शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आवक वाढूनही भाज्या महागच!

By admin | Updated: June 7, 2017 05:57 IST

शेतकरी संपामुळे बंद असलेल्या राज्यातील बहुतांश बाजार समित्यांचे व्यवहार आता पूर्ववत झाले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी संपामुळे बंद असलेल्या राज्यातील बहुतांश बाजार समित्यांचे व्यवहार आता पूर्ववत झाले असून मुंबई बाजार समितीत मंगळवारी १३६१ ट्रक भाजीपाला, फळे व इतर शेतीमालाची आवक झाली. मात्र, तरीही महानगरात भाजीटंचाई कायम असल्याने हा भाजीपाला जातो कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.बाजारातील आवक आणि जावक पूर्ववत झाली असताना येणारी फळं आणि भाजीपाला जातो कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीमालाच्या हमीभावासाठी शेतकरी संपावर गेलेले असताना व्यापारी मात्र चढ्या भावाने भाज्या व फळांची विक्री करत असल्याचे दिसून येते. व्यापारी, पंचतारांकित हॉटेल्स आणि काही खासगी संस्थांनी शीतगृहांमध्ये भाजी व फळांची साठवणूक वाढवल्याने मुंबईत टंचाई निर्माण झाल्याचे किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पोलीस बंदोबस्तात पश्चिम महाराष्ट्र व गुजरातहून दुधाचे टँकर्स मुंबईत येत असताना दुधाची टंचाई कायम आहे.संपाच्या सहाव्या दिवशी शेतकऱ्यांनी आंदोलन अधिक आक्रमक करत सरकारी कार्यालयांना टाळे ठोकले. त्यामुळे काही ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. दूध संकलन पूर्ववत सुरू झाले असले तरी भाज्यांचे दर गगनला भिडले आहेत. सोमवारचा बंद यशस्वी झाल्यानंतर मंगळवारी शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयांकडे मोर्चा वळवला. अनेक ठिकाणी कार्यालयांना प्रतीकात्मक स्वरूपात टाळे ठोकले. कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर, नाशिक आणि मराठवाड्यात संपाची तीव्रता कायम आहे. विदर्भात सर्व व्यवहार पूर्ववत झाले असून खान्देशातून आज मोठ्या प्रमाणात भाजीपाला मुंबईत आला. संपामुळे दूध-भाज्यांची आवक ठप्प होऊ नये म्हणून सातारा जिल्हा पोलिसांनी पुणे-बंगलोर महामार्गावर ४00 पोलीस तैनात केले आहेत.सोमवारपासून दूधपुरवठा सुरळीत झाला असून, भाजीपाल्याची आवकही वाढली आहे. मुंबई बाजार समितीत मंगळवारी १३६१ ट्रक भाजीपाला आला असल्याची माहिती मुख्य प्रशासक सतीश सोनी यांनी दिली.>मुंबई बाजार समितीतील आवकप्रकारएकूण ट्रकफळे३९१भाजीपाला४४२कांदा९१बटाटा५६लसूण१२मसाले११८धान्य२५१एकूण १३६१