शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

वर्सोवा पूल बनला धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2016 02:48 IST

१९६६-७० साली मुंबई-अहमदाबाद हायवेवर घोडबंदरनजिक वसई खाडीवर बांधण्यात आलेला पूल अतिशय धोकादायक स्थितीत

शशी करपे,

वसई- १९६६-७० साली मुंबई-अहमदाबाद हायवेवर घोडबंदरनजिक वसई खाडीवर बांधण्यात आलेला पूल अतिशय धोकादायक स्थितीत असून यावरून अवजड वाहनांना वाहतूकीला प्रतिबंध करावा असे पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्हाधिकाऱ्यांना ११ जुलै २०१४ रोजी दिले होते. मात्र, त्यानंतरही या पूलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.वसई खाडीवर घोडबंदरनजिक १९६६ साली पूलाचे बांधकाम सुरु होऊन १९७० साली पूलाचे बांधकाम पूर्ण होऊन त्यावरून वाहतूक सुरु करण्यात आली. वर्सोवा पूल म्हणून परिचित असलेल्या पूलाला वसई खाडी पूल असेही म्हटले जाते. त्याकाळच्या वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन बांधण्यात आलेल्या या पूलावरून सध्या कितीतरी अधिक पटीने वाहतूक सुरु आहे. त्यात अवजड वाहनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुंबई-सूरत मार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर या पूलाच्या शेजारी नवा पूल बांधण्यात आली. त्यानंतर दोन्ही पूलावरुन एकेरी वाहतूक सुरु झाली.सध्या पूलाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. संरक्षक कठडेही अनेक ठिकाणी तुटले आहेत. डिसेंबर २०१३ ला या पूलाच्या एका गर्डरला तडा गेल्याचे लक्षात आल्यानंतर या पुलावरील वाहतूक तब्बल साडेतीन-चार महिने बंद ठेवण्यात आली होती. तडे गेलेला गर्डर बदलून त्याजागी नवीन ४८ मीटरलांबीचा गर्डर बसवण्यात आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली होती. याआधी १९८९ साली पूलाची दुरुस्ती आणि मजबूतीकरण करण्यात आले होते. त्यानंतर २००० मध्ये पुन्हा पुलाची दुरुस्ती आणि मजबूतीकरण करण्यात आले होते.नवा गर्डर बसवण्यात आल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तत्कालीन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसह राज्यसरकारच्या संबंधित खात्यांना ११ जुलै २०१४ रोजी पत्र पाठवून पूलासंबंधी अनेक सूचना केल्या आहेत. त्यात १५ टनांहून अधिक क्षमतेच्या वाहनांना या पूलावरून वाहतूक करण्यास बंदी घालण्याची सूचना केली आहे. एनएच-८ हा राष्ट्रीय महामार्ग आर्थिक उलाढालीच्या दृष्टीने महत्त्वाचा महामार्ग समजण्यात येतो. त्यामुळे महामार्गावरून सतत अवजड वाहने ये-जा करीत असतात.>फक्त हलक्या वाहनांना प्रवेश द्यावा!पुलाच्या बांधकामाची रचना ही तेव्हाच्या वाहतुकीचा लक्षात घेऊन करण्यात आली होती. मात्र आता वाहनांची आणि त्यातही मोठ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. ते पाहता पूल धोकादायक आणि मोठ्या अपघातास कारण ठरू शकतो. कारण या पुलास पुन्हा तडे गेले आहेत. परिणामी या पुलावरून मोठ्या अवजड वाहनांना वाहतूक करण्यास तत्काळ बंदी घालावी. या पुलावरून फक्त दुचाकी, तीनचाकी, चारचाकी यासारख्या हलक्या वाहनांनाच प्रवेश द्यावा. तसेच अवजड वाहने (१५ टनाहून अधिक सामान नेणारी वाहने) या पुलावरून ये-जा करणार नाहीत, या दृष्टीने संबंधित आरटीओ विभागाने योग्य ती यंत्रणा उभारावी. कारण मोठ्या वाहनांची या पुलावरून ये-जा सुरू राहिली तर एखादी मोठी दुर्घटना घडू शकते. तसेच या पुलावर कोणत्याही वाहनाच्या पार्किंगवरही तातडीने निर्बंध घालावेत, असे प्राधिकरणाने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.