शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

सर्वपक्षीय महिला आमदारांचा मुख्यमंत्र्यांना आग्रह

By admin | Updated: December 10, 2015 02:59 IST

अधिवेशनाचे कामकाज होत नाही, निदान बाकी सार्वजनिक कामे तरी करून घ्यावीत अशी चर्चा सर्वपक्षीय महिला आमदारांनी केली आणि राज्य महिला आयोगावर तातडीने कुणाची तरी नेमणूक करा

अधिवेशनाचे कामकाज होत नाही, निदान बाकी सार्वजनिक कामे तरी करून घ्यावीत अशी चर्चा सर्वपक्षीय महिला आमदारांनी केली आणि राज्य महिला आयोगावर तातडीने कुणाची तरी नेमणूक करा, असा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरण्याचा निर्णय झाला. लगेच निवेदन तयार केले गेले, सौ. वर्षा गायकवाड, सौ. मंदाताई म्हात्रे, सौ. अनिता अशोक चव्हाण, श्रीमती सुमनताई पाटील यांच्यासह सर्वपक्षीय महिला आमदारांचा मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या दालनात येऊन धडकला. तेथे काही पत्रकार बसलेले पाहून मंदाताई आणि वर्षा गायकवाड यांच्यात लटकी जुगलबंदीही झाली. वर्षाताई म्हणाल्या, तातडीने आयोगावर नेमणूक केलीच पाहिजे, त्यावर मंदाताई म्हणाल्या, तुमचे सरकार होते तेव्हा का नाही केली. आता आम्ही नक्की करणार आहोत. घाई करू नका... आर.आर. पाटील यांच्या पत्नी सौ. सुमनताई ही तेथे होत्या. त्यांना नेमके काय बोलायचे हे माहीत नसल्याने त्या बुजल्यासारख्या दिसत होत्या. त्यांना वर्षातार्इंनी पुढे आणून बसवले तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अनिता चव्हाण शेवटपर्यंत उभ्याच होत्या. मुख्यमंत्री फडणवीस आले, आणि सगळ्यांनी त्यांना निवेदन दिले. लवकरच नेमणूक करतो, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यावर लवकरच म्हणजे कधी, असा सवाल वर्षातार्इंनी केला. तेव्हा लवकर म्हणजे लवकरात लवकर... असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले आणि सगळ्या महिला मंडळात हंशा पिकला... शिष्टमंडळाचे काम झाल्यानंतर मंदातार्इंनी नवी मुंबईने स्मार्ट सिटीतून अंग काढून घेतल्याची तक्रार करून टाकली...खडसे आणि गुलाबराव एकत्रमहसूलमंत्री एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांचे तसे फारसे सख्य नाही. दोघेही जाहीरपणे एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र आज दोघे एकत्र आले तेही मुख्यमंत्र्यांच्या अ‍ॅन्टी चेंबरमध्ये. निमित्त होते, जळगावच्या केळ्यांना न्याय देण्याचे. शालेय पोषण आहारात केळी देणे सक्तीचे करा, असा आग्रह धरत जळगाव जिल्ह्यातील सगळे आमदार एकत्र आले. गणितज्ज्ञ भास्कराचार्य यांनी पाटणादेवी येथे शून्याचा शोध लावला तर जागतिक दर्जाचे चित्रकार, शिल्पकार केकी मुस चाळीसगावचे. या दोघांचे स्मारक व्हावे, असा आग्रहही जळगावकर आमदारांनी धरला. शून्याचा शोध जर परदेशात लागला असता तर ते जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र झाले असते, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी या कामात लक्ष घालण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. आता आम्ही माध्यमांना काय सांगायचे असेही काहींनी विचारले तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, अधिवेशन संपण्याच्या आत निर्णय घेऊ... या निमित्ताने काही काळ का होईना, गुलाबराव आणि खडसे एकत्र आले. मुख्यमंत्र्यांच्या अ‍ॅन्टी चेंबरला दोन दरवाजे. दोघे दोन दरवाजाने आत आले आणि वेगळ्या दरवाजाने गेले... कोण म्हणतो, अधिवेशनात काम नाही...हिवाळी अधिवेशनात काही काम होताना दिसत नाही. प्रत्येकाच्या सोयीने विषय हाताळले जात आहेत. मात्र ज्यांना येथे थांबण्याशिवाय पर्याय नाही त्यांना मात्र भरपूर कामे लागली आहेत... सकाळी गुलाबी थंडीत लवकर उठून पायी फिरायला जाणे, रोज सकाळी उद्या नक्की जीमला जायचे असा निर्णय घेणे, त्यानंतर नागपुरातील खाण्याचे अड्डे शोधून तेथे ब्रेकफास्ट करणे, विधानभवनात आल्यानंतर नागपुरी संत्र्यांचा ज्यूस पिणे, दुपारी कुणी ना कुणी आणलेले सावजीचे जेवण घेणे, सायंकाळी पुन्हा एकदा ज्यूसचा राऊंड घेत घेत रात्रीचे ‘नियोजन’ करणे यातच त्यांचा दिवस कधी संपतोय हे कळेनासे झाले आहे... उगाच नागपूरबाहेर राहणाऱ्यांना वाटते की नागपुरात असे काय काम असते... गैरसमज दूर व्हावा म्हणून हे सांगायला नको का...४ अतुल कुलकर्णी