शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वरणगाव पेटले : ट्रकसह दुकान जाळले

By admin | Updated: June 1, 2014 00:39 IST

धार्मिक गाणे वाजवण्यासह एका गुन्'ातील आरोपीला मारहाण केल्याच्या कारणावरून जमावाने येथील एका फळाच्या दुकानाला आग लावत ट्रकही पेटवला़ अनेक घरांवर दगडफेक करण्यात आली

 मारहाणीचे निमित्त : अनेक घरांवर दगडफेक : १० जण जखमी

 वरणगाव (जि. जळगाव) : धार्मिक गाणे वाजवण्यासह एका गुन्'ातील आरोपीला मारहाण केल्याच्या कारणावरून जमावाने येथील एका फळाच्या दुकानाला आग लावत ट्रकही पेटवला़ अनेक घरांवर दगडफेक करण्यात आली असून सुमारे १० जण जखमी झाले आहेत़ शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास झालेल्या दंगलीने गावात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची पळापळ झाली तर व्यापारी पेठेतही दुकाने बंद करण्यासाठी धावपळ उडाली़ एका राजकीय पुढार्‍याचे दंगलीत मारहाण झालेल्या जखमीशी पूर्ववैमनस्य असल्याने व त्यातून दंगल घडल्याचा संशय व्यक्त होत आहे़ मारहाणीनंतर दंगलीला सुरुवात सुमारे दोन महिन्यांपूर्वी वरणगावमार्गे कत्तलीच्या इराद्याने जाणारा ट्रक हिंदुत्वादी संघटनेचा कार्यकर्ता गणेश आत्माराम धनगर (३२) याने अडवला होता. त्यावेळी वादही झाला होता. या प्रकरणी वरणगाव पोलिसांनी गणेशविरुद्ध भादंवि १४३ अन्वये गुन्हा दाखल केला होता़ तेव्हापासून तो पसार होता़ आरोपी बाहेर निघताच हल्ला शनिवारी गणेश सिद्धेश्वरनगरातून वरणगावकडे येत असताना पुलाजवळ अज्ञात इसमांनी त्याच्या अंगावर चादर टाकत डोक्यात रॉडने जबर दुखापत केलीतर छाती-पोटावर ब्लेडने वार केल्याने तो जागीच बेशुद्ध पडला़ रात्री आठ वाजता ही घटना घडली़ त्यानंतर आरोपी पसार झाले मात्र जखमीच्या समर्थकांना ही बाब कळताच त्यांनी त्यास ग्रामीण रुग्णालयात आणले़ हल्ल्याची माहिती मिळताच शेकडो लोकांचा जमाव वरणगाव पोालीस स्टेशनभोवती जमा झाला़ पोलिसांचा गाफिलपणा नडला पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज करून पांगवून तात्पुरता शांतता निर्माण केली खरी मात्र हा जमाव नेमका पुढे जातो कुठे व करतो काय? याची खबरदारी न घेतल्याने दंगल अधिक भडकल्याचा आरोप आहे़ दुकानाला आग, ट्रकही पेटवला संतप्त जमावाने बसस्थानक चौकाकडे मोर्चा वळवत काही दुकानांवर दगडफेक केली़ सुभान पिंजारी यांच्या फळांच्या दुकानाला आग लावण्यात आल्याने लाखोंचे नुकसान झाले तर राष्ट्रीय महामार्गावरील मंगल ढाब्याजवळ उभ्या असलेल्या कलीमुद्दीन यांच्या मालकीच्या ट्रकला आगही लावण्यात आली़ घरांवर भिरकावले दगड, १० जखमी दरम्यान, धनगरवाड्यासह अनेक घरांवर जमावाकडून दगड भिरकावण्यात आले यात सुमारे १० ते १५ जण जखमी झाल्याचा अंदाज आहे़ दंगलीनंतर गावात तणावपूर्व शांतता पसरली असून जिल्'ावरून रात्री उशिरापर्यंत कुमक दाखल होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले़