शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

वल्लभनगर एसटी आगार असुरक्षित

By admin | Updated: January 16, 2017 01:23 IST

पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर मुख्य आगार असुरक्षित बनले असून, विविध समस्यांमुळे हे आगार समस्यांचे आगार बनले आहे.

जमीर सय्यद,नेहरुनगर- पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर मुख्य आगार असुरक्षित बनले असून, विविध समस्यांमुळे हे आगार समस्यांचे आगार बनले आहे. आगारातील पोलीस मदत केंद्र कधी बंद, तर कधी सुरू असते, सीसीटीव्ही कॅमेरे दिखाऊपणासाठीच असल्याचे दिसून येत आहे. आगाराच्या आवारात मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे वाढलेली आहे. कँटीन गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे. आगाराच्या छताचा उपयोग दारू पिण्याचा अड्डा बनला आहे, स्वच्छतागृह वापरण्यासाठी मनमानी पद्धतीने पैसे घेतले जात असल्यामुळे या सर्व कारणांमुळे हे आगार समस्यांचे आगार बनले आहे. वल्लभनगर आगाराचे उद्घाटन १८ वर्षांपूर्वी २२ आॅगस्ट १९९८ मध्ये परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते झाले होते. या आगारातून आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा या तीन राज्यांसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत व त्यामधील विविध तालुके शहरे व विविध खेडेगावात जातात. यामुळे प्रवाशांची या स्थानकावर गर्दी असते. वल्लभनगर आगाराच्या मागच्या आवारात मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे वाढली आहे. कालच एका नराधमाने शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एका इसमाने १९ वर्षीय मुलीला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना वल्लभनगर आगाराच्या मागच्या बाजूला असलेल्या आवारात घडल्यामुळे आगाराचा परिसर किती सुरक्षित व सुरक्षा व्यवस्था किती ढिसाळ आहे, हे सिद्ध होते. या आगारामध्ये जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आलेले आहेत. परंतु ते शोभेचे आहेत की काय, असा प्रश्न या घडलेल्या घटनेमुळे उपस्थित केला जात आहे. याच आगारालगत एक आयटी कंपनी असून, अनेक महिला रात्री-अपरात्री येण्या-जाण्यासाठी या आगारामधून असलेल्या रस्त्याचा उपयोग करीत असतात. या घडलेल्या घटनेमुळे महिलांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वल्लभनगर आगारात ३ नोव्हेंबर २०१५ला जंगलामध्ये डुक्कर मारण्यासाठी वापरण्यात येणारे असलेले बॉम्ब सापडले होते. एक बॉम्ब कुत्र्याने खाल्ल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. आगारामधील जेवणाचे कँटीन अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.अनेक नागरिक या आगारात गावाला अथवा इतर जिल्ह्यांत जाण्यासाठी येतात. अनेक वेळा एसटी बसची वाट पाहत असताना एखाद्या प्रवाशाला जेवण अथवा चहा-नाष्टा करायचा असेल, तर त्यांना एसटी बस आगाराच्या बाहेर जावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या पाणपोयी व नळांची दुरवस्था झालेली आहे. तसेच महिला प्रवासी मातांसाठी असलेला हिरकणी कक्षदेखील वापराअभावी धूळ खात पडला असून, या केंद्रामध्ये अडगळीच्या वस्तू ठेवल्या आहेत.डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. आगारामध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक नादुरुस्त एसटी बस वाढल्या असून, या आगाराची जागा व्यापली जात आहे. >लोकमत प्रतिनिधीने सकाळी १०च्या सुमारास वल्लभनगर आगाराची पाहणी केली असता, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलीस मदत केंद्र सुरू होते. परंतु या केंद्रात कोणीही बसलेले नव्हते. आगाराच्या छताची पाहणी केली असता, छतावर जागोजागी दारूच्या बाटल्या आढळून आल्या असून, अनेक चालक या ठिकाणी दारू पित असल्याचे उघडकीस आले आहे. छतावर मिळालेल्या बाटल्यांमुळे अनेक चालक दारू पित असल्याचे आढळून आले असून, ही प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गंभीर बाब आहे. याच बरोबर आगाराच्या मागच्या आवारात मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे, अस्वच्छता वाढलेली असून, एक बंगलाही बंद अवस्थेत धूळ खात आहे.