शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

आवक वाढूनही भाज्या महागच!

By admin | Updated: June 7, 2017 05:57 IST

शेतकरी संपामुळे बंद असलेल्या राज्यातील बहुतांश बाजार समित्यांचे व्यवहार आता पूर्ववत झाले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी संपामुळे बंद असलेल्या राज्यातील बहुतांश बाजार समित्यांचे व्यवहार आता पूर्ववत झाले असून मुंबई बाजार समितीत मंगळवारी १३६१ ट्रक भाजीपाला, फळे व इतर शेतीमालाची आवक झाली. मात्र, तरीही महानगरात भाजीटंचाई कायम असल्याने हा भाजीपाला जातो कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.बाजारातील आवक आणि जावक पूर्ववत झाली असताना येणारी फळं आणि भाजीपाला जातो कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीमालाच्या हमीभावासाठी शेतकरी संपावर गेलेले असताना व्यापारी मात्र चढ्या भावाने भाज्या व फळांची विक्री करत असल्याचे दिसून येते. व्यापारी, पंचतारांकित हॉटेल्स आणि काही खासगी संस्थांनी शीतगृहांमध्ये भाजी व फळांची साठवणूक वाढवल्याने मुंबईत टंचाई निर्माण झाल्याचे किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पोलीस बंदोबस्तात पश्चिम महाराष्ट्र व गुजरातहून दुधाचे टँकर्स मुंबईत येत असताना दुधाची टंचाई कायम आहे.संपाच्या सहाव्या दिवशी शेतकऱ्यांनी आंदोलन अधिक आक्रमक करत सरकारी कार्यालयांना टाळे ठोकले. त्यामुळे काही ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. दूध संकलन पूर्ववत सुरू झाले असले तरी भाज्यांचे दर गगनला भिडले आहेत. सोमवारचा बंद यशस्वी झाल्यानंतर मंगळवारी शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयांकडे मोर्चा वळवला. अनेक ठिकाणी कार्यालयांना प्रतीकात्मक स्वरूपात टाळे ठोकले. कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर, नाशिक आणि मराठवाड्यात संपाची तीव्रता कायम आहे. विदर्भात सर्व व्यवहार पूर्ववत झाले असून खान्देशातून आज मोठ्या प्रमाणात भाजीपाला मुंबईत आला. संपामुळे दूध-भाज्यांची आवक ठप्प होऊ नये म्हणून सातारा जिल्हा पोलिसांनी पुणे-बंगलोर महामार्गावर ४00 पोलीस तैनात केले आहेत.सोमवारपासून दूधपुरवठा सुरळीत झाला असून, भाजीपाल्याची आवकही वाढली आहे. मुंबई बाजार समितीत मंगळवारी १३६१ ट्रक भाजीपाला आला असल्याची माहिती मुख्य प्रशासक सतीश सोनी यांनी दिली.>मुंबई बाजार समितीतील आवकप्रकारएकूण ट्रकफळे३९१भाजीपाला४४२कांदा९१बटाटा५६लसूण१२मसाले११८धान्य२५१एकूण १३६१