शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

वसंतदादा कारखाना मुंबईच्या दत्त इंडियाकडे

By admin | Updated: May 17, 2017 22:03 IST

वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना अखेर मुंबईच्या श्री दत्त इंडिया या कंपनीला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने बुधवारी घेतला

ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 17 : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना अखेर मुंबईच्या श्री दत्त इंडिया या कंपनीला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने बुधवारी घेतला. दाखल झालेल्या तीन निविदांमध्ये सर्वाधिक २६१ रुपये प्रतिटन दराची निविदा दत्त इंडियाने दाखल केली होती. भाडेकरार दराचा हा राज्यातील उच्चांक आहे.जिल्हा बँकेने ९३ कोटी रुपयांच्या थकीत कर्जासाठी वसंतदादा साखर कारखाना ताब्यात घेतला आहे. कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. दोनवेळा मुदतवाढ दिल्यानंतर बुधवारी निविदा दाखल करण्याच्या अंतिम दिवशी वाळव्याचा हुतात्मा सहकारी साखर कारखाना, कोल्हापुरातील व्यंकटेश्वरा आणि मुंबईच्या श्री दत्त इंडिया या कंपनीने निविदा दाखल केली होती. बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालकांच्या बैठकीत निविदा उघडण्यात आल्या. यावेळी निविदाधारकांचे प्रतिनिधी, शेतकरी संंघटना, वसंतदादा कारखाना व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्राधिकृत अधिकारी मानसिंग पाटील यांनी सर्वाधिक दर श्री दत्त इंडियाचा असल्याचे जाहीर केले. त्यानंतर कारखाना त्यांना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाला.करार करताना काही कायदेशीर बाबींची व कागदपत्रांची पूर्तता करून देण्याची मागणी संबंधित कंपनीने केल्यानंतर, जिल्हा बँकेने त्यांची पूर्तता करण्याचे मान्य केले. येत्या दोन दिवसात याबाबतची उर्वरित प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ह्यवसंतदादाह्णच्या डिस्टिलरीसाठी जाहीर केलेल्या निविदेकरिता या तिन्ही कारखान्यांनी स्वतंत्रपणे निविदा दाखल केल्या होत्या. अपसेट प्राईसपेक्षा (किमान दर) तिन्ही निविदा कमी दराच्या होत्या. चार कोटीचा किमान दर असताना सर्वाधिक सव्वा कोटी रुपयांची निविदा हुतात्मा कारखान्याची होती. त्यामुळे डिस्टिलरीचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला. डिस्टिलरीसाठी जिल्हा बँक फेरनिविदा काढण्याची शक्यता आहे.वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वावर गेल्यामुळे जिल्हा बँकेला मोठा दिलासा मिळाला आहे. वर्षभरात संबंधित ठेकेदाराकडून ७0 कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. ही रक्कम आल्यानंतर बँकेचा एनपीए कमी होणार आहे. बँकेने १७ एप्रिलरोजी वसंतदादा कारखान्याची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानंतर बरोबर एक महिन्याने म्हणजेच १७ मेरोजी निविदा निश्चित झाली. लवकरच दत्त इंडिया कंपनीबरोबर भाडेकरार केला जाणार आहे.दत्त इंडिया संस्थेची पार्श्वभूमी...वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वावर घेणारी मुंबईची दत्त इंडिया ही कंपनी साखर उद्योगातील देशातील आघाडीवरील संस्था आहे. साखरेची मोठी उलाढाल दरवर्षी करताना, बऱ्याच कारखान्यांना आर्थिक मदत करण्याचे कामही या संस्थेने केले आहे. सध्या जितेंद्र धरू हे या संस्थेचे काम पाहत आहेत.दहा वर्षांचचा भाडेकरारकंपनीशी दहा वर्षांचा भाडेकरार होणार आहे. भाडेकरार संपताच पुन्हा हा कारखाना सभासदांच्या ताब्यात सुपूर्द केला जाणार आहे. या सर्व गोष्टींचा करारपत्रात उल्लेख केला जाणार आहे. वसंतदादा कारखान्याच्या सभेचा ठराव प्राप्त झाल्यानंतर अन्य कायदेशीर बाबींची पूर्तता करून करारपत्र केले जाणार आहे.राजारामबापूने प्रयत्न थांबविलेवसंतदादा कारखाना भाडेतत्त्वाने घेण्यासाठी राजारामबापू कारखानाही प्रयत्नशील होता. मात्र कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी बँकेकडे ड्यू डिलिजन्स रिपोर्ट (योग्य अध्यव्यवसाय अहवाल) मागितला. या अहवालानुसार नेमकी किती देणी आहेत, हे स्पष्ट होत असते. कारखान्याची ही मागणी योग्य होती. मात्र असा अहवाल मिळण्यास विलंब लागणार होता. या अहवालासाठी पुन्हा फेरनिविदा काढण्याची वेळ बँकेवर आली असती. या सर्व बाबींचा विचार करून राजारामबापू कारखान्याने निविदा प्रक्रियेतून अंग काढून घेतले.वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वाने चालविण्यासाठी मिळालेला दर अपेक्षेपेक्षा चांगला आहे. त्यामुळे शेतकरी, सभासद, कामगार यांच्यासाठी हा दिलासादायक निर्णय आहे.- विशाल पाटील, अध्यक्ष, वसंतदादा कारखाना