शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उर्से खिंडीत कोसळली दरड

By admin | Updated: July 4, 2016 02:10 IST

पहिल्याच पावसात उर्से खिंडीत रविवारी सकाळी दरड कोसळली

उर्से : पहिल्याच पावसात उर्से खिंडीत रविवारी सकाळी दरड कोसळली. त्यामुळे पुन्हा एकदा येथील वाहनचालकांच्या सुरक्षितेतचा प्रश्न उभ राहीला आहे. खिंडीत वारंवार दरडी कोसळत असूनही कुठलीच उपाययोजना करण्यात येत नसल्याने अपघाताचा धोका कायम आहे. आयआरबीच्या व रस्ते विकास महामंडळाच्या दुर्लक्षपणामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. उर्से खिंड पंचक्रोशीतील गावांसाठी वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. खिंडीजवळच द्रुतगती महामार्ग झाल्याने खिंडीतून वाहतूक वाढली. त्यामुळे १५ वर्षांपूवी या खिंडीचा विस्तार करण्यात आला. खिंडीत दर वर्षी पावसाळ्यात दरड कोसळत असतात. सुरक्षिततेच्या उपाययोजना होत नसल्याने या खिंडीतून जाताना जीव मुठीत घेऊन वाहनचालकांना जावे लागत आहे. मात्र, अनेक वेळा निवेदन देऊनही याकडे का लक्ष दिले जात नाही? बेजबाबदार व ढिसाळ कामाला जबाबदार आयआरबी, रस्ते विकास महामंडळ पदाधिकारी का कामगार? असा सवाल परिसरातील नागरिक करीत आहेत. खिंडीजवळच आयआरबीचे कार्यालय आहे . वाहनचालक अगोदरच येथून जाताना दरड कोसळण्याच्या भीतीने जात असतो. मात्र, या बाजूच्या दरडीमुळे गाडी घसरण्याची व अपघात होण्याची शाश्वती वाढली आहे. घटनेनंतर लगेचच रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन दरड हलवण्याचे आदेश दिले. येथील प्रवास सुरक्षित करण्यासाठी आयआरबी व रस्ते विकास महामंडळाने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करताना माजी सरपंच साहेबराव कारके यांनी केली. अनेक वेळा निवेदन देणारे सुभाष धामणकर यांनीदेखील दरड कोसळल्याबाबत कुठलीच दक्षता घेण्यात येत नसल्याने संताप व्यक्त केला.कुसगाव, डोंगरगावची जलवाहिनी तुटलीलोणावळा : पाणी योजनेची जलवाहिनी नांगरगाव तेथे इंद्रायणी पात्रात तुटल्याने कुसगाव डोंगरगावसह इतर वाड्या-वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. वलवण धरणावरून नांगरगावमार्गे कुसगाव व परिसरातील गावांसाठी या योजनेची जलवाहिनी नेण्यात आली आहे. ती नांगरगाव येथून नदीपात्रातून गेली आहे. दोन दिवसांपासून लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने इंद्रायणीचे पाणी वाढले आहे. पाण्याचा वेग व जलपर्णी यामुळे ही पाइपलाइन तुटल्याचे नागरिक सांगत आहेत. यामुळे गावांचा पाणीपुरवठा किमान आठ दिवस बंद राहणार असल्याने ऐन पावसात या गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवणार आहे.