शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

अपिली निकालाविरुद्ध अपील करण्याचाही पीडितास अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 04:54 IST

मुंबई हायकोर्टाचा निकाल

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ३७२ मध्ये सन २००९ मध्ये दुरुस्ती करून फौजदारी गुन्ह्यातील पीडित व्यक्तस बहाल करण्यात आलेला अपील करण्याचा अधिकार फक्त मूळ खटला चालविणाऱ्या न्यायालयाच्या निकालाविरुद्ध अपिली न्यायालयात अपील करण्यापुरता मर्यादित नाही. या दुरुस्तीनुसार पीडित व्यक्ती अपिली न्यायालयाच्या निकालाविरुद्धही त्याहून वरच्या न्यायालयात अपील करू शकते, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच दिला.रामदास निवृत्ती मोरे या पुण्यातील एका गुन्हे पीडितीने केलेल्या अपिलात न्या. संभाजी शिवाजी शिंदे व न्या. नितीन भगवंतराव सूर्यवंशी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. अपिली निकालाविरुद्ध अपील करण्याचा पीडित व्यक्तीचा अधिकार देशातील अन्य उच्च न्यायालयांनी अमान्य केलेला असताना मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल प्रथमच दिला आहे.कायद्यातील तरतूद आणि ही दुरुस्ती करण्यामागचा मूळ उद्देश याचा एकत्रित परामर्श घेत खंडपीठाने म्हटले की, या दुरुस्तीपूर्वी गुन्ह्याच्या पीडित व्यक्तीस मूळ खटला चालविणाºया न्यायालयाच्या निकालाविरुद्ध अपील करण्याचा अधिकार नव्हता. त्यांना कलम ४०१ अन्वये फक्त पुनरिक्षण अर्ज करता येत असे. परंतु असा पुनरिक्षण अर्ज मंजूर केला तरी मुळात निर्दोष सोडलेल्या आरोपींना शिक्षा देता येत नसल्याने दाद मागण्याचा हा मार्ग परिणामकारक ठरत नव्हता. त्यामुळे विधी आयोगाने केलेली शिफारस मान्य करून पीडितांना हा अधिकार बहाल करण्यात आला. मात्र हा अधिकार फक्त अपिली न्यायालयात अपील करण्यापुरताच आहे, असा अर्थ लावला तर कायद्यात दुरुस्ती करण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाईल. त्यामुळे अपिली न्यायालयाच्या निकालाविरुद्ध त्यावरच्या न्यायालयातही अपील करण्याचाही अधिकार पीडितास आहे, असा या दुरुस्तीचा अर्थ लावणे अधिक सयुक्तिक व न्यायाचे ठरेल.मूळ खटला चालविणाºया न्यायालयाच्या निकालाविरुद्ध पीडित व्यक्तिने अपिली न्यायालयात अपील केले नसले तरी त्यामुळे अपिली न्यायालयाच्या निकालाविरुद्ध त्याही वरच्या न्यायालयात अपील करण्याचा पीडिताचा हक्क नाकारला जाऊ शकत नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.या सुनावणीत अपिलकर्त्या पीडित व्यक्तीसाठी अ‍ॅड. अनिकेत उज्ज्वल निकम व अ‍ॅड. आशीश सातपुते यांनी, मूळ आरोपींतर्फे अ‍ॅड. सत्यव्रत जोशी यांनी तर सरकारतर्फे अतिरिक्त पब्लिक प्रॉसिक्युटर श्रीमती एम. एम. देशमुख यांनी काम पाहिले.काय होता नेमका वाद?फिर्यादी रामदास मोरे यांनी सन २००३ मध्ये दाखल केलेल्या फिर्यादीवरून विजय शिवराम मोरे, संगीता विजय मोरे, सगुणाबाई शिवराम मोरे, वासंतीरामदास महांगरे व सीताराम लक्ष्मण तळेकर यासहा आरोपींविरुद्ध पुण्याच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे फौजदारी खटला चालला.त्या न्यायालयाने आरोपींना भादंवि कलम ३२४ व १४९ अन्वये दोन वर्षे साधी कैद आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंड तर कलम ३२३, १४७, १४८, ५०४, ५०६ सह कलम १४९ अन्वये एक वर्ष साधी कैद व प्रत्येकी एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.या निकालाविरुद्ध मूळ फिर्यादीने कोणतेही अपील केले नाही. मात्र आरोपींनी सत्र न्यायालयात अपील केले. ते मंजूर करून त्यांना निर्दोष मुक्त केले गेले.सत्र न्यायालयाच्या या निकालाविरुद्ध फिर्यादी रामदास मोरे यांनी उच्च न्यायालयात अपील केले. त्यात आरोपींच्या वतीने असे अपील करता येणार नाही, असा आक्षेप घेण्यात आला. तो आक्षेप फेटाळताना उच्च न्यायालयाने वरीलप्रमाणे निकाल दिला.