शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

RBI ची महाराष्ट्रात मोठी कारवाई; वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे लायसन रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 11:26 IST

RBI Action On Vasantdada Nagari Sahakari Bank Ltd. बँकेच्या ठेवीदारांना दिलासा देताना आरबीआयने म्हटले की, वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे लायसन रद्द करणे आणि दिवाळखोरीत गेल्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ग्राहकांना त्यांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.

केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे (Vasantdada Nagari Sahakari Bank Ltd.) लायसन रद्द केल्याने खळबळ उडाली आहे. आरबीआयने सोमवारी याची माहिती दिली. बँक सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे खातेदारांचे, ठेवीदारांचे सर्व पैसे परत करू शकणार नाही. या बँकेचे लायसन सोमवारी व्यवहार संपल्यानंतर रद्द होणार आहे. यानंतर ही बँक कोणतेही व्यवहार करू शकणार नाही, असे आरबीआयने सांगितले. 

बँकेच्या ठेवीदारांना दिलासा देताना आरबीआयने म्हटले की, वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे लायसन रद्द करणे आणि दिवाळखोरीत गेल्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ग्राहकांना त्यांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. यानंतरच ठेवीदारांना विमा आणि कर्ज गॅरंटी मंडळाकडून पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. याप्रकारे सहकारी बँकेचे जवळपास 99 टक्के खातेदार त्यांची जमा रक्कम काढू शकणार आहेत. 

दुसरीकडे आरबीआयने चिंता व्यक्त करताना म्हटले की, कोरोन संकटामुळे बँकांची स्थिती ढासळण्याची शक्यता आहे. गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे बँकांच्या संपत्तीवर संक्रांत येऊ शकते. तसेच बँकांकडील निधीतही कमी येऊ शकते. याचसोबत सरकारकडेही महसूल कमी झाला आहे. 

आरबीआयने या आधी म्हापसा बँक, सीकेपी को ऑपरेटीव्ह बँक, कराड जनता सहकारी बँकेचे लायसन गेल्या वर्षी रद्द केले होते. याचबरोबर आरबीआयने १०० हून अधिक सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकBanking Sectorबँकिंग क्षेत्रOsmanabadउस्मानाबाद