शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात साडेआठशे एकरवर सेंद्रिय शेतीचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2016 19:56 IST

कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे (आत्मा) च्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यात ८५० एकर शेतीवर सेंद्रिय शेतीचा प्रयोग राबविला जात आहे. जिल्ह्यातील

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 22 -  कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे (आत्मा) च्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यात ८५० एकर शेतीवर सेंद्रिय शेतीचा प्रयोग राबविला जात आहे. जिल्ह्यातील विविध भागांतील १७ शेतकरी गटांनी पुढे येऊन सेंद्रिय शेतीची नोंदणी केली आहे. या शेतीवर कोणतेही रासायनिक खत किंवा कीटकनाशक न वापरता पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने खरिपाचे पीक घेण्यात येत आहे.केंद्र सरकारने सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आत्माला प्रत्येक जिल्ह्यात सेंद्रिय शेती करणारे गट स्थापन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २४ शेतकरी गटांचे उद्दिष्ट आहे. खरीप हंगामात त्याला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १७ शेतकरी गट स्थापन होऊन त्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती सुरू केली आहे. गंगापूर तालुक्यात कासोडा, खुलताबाद तालुक्यात वेरूळ, कन्नड तालुक्यात वाकद, आडगाव, कविटखेडा, सोयगाव तालुक्यात जरंडी, औरंगाबाद तालुक्यात पळशी आदी ठिकाणी हे गट स्थापन झाले आहेत. प्रत्येक गटात पन्नास शेतकरी असून, त्या सर्वांनी आत्मा कार्यालयात सेंद्रिय शेतीची नोंदणी केली आहे. आता खरिपाचे पीक निघाल्यानंतर आत्माकडून या शेतकऱ्यांना सेंद्रिय पिकांचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच त्यांचे उत्पादन विक्री करण्यासाठीही कृषी विभागाकडून मदत केली जाणार आहे. शेतीत रासायनिक खत किंवा कीटकनाशकाचा वापर करणार नसल्याची हमी शेतकऱ्यांनी दिली आहे. त्याऐवजी या शेतकऱ्यांना गांडूळ खत, जैविक खते वापराविषयीचे प्रशिक्षण कृषी विभागाकडून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील या साडेआठशे एकर शेतजमिनीवर प्रामुख्याने तूर, मूग, उडीद, हरभरा यासारख्या कडधान्यांची पेरणी करण्यात आलेली आहे. तर काही ठिकाणी सेंद्रिय पद्धतीने फळभाज्यांची लागवड झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १७ गट स्थापन झाले असून, आणखी ७ गटांची स्थापना केली जाणार आहे.

सेंद्रिय शेतीचे फायदे...उत्पादन खर्चात बचत.जमिनीचा पोत सुधारण्यास मदत. उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा.सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या मालाला अधिक भाव.शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती अधिक फायद्याची आहे. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या मालाची विक्री करण्यासाठी त्यांना कृषी विभागाकडून मदत केली जाणार आहे.- सतीश शिरडकर, उपसंचालक, आत्मा