शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडाच्या वाहनाला एसटीची धडक ४ ठार ४९ जखमी

By admin | Updated: July 13, 2016 01:32 IST

राष्ट्रीय महामार्गावरील व्याळानजीक घटना; ४९ जण जखमी.

व्याळा (जि. अकोला): अकोला शहराकडे लग्नाचे वर्‍हाड घेऊन येणार्‍या वाहनाला भरधाव एसटी बसने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ४ जण ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील व्याळा गावानजीक घडली. या घटनेत चालकासह तीन वर्‍हाडी जागीच ठार झाले असून ४९ जण जखमी झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे येथील काटे परिवार लग्न सोहळ्य़ासाठी खासगी वाहनाने (एमएच २0 ई-८४६९)अकोला शहराकडे येत होता. यावेळी अकोला ते अंबड (जालना) जाणार्‍या एसटी बस (क्रमांक एमएच २0-बीएल २२१२) चालकाचे नियंत्रण सुटल्याने वर्‍हाडींच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत वर्‍हाडींना घेऊन जाणार्‍या वाहनाच्या चालकासह अरुण तुकाराम काटे (३५), दीपक अर्जुन लेनेकर (४0), प्रभू शंकर गवळी (४२) तीन वर्‍हाडी जागीच ठार झाले, तर रुग्णालयात उपचारादरम्यान रवी मोतीराम शहाणे (३८) सर्व राहणार धामणगाव बढे यांचा मृत्यू झाला. उर्वरित ३३ वर्‍हाडी गंभीर जखमी झाले असून एसटीतील एका चिमुकल्या मुलासह १४ प्रवासी जखमी झाले आहेत. वर्‍हाडींच्या वाहनाला धडक दिल्यानंतर एसटी बस सुमारे शंभर फूट दूर अंतरावर जाऊन रस्त्यालगतच्या शेतात कोसळली. अपघात होताच महामार्गावरील मालवा धाबा तसेच अंबुजा फॅक्टरीत आलेल्या ट्रक चालकांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघातातील दोन गंभीर जखमींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.