात. या सगळ्या प्रकाराच्या तक्रारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुणे, धुळे, जालना, लातूर, जळगाव आदी ठिकाणांहून करण्यात आल्या आहेत.संतोष सावजी यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असता, त्यांच्या बंधूंनी सांगितले की, संतोष यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या मजकुराची आणि त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. माझे बंधू संतोष हे काही दिवसांपासून दबावाखाली होते. त्यांना कोणत्या कंत्राटदारांचा त्रास होता, त्यांच्या कुटुंबाला संपविण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या का, याचीही चौकशी होण्याची गरज आहे.वखार महामंडळात कोट्यवधी रुपयांचा वाहतूक दर घोटाळा झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २० आणि २१ जानेवारीच्या अंकात दिले होते.