शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

उर्से खिंडीत कोसळली दरड

By admin | Updated: July 4, 2016 02:10 IST

पहिल्याच पावसात उर्से खिंडीत रविवारी सकाळी दरड कोसळली

उर्से : पहिल्याच पावसात उर्से खिंडीत रविवारी सकाळी दरड कोसळली. त्यामुळे पुन्हा एकदा येथील वाहनचालकांच्या सुरक्षितेतचा प्रश्न उभ राहीला आहे. खिंडीत वारंवार दरडी कोसळत असूनही कुठलीच उपाययोजना करण्यात येत नसल्याने अपघाताचा धोका कायम आहे. आयआरबीच्या व रस्ते विकास महामंडळाच्या दुर्लक्षपणामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. उर्से खिंड पंचक्रोशीतील गावांसाठी वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. खिंडीजवळच द्रुतगती महामार्ग झाल्याने खिंडीतून वाहतूक वाढली. त्यामुळे १५ वर्षांपूवी या खिंडीचा विस्तार करण्यात आला. खिंडीत दर वर्षी पावसाळ्यात दरड कोसळत असतात. सुरक्षिततेच्या उपाययोजना होत नसल्याने या खिंडीतून जाताना जीव मुठीत घेऊन वाहनचालकांना जावे लागत आहे. मात्र, अनेक वेळा निवेदन देऊनही याकडे का लक्ष दिले जात नाही? बेजबाबदार व ढिसाळ कामाला जबाबदार आयआरबी, रस्ते विकास महामंडळ पदाधिकारी का कामगार? असा सवाल परिसरातील नागरिक करीत आहेत. खिंडीजवळच आयआरबीचे कार्यालय आहे . वाहनचालक अगोदरच येथून जाताना दरड कोसळण्याच्या भीतीने जात असतो. मात्र, या बाजूच्या दरडीमुळे गाडी घसरण्याची व अपघात होण्याची शाश्वती वाढली आहे. घटनेनंतर लगेचच रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन दरड हलवण्याचे आदेश दिले. येथील प्रवास सुरक्षित करण्यासाठी आयआरबी व रस्ते विकास महामंडळाने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करताना माजी सरपंच साहेबराव कारके यांनी केली. अनेक वेळा निवेदन देणारे सुभाष धामणकर यांनीदेखील दरड कोसळल्याबाबत कुठलीच दक्षता घेण्यात येत नसल्याने संताप व्यक्त केला.कुसगाव, डोंगरगावची जलवाहिनी तुटलीलोणावळा : पाणी योजनेची जलवाहिनी नांगरगाव तेथे इंद्रायणी पात्रात तुटल्याने कुसगाव डोंगरगावसह इतर वाड्या-वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. वलवण धरणावरून नांगरगावमार्गे कुसगाव व परिसरातील गावांसाठी या योजनेची जलवाहिनी नेण्यात आली आहे. ती नांगरगाव येथून नदीपात्रातून गेली आहे. दोन दिवसांपासून लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने इंद्रायणीचे पाणी वाढले आहे. पाण्याचा वेग व जलपर्णी यामुळे ही पाइपलाइन तुटल्याचे नागरिक सांगत आहेत. यामुळे गावांचा पाणीपुरवठा किमान आठ दिवस बंद राहणार असल्याने ऐन पावसात या गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवणार आहे.