शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
2
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
3
नौदलाला आज असे जहाज मिळणार, जगात कोणत्याही नौदलाकडे नाही; पाचव्या शतकातील आरमाराची ताकद जगभ्रमंतीला निघणार...
4
IPL 2025: जोश हेझलवूडने RCB फॅनसोबत केलं 'असं' कृत्य; Video पाहून तुम्हालाही येईल राग
5
"मलाच धक्का बसलाय..." परेश रावल यांच्या 'हेरा फेरी ३' सोडण्यावर सुनील शेट्टीची प्रतिक्रिया
6
आणखी एक ज्योती? १२ वर्षांच्या मुलाला सोडून नागपूरची महिला कारगिलमधून गायब, पाकिस्तानी नंबरवर झालेली फोनाफोनी
7
Akhilesh Yadav : "भाजपाची चूक नेहमीच लोकांसाठी जीवघेणी"; कोरोनाबद्दल अखिलेश यादव यांचा गंभीर इशारा
8
६ तास कसून चौकशी, अनेक बँकांत खाती; काही प्रश्नांची उत्तरे ज्योतीला देताच आली नाहीत?
9
कोणीतरी आले अन् गोळ्या झाडून गेले! हाफिज सईदचा जवळचा सहकारी आमिर हमजा अखेरची घटका मोजू लागला
10
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
11
अनंत अंबानींपेक्षाही मोठं लग्न? 'या' शाही विवाहात प्रत्येक पाहुण्यावर ४२ लाख होणार खर्च, २०० VIP
12
हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली
13
ब्रेकअप? 'या' अभिनेत्याला डेट करत होती सारा तेंडुलकर, कुटुंबाला भेटल्यानंतर नातं तुटल्याची चर्चा
14
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
15
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
16
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
17
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
18
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
19
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
20
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक

वसई ग्रामीण आजही उपेक्षितच

By admin | Updated: August 15, 2016 04:04 IST

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वसईच्या ग्रामीण भागाचा विचार केला तर आजही हा भाग मूलभूत सुविधांपासून वंचित आहे.

सुनील घरत,

पारोळ/वसई- स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वसईच्या ग्रामीण भागाचा विचार केला तर आजही हा भाग मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, रस्ते तसेच शासनाकडून येणाऱ्या योजना निव्वळ कागदावरच आहेत की काय, अशी परिस्थिती आहे. सरकारी बाबू आणि राजकीय नेत्यांच्या बनवेगिरीमुळेचे ही दुरवस्था झाल्याचे चित्र आहे.वसई महानगरपालिकेचा पूर्व भाग हा डोंगरी असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासींची वस्ती आहे. हातावर पोट ही या भागाची जीवन पद्धती. पण या भागाकडे राजकीय नेत्यांच्या व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विकास फक्त कागदावरच दिसत आहे. पालघर जिल्ह्यात शासन जि.प. शाळा डिजिटल करत असताना तिल्हेर परिसरातील शाळकरी मुलांना गळक्या शाळेत शिक्षण घ्यावे लागत आहे. गरीब मुलांनी फक्त गळक्या शाळेत शिक्षण घ्यावे का? हा प्रश्न या भागातील पालकांसमोर आहे. या भागातील आरोग्य यंत्रणाही आजारी आहे. पारोळ, मांडवी, भाताणे या भागांत आरोग्य केंदे्र आहेत. या सर्व आरोग्य केंद्रांना गळती लागल्याने गरीब रुग्णांना छत्री घेऊन उपचार घेण्याची वेळ आली आहे. पारोळ आरोग्य केंद्र तर भ्रष्टाचाराच्या विळख्यात आहे. शासनाला चुना लावल्याचा आरोप या केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यावर आहे. या भागातील रस्ते वाहून गेल्याचे भाताणे, उसगाव हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. जर गावांचा सातत्याने संपर्क तुटत असेल तर प्रशासन करते काय, असा ग्रामस्थांचा सवाल आहे.>दुर्लक्षित धोरणाचे दुष्परिणामया भागातील गरीब विद्यार्थ्यांवर रस्त्याअभावी शाळा सोडण्याची वेळ आली आहे. तानसा नदीवरील उसगाव, भेठे या पुलांची उंची कमी असल्यामुळे हे पूल पाण्याखाली जात असल्यामुळे अनेक वर्षांपासून आठआठ दिवस या गावांचा संपर्क तुटत आहे. या भागातील सुरक्षा यंत्रणेची ही बोंब आहे. पारोळ भागातील दुकानफोड्या, घरफोड्या करणाऱ्यांचा अजूनही तपास नाही. घराबाहेर या ठिकाणी पाणी पिण्याच्या विहिरीत विष टाकले. या गंभीर बाबीचाही तपास नाही. महसूल अधिकारीही शेतकऱ्यांपेक्षा जमीन दलालाच्या कामात मग्न, महिन्याला येणाऱ्या रेशनिंगचा पत्ता नाही अशा अनेक समस्या या भागात पाहायला मिळतात. सरकारे बदलली, लोकप्रतिनिधी बदलले, ग्रामपंचायत असलेल्या वसई-विरारची महानगरपालिका झाली, तरी पण वसई पूर्व भागाची अवस्था आजही बिकट आहे.