शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

वरणगाव पेटले : ट्रकसह दुकान जाळले

By admin | Updated: June 1, 2014 00:39 IST

धार्मिक गाणे वाजवण्यासह एका गुन्'ातील आरोपीला मारहाण केल्याच्या कारणावरून जमावाने येथील एका फळाच्या दुकानाला आग लावत ट्रकही पेटवला़ अनेक घरांवर दगडफेक करण्यात आली

 मारहाणीचे निमित्त : अनेक घरांवर दगडफेक : १० जण जखमी

 वरणगाव (जि. जळगाव) : धार्मिक गाणे वाजवण्यासह एका गुन्'ातील आरोपीला मारहाण केल्याच्या कारणावरून जमावाने येथील एका फळाच्या दुकानाला आग लावत ट्रकही पेटवला़ अनेक घरांवर दगडफेक करण्यात आली असून सुमारे १० जण जखमी झाले आहेत़ शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास झालेल्या दंगलीने गावात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची पळापळ झाली तर व्यापारी पेठेतही दुकाने बंद करण्यासाठी धावपळ उडाली़ एका राजकीय पुढार्‍याचे दंगलीत मारहाण झालेल्या जखमीशी पूर्ववैमनस्य असल्याने व त्यातून दंगल घडल्याचा संशय व्यक्त होत आहे़ मारहाणीनंतर दंगलीला सुरुवात सुमारे दोन महिन्यांपूर्वी वरणगावमार्गे कत्तलीच्या इराद्याने जाणारा ट्रक हिंदुत्वादी संघटनेचा कार्यकर्ता गणेश आत्माराम धनगर (३२) याने अडवला होता. त्यावेळी वादही झाला होता. या प्रकरणी वरणगाव पोलिसांनी गणेशविरुद्ध भादंवि १४३ अन्वये गुन्हा दाखल केला होता़ तेव्हापासून तो पसार होता़ आरोपी बाहेर निघताच हल्ला शनिवारी गणेश सिद्धेश्वरनगरातून वरणगावकडे येत असताना पुलाजवळ अज्ञात इसमांनी त्याच्या अंगावर चादर टाकत डोक्यात रॉडने जबर दुखापत केलीतर छाती-पोटावर ब्लेडने वार केल्याने तो जागीच बेशुद्ध पडला़ रात्री आठ वाजता ही घटना घडली़ त्यानंतर आरोपी पसार झाले मात्र जखमीच्या समर्थकांना ही बाब कळताच त्यांनी त्यास ग्रामीण रुग्णालयात आणले़ हल्ल्याची माहिती मिळताच शेकडो लोकांचा जमाव वरणगाव पोालीस स्टेशनभोवती जमा झाला़ पोलिसांचा गाफिलपणा नडला पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज करून पांगवून तात्पुरता शांतता निर्माण केली खरी मात्र हा जमाव नेमका पुढे जातो कुठे व करतो काय? याची खबरदारी न घेतल्याने दंगल अधिक भडकल्याचा आरोप आहे़ दुकानाला आग, ट्रकही पेटवला संतप्त जमावाने बसस्थानक चौकाकडे मोर्चा वळवत काही दुकानांवर दगडफेक केली़ सुभान पिंजारी यांच्या फळांच्या दुकानाला आग लावण्यात आल्याने लाखोंचे नुकसान झाले तर राष्ट्रीय महामार्गावरील मंगल ढाब्याजवळ उभ्या असलेल्या कलीमुद्दीन यांच्या मालकीच्या ट्रकला आगही लावण्यात आली़ घरांवर भिरकावले दगड, १० जखमी दरम्यान, धनगरवाड्यासह अनेक घरांवर जमावाकडून दगड भिरकावण्यात आले यात सुमारे १० ते १५ जण जखमी झाल्याचा अंदाज आहे़ दंगलीनंतर गावात तणावपूर्व शांतता पसरली असून जिल्'ावरून रात्री उशिरापर्यंत कुमक दाखल होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले़