शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने वसईत स्वच्छता अभियान

By admin | Updated: March 2, 2017 03:18 IST

वसई तालुक्यातून ५३११ किलो ओला व ४७९६१ किलो सुका कचरा संकलित करण्यात आला.

वसई : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात संपूर्ण वसई तालुक्यातून ५३११ किलो ओला व ४७९६१ किलो सुका कचरा संकलित करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत ६ हजार ४७९ सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सौजन्याने १ मार्च रोजी संपूर्ण देशातील सरकारी कार्यालयांच्या आवारात तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांची स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. ही स्वच्छता मोहिम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत तथा डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आली होती. प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याची दखल घेवून भारत सरकारने नुकतेच २६ जानेवारी २०१७ रोजी प्रजासत्ताक दिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना भारत सरकारचा पद्माश्री पुरस्कार घोषित केला आहे. प्रतिष्ठानच्या सौजन्याने मागील गेली अनेक वर्षे सतत व्यापक स्वरुपात स्वछता अभियान राबविण्यात येत असते. वसई तालुक्यातील अनेक गावांमध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमे अंतर्गत शहर व गावातील रस्ते, सरकारी कार्यालये अशा विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. यासाठी स्वयंसेवकांना हात मोजे, मास्क, झाडू, ग्लोव्हज इत्यादि साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरविण्यात आली होती.संपूर्ण तालुक्यातून ५३११ किलो ओला व ४७९६१ किलो सुका कचरा असा मिळून एकूण ५३ टन कचरा संकलित करण्यात आला. जमा केलेला कचरा सरकारी व महापालिकेच्या आणि खाजगी वाहनांतून डंपिंग ग्राऊंडपर्यंत पोहचवण्यात आला. या स्वच्छता मोहिमेमध्ये वसई विरार विभागातील एकूण ६ हजार ४७९ सदस्य स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. प्रतिष्ठानच्या सौजन्याने गेली अनेक वर्षे व्यापक स्वरुपात स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून दि. १६ नोव्हें. २०१४ रोजीच्या स्वच्छता अभियानाची नोंद लिमका बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकी आणि समाज ऋणांची जाणीव ठेवून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे सातत्त्याने अनेक समाजोपयोगी व समाजाभिमुख उपक्रम साकारत आलेले आहे. वृक्षारोपण आणि संगोपन, कालवे, सरोवरे, नद्या व धरणांमधील गाळाचा उपसा करणे, दुर्घटनाग्रस्त व्यक्तिंंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, शारीरिकदृष्टया अक्षम आणि मूक - बधिर व्यक्तिंंना आवश्यक अवयव आणि उपकरणांचे वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे विनामूल्य वाटप, निशुल्क आरोग्य निदान आणि उपचार, आरोग्य विषयक जनजागृती, रक्तदान शिबिरे, पाणपोयांची निर्मिती, बस थांब्यांवर निवाऱ्याची निर्मिती, स्पर्धा परीक्षा, व्यवसाय मार्गदर्शन आदि प्रतिष्ठानचे प्रमुख प्रकल्प आहेत. सार्वजनिक स्वच्छतेचे वैयक्तिक जीवनातील महत्व सांगताना डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आवर्जून सांगतात की, सार्वजनिक ठिकाणी साचलेल्या कचरयामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरतेच मात्र त्याचसोबत विषमज्वर, मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, कॉलरा यासारखे साथीचे रोग पसरण्याचा धोका देखील असतो. तसेच अस्वच्छतेचे पर्यावरणावर हानिकारक परिणाम होतात. समाजामध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी हाही प्रतिष्ठानचा प्रमुख हेतू असल्याचे म्हणत प्रत्येक नागरिकाने राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून स्वयंशिस्तीचा अंगीकार करावा असे म्हणत या मोहिमेतून स्वच्छ भारत अभियानामध्ये आपले एक अल्पसे योगदान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत असल्याची भावना डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केली. वसई विरार शहर महापालिकेच्या आरोग्य विभाग तथा स्वच्छता विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याबाबतची तयारी अतिशय मोलाची व फारच उत्साहवर्धक होती. (प्रतिनिधी)>वाडा येथे स्वच्छतेचा मंत्रवाडा: कुणाच्या हातात फावडे, तर कुणाच्या हातात झाडू, कुणाच्या हातात घमेले अश प्रकारे श्री सदस्य (दास) भक्तांनी आज महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतीदिनानिमित्त गावात स्वच्छता मोहिम राबविली.यात या गावाचा चेहरा मोहरा बदलून ते चकाचक करण्यात आले. या मोहिमेत सभापती मृणाली नडगे, निवासी नायब तहसिलदार विठ्ठल गोसावी, सरपंच उमेश लोखंडे, उपसरपंच रोहन पाटील यांच्यासह शेकडो श्री सदस्यांनी सहभाग घेवून नागरिकांना स्वच्छतेचा मंत्र दिला.