शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

वसई ग्रामीण आजही उपेक्षितच

By admin | Updated: August 15, 2016 04:04 IST

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वसईच्या ग्रामीण भागाचा विचार केला तर आजही हा भाग मूलभूत सुविधांपासून वंचित आहे.

सुनील घरत,

पारोळ/वसई- स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वसईच्या ग्रामीण भागाचा विचार केला तर आजही हा भाग मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, रस्ते तसेच शासनाकडून येणाऱ्या योजना निव्वळ कागदावरच आहेत की काय, अशी परिस्थिती आहे. सरकारी बाबू आणि राजकीय नेत्यांच्या बनवेगिरीमुळेचे ही दुरवस्था झाल्याचे चित्र आहे.वसई महानगरपालिकेचा पूर्व भाग हा डोंगरी असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासींची वस्ती आहे. हातावर पोट ही या भागाची जीवन पद्धती. पण या भागाकडे राजकीय नेत्यांच्या व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विकास फक्त कागदावरच दिसत आहे. पालघर जिल्ह्यात शासन जि.प. शाळा डिजिटल करत असताना तिल्हेर परिसरातील शाळकरी मुलांना गळक्या शाळेत शिक्षण घ्यावे लागत आहे. गरीब मुलांनी फक्त गळक्या शाळेत शिक्षण घ्यावे का? हा प्रश्न या भागातील पालकांसमोर आहे. या भागातील आरोग्य यंत्रणाही आजारी आहे. पारोळ, मांडवी, भाताणे या भागांत आरोग्य केंदे्र आहेत. या सर्व आरोग्य केंद्रांना गळती लागल्याने गरीब रुग्णांना छत्री घेऊन उपचार घेण्याची वेळ आली आहे. पारोळ आरोग्य केंद्र तर भ्रष्टाचाराच्या विळख्यात आहे. शासनाला चुना लावल्याचा आरोप या केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यावर आहे. या भागातील रस्ते वाहून गेल्याचे भाताणे, उसगाव हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. जर गावांचा सातत्याने संपर्क तुटत असेल तर प्रशासन करते काय, असा ग्रामस्थांचा सवाल आहे.>दुर्लक्षित धोरणाचे दुष्परिणामया भागातील गरीब विद्यार्थ्यांवर रस्त्याअभावी शाळा सोडण्याची वेळ आली आहे. तानसा नदीवरील उसगाव, भेठे या पुलांची उंची कमी असल्यामुळे हे पूल पाण्याखाली जात असल्यामुळे अनेक वर्षांपासून आठआठ दिवस या गावांचा संपर्क तुटत आहे. या भागातील सुरक्षा यंत्रणेची ही बोंब आहे. पारोळ भागातील दुकानफोड्या, घरफोड्या करणाऱ्यांचा अजूनही तपास नाही. घराबाहेर या ठिकाणी पाणी पिण्याच्या विहिरीत विष टाकले. या गंभीर बाबीचाही तपास नाही. महसूल अधिकारीही शेतकऱ्यांपेक्षा जमीन दलालाच्या कामात मग्न, महिन्याला येणाऱ्या रेशनिंगचा पत्ता नाही अशा अनेक समस्या या भागात पाहायला मिळतात. सरकारे बदलली, लोकप्रतिनिधी बदलले, ग्रामपंचायत असलेल्या वसई-विरारची महानगरपालिका झाली, तरी पण वसई पूर्व भागाची अवस्था आजही बिकट आहे.