शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भाजीपाल्यांचे भाव कडाडले

By admin | Updated: September 21, 2016 02:21 IST

गणेशोत्सव संपून पितृपंधरवडा सुरू झाल्याने सांगवी, पिंपळे गुरव व दापोडी परिसरात पालेभाज्यांचे भाव कडाडल्याचे चित्र दिसत आहे.

पिंपळे गुरव : गणेशोत्सव संपून पितृपंधरवडा सुरू झाल्याने सांगवी, पिंपळे गुरव व दापोडी परिसरात पालेभाज्यांचे भाव कडाडल्याचे चित्र दिसत आहे. भाजीविक्रीच्या ठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. घरातील व्यक्तीचे निधन झाल्यास त्याचे स्मरण करून त्याच्या आत्म्यास शांती लाभावी, यासाठी सग्या-सोयऱ्यांना भोजन दिले जाते. भोजनामध्ये विविध पालेभाज्यांचा समावेश असतो. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे मेथी, कारले, गवार, मिरची, खीर, चपाती, अळू, पुरण पोळी हे भोजनातील पदार्थ असतात. पितृपंधरवड्यात मांसाहार वर्ज्य करून धार्मिक विधी केले जातात. जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईच्या भस्मासुरांमुळे १०० नागरिकांचे जेवण घालण्यास १० हजार रुपयांच्या पुढे खर्च येतो. एवढ्या महागड्या वस्तू खरेदी करणे काही कुटुंबांच्या आवाक्याबाहेर जात आहे. किराणा वस्तू व पालेभाज्यांची खरेदी करणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे केवळ फक्त ठरावीक जवळच्या नातेवाइकांना पितृपंधरवाड्याचे भोजन देऊन कोणताही डामडौल न करता थोडक्या नातेवाइकांवरच कार्यक्रम पार पाडण्याचे चित्र बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे. सध्या पितृपक्ष सुरूझाला असून, पितृपक्षाच्या कार्यक्रमात नैवेद्यासाठी आवश्यक असणाऱ्या भाजीपाल्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली असून, सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. यामध्ये महिला गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. (वार्ताहर)> आवश्यक भाजीपाला गुलटेकडी, खडकी मार्केट येथून आणावा लागतो. सध्या पावसाची संततधार असल्यामुळे भाज्यांची आवक कमी प्रमाणात आहे. भाजीपाल्यांचे ठोक किमती वाढल्याने, तसेच घेतलेल्या भाज्यांची इंधन वाहतूक वाढली आहे. त्यातच पितृपंधरवड्यामुळे लागणाऱ्या सर्व प्रकारच्या भाज्या विक्रीसाठी ठेवाव्या लागतात. ग्राहक मात्र भाज्यांच्या किमतीसाठी घासाघीस करतात. - नारायण बर्गे, भाजीविके्रते, पिंपळे गुरव>पितृपंधरवड्यामुळे पालेभाज्यांचे भाव कडाडल्याने भोजन देणाऱ्या खाणावळचालकांनी चांगलाच धसका घेतला आहे. आठवडाभरापूर्वी खाणावळीमध्ये तीन भाज्या असायच्या. आता मात्र एक किंवा दोनच भाज्या द्याव्या लागत आहेत. पितृपंधरवड्यासाठी लागणाऱ्या भेंडी, दुधी भोपळा, बटाटे, तसेच तूर डाळ, हरभरा डाळ, साखर, तेल, बेसनपीठ आदींचे भाव वाढल्याने मोठ्या खाणावळ चालकांनी धसका घेतला आहे. - अप्पा कदम, खाणावळचालक, नवी सांगवी