शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

मुंबईतील भाजीपाल्यात स्वस्ताई कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 11:52 IST

फळे,भाजीपाला : मुंबईमधील भाजीपाला व फळ मार्केटमध्ये बाजारभाव घसरू लागले आहेत.

मुंबईमधील भाजीपाला व फळ मार्केटमध्ये बाजारभाव घसरू लागले आहेत. एक आठवड्यापासून १३० टन संत्रा व ३०० ते ४०० टन मोसंबीची आवक होऊ लागली आहे. अमरावती, नगर व शिरूर परिसरातून संत्र्यांची आवक होत असून, होलसेल मार्केटमध्ये ६ ते ३६ रुपये किलो दराने विक्री होत आहे.

मोसंबी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून व आंध्र प्रदेशमधून येत असून ६ ते २६ रुपये किलो दराने विकली जात आहे. भाजी मार्केटमध्येही बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. कोबी, टोमॅटो,फ्लॉवर व इतर वस्तूंची आवक वाढली आहे. सप्टेंबरच्या तुलनेमध्ये ४० ते ५० टक्के दर कमी झाले आहेत. चवळी शेंग १६ ते २० रुपयांवरून ८ ते १२ रुपये, फ्लॉवर २० ते २२ वरून ८ ते १२ रुपये किलो दराने विकली जात आहे. भाजी व फळ मार्केटमधील दर आटोक्यात असल्यामुळे हीच स्वस्ताई दसरा व दिवाळी संपेपर्यंत कायम राहावी, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र