शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

मुंबई-जालना वंदे भारत ट्रेनचा मार्ग मोकळा! काम अंतिम टप्प्यात; अन्य ५ ट्रेनवर शिक्कामोर्तब?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 17:27 IST

Vande Bharat Express Train: रेल्वे मंडळाकडून मध्य आणि उत्तर रेल्वेला प्रत्येकी दोन, पश्चिम आणि दक्षिण रेल्वेला एक वंदे भारत ट्रेन देण्यात आली आहे.

Vande Bharat Express Train: देशभरातून वंदे भारत ट्रेनची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारतीय रेल्वेही अधिकाधिक वंदे भारत ट्रेन सुरू करण्यावर भर देताना दिसत आहे. महाराष्ट्रात विविध मार्गांवर वंदे भारत सुरू करण्याबाबतच्या चर्चा सुरू आहेत. यातच मुंबई ते जालना मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे मंडळाने सहा वंदे भारत ट्रेनचे वितरण केले आहे. मध्य आणि उत्तर रेल्वेला प्रत्येकी दोन, पश्चिम आणि दक्षिण रेल्वेला एक वंदे भारत देण्यात आली आहे. संत रामदासस्वामींचे जन्मस्थळ, प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे आनंदी स्वामींचे मंदिर आणि अन्य तीर्थक्षेत्र जालन्यात आहेत. येथे जाणाऱ्या मुंबईकरांना जालन्यासाठी जलद आणि आरामदायी पर्याय वंदे भारतमुळे उपलब्ध होणार आहे. वंदे भारतची ४४ आणि ४६वी आठ डब्यांची गाडी मध्य रेल्वेला देण्यात आली आहे. एक गाडी मुंबई-जालना मार्गावर धावणार आहे. गाडीचे वेळापत्रक तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे, असे म्हटले जात आहे.

पाच वंदे भारतचे करण्यात आले वितरण

एकूण आठ डब्यांच्या चार आणि १६ डब्यांची एक अशा पाच वंदे भारतचे वितरण करण्यात आले आहे. उंच पेंटोग्राफ असलेली पहिली वंदे भारत पश्चिम रेल्वेवर धावणार आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (यूएसबीआरएल) प्रकल्पासाठी वंदे भारत ट्रेनवर शिक्कामोर्तब केल्याने आता काश्मीर खोऱ्यातूनही वंदे भारत धावणार आहे. उत्तर रेल्वेवरील यूएसबीआरएल प्रकल्पासाठी एका वंदे भारत ट्रेन राखीव ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, उत्तर रेल्वेच्या अखत्यारितील यूएसबीआरएल प्रकल्प साधारण जानेवारी २०२४मध्ये पूर्ण होण्याची आशा आहे. यासाठी वंदे भारत चालवण्याचा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे पाठवण्यात आला होता. प्रकल्पासाठी आठ डब्यांची वंदे भारत देण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यूएसबीआरएल प्रकल्प पूर्ण झाल्यावर सर्वात आधी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार असल्याची घोषणा केली आहे.

 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसcentral railwayमध्य रेल्वेwestern railwayपश्चिम रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे