शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

वर्सोवा पूल बनला धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2016 02:48 IST

१९६६-७० साली मुंबई-अहमदाबाद हायवेवर घोडबंदरनजिक वसई खाडीवर बांधण्यात आलेला पूल अतिशय धोकादायक स्थितीत

शशी करपे,

वसई- १९६६-७० साली मुंबई-अहमदाबाद हायवेवर घोडबंदरनजिक वसई खाडीवर बांधण्यात आलेला पूल अतिशय धोकादायक स्थितीत असून यावरून अवजड वाहनांना वाहतूकीला प्रतिबंध करावा असे पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्हाधिकाऱ्यांना ११ जुलै २०१४ रोजी दिले होते. मात्र, त्यानंतरही या पूलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.वसई खाडीवर घोडबंदरनजिक १९६६ साली पूलाचे बांधकाम सुरु होऊन १९७० साली पूलाचे बांधकाम पूर्ण होऊन त्यावरून वाहतूक सुरु करण्यात आली. वर्सोवा पूल म्हणून परिचित असलेल्या पूलाला वसई खाडी पूल असेही म्हटले जाते. त्याकाळच्या वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन बांधण्यात आलेल्या या पूलावरून सध्या कितीतरी अधिक पटीने वाहतूक सुरु आहे. त्यात अवजड वाहनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुंबई-सूरत मार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर या पूलाच्या शेजारी नवा पूल बांधण्यात आली. त्यानंतर दोन्ही पूलावरुन एकेरी वाहतूक सुरु झाली.सध्या पूलाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. संरक्षक कठडेही अनेक ठिकाणी तुटले आहेत. डिसेंबर २०१३ ला या पूलाच्या एका गर्डरला तडा गेल्याचे लक्षात आल्यानंतर या पुलावरील वाहतूक तब्बल साडेतीन-चार महिने बंद ठेवण्यात आली होती. तडे गेलेला गर्डर बदलून त्याजागी नवीन ४८ मीटरलांबीचा गर्डर बसवण्यात आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली होती. याआधी १९८९ साली पूलाची दुरुस्ती आणि मजबूतीकरण करण्यात आले होते. त्यानंतर २००० मध्ये पुन्हा पुलाची दुरुस्ती आणि मजबूतीकरण करण्यात आले होते.नवा गर्डर बसवण्यात आल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तत्कालीन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसह राज्यसरकारच्या संबंधित खात्यांना ११ जुलै २०१४ रोजी पत्र पाठवून पूलासंबंधी अनेक सूचना केल्या आहेत. त्यात १५ टनांहून अधिक क्षमतेच्या वाहनांना या पूलावरून वाहतूक करण्यास बंदी घालण्याची सूचना केली आहे. एनएच-८ हा राष्ट्रीय महामार्ग आर्थिक उलाढालीच्या दृष्टीने महत्त्वाचा महामार्ग समजण्यात येतो. त्यामुळे महामार्गावरून सतत अवजड वाहने ये-जा करीत असतात.>फक्त हलक्या वाहनांना प्रवेश द्यावा!पुलाच्या बांधकामाची रचना ही तेव्हाच्या वाहतुकीचा लक्षात घेऊन करण्यात आली होती. मात्र आता वाहनांची आणि त्यातही मोठ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. ते पाहता पूल धोकादायक आणि मोठ्या अपघातास कारण ठरू शकतो. कारण या पुलास पुन्हा तडे गेले आहेत. परिणामी या पुलावरून मोठ्या अवजड वाहनांना वाहतूक करण्यास तत्काळ बंदी घालावी. या पुलावरून फक्त दुचाकी, तीनचाकी, चारचाकी यासारख्या हलक्या वाहनांनाच प्रवेश द्यावा. तसेच अवजड वाहने (१५ टनाहून अधिक सामान नेणारी वाहने) या पुलावरून ये-जा करणार नाहीत, या दृष्टीने संबंधित आरटीओ विभागाने योग्य ती यंत्रणा उभारावी. कारण मोठ्या वाहनांची या पुलावरून ये-जा सुरू राहिली तर एखादी मोठी दुर्घटना घडू शकते. तसेच या पुलावर कोणत्याही वाहनाच्या पार्किंगवरही तातडीने निर्बंध घालावेत, असे प्राधिकरणाने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.