शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मानधनवाढीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 05:55 IST

अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनवाढीसाठी आक्रमक झालेल्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने मंगळवारी आझाद मैदानात हजारोंचा धडक मोर्चा काढला.

मुंबई : अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनवाढीसाठी आक्रमक झालेल्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने मंगळवारी आझाद मैदानात हजारोंचा धडक मोर्चा काढला. त्यानंतर जागे झालेल्या महिला व बाल विकास विभागाने या प्रश्नी कृती समितीच्या शिष्टमंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांसोबत पुढील आठवड्यात ठेवली आहे. विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आझाद मैदानात येऊन आंदोलकांना हे आश्वासन देत मानधनवाढीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला आहे.दरम्यान, एका आठवड्याची मुदत मागणाºया सरकारला कृती समितीने एका महिन्याची मुदत दिल्याचे समितीचे निमंत्रक दिलीप उटाणे यांनी सांगितले. उटाणे म्हणाले की, कर्मचाºयांच्या मानधनवाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी कृती समितीने मंगळवारी आझाद मैदानात धडक मोर्चाची हाक दिली होती. या वेळी पंकजा मुंडे यांनी आंदोलनस्थळी येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचे जाहीर आश्वासन दिले आहे. या बैठकीत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवारही उपस्थित असतील, असेही त्यांनी सांगितले. मानधनवाढीला आपला पाठिंबा असून, यासंदर्भातील प्रस्ताव ७ जून २०१७ रोजी वित्तमंत्र्यांकडे पाठवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आठवड्याभराची मुदत मागून मुंडे यांनी तात्पुरते आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले. कृती समितीने घेतलेल्या बैठकीत तत्काळ आंदोलनाला स्थगिती दिली. शिवाय एक आठवड्याऐवजी मंत्र्यांना एका महिन्याची मुदत देण्याची घोषणा केली. मात्र ११ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर बेमुदत संपाचा इशाराही कृती समितीने दिल्याचे उटाणे यांनी सांगितले.पुढील आठवड्यात चर्चा होण्याची शक्यताअंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधन वाढीसाठी शासनाने गठीत केलेल्या समितीने दिलेल्या शिफारशीप्रमाणे वाढ करावी, अशी कृती समितीची प्रमुख मागणी आहे. सेवाज्येष्ठताप्रमाणे मानधनवाढ झाली नाही, तर कर्मचाºयांतील अंसतोष वाढेल असे कृती समितीचे म्हणणे आहे.आयसीडीएस योजना कायम करून तिचा दर्जा सुधारा, अंगणवाडी सेविका, मदतनिसांना शासकीय कर्मचाºयांचा दर्जा द्या, टीएचआर (टेक होम रेशन) बंद करून सर्व लाभार्थ्यांना ताजा आहार द्या, अंगणवाडीत दोन वेळच्या आहारासाठी सध्या प्रतिविद्यार्थी फक्त ४ रुपये ९२ पैसे इतका निधी खर्च केला जात असून त्यात तिपटीने वाढ करा, आदी मागण्यांवर पुढील आठवड्यात चर्चा होण्याची शक्यता कृती समितीने व्यक्त केली आहे.