शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

सर्वपक्षीय महिला आमदारांचा मुख्यमंत्र्यांना आग्रह

By admin | Updated: December 10, 2015 02:59 IST

अधिवेशनाचे कामकाज होत नाही, निदान बाकी सार्वजनिक कामे तरी करून घ्यावीत अशी चर्चा सर्वपक्षीय महिला आमदारांनी केली आणि राज्य महिला आयोगावर तातडीने कुणाची तरी नेमणूक करा

अधिवेशनाचे कामकाज होत नाही, निदान बाकी सार्वजनिक कामे तरी करून घ्यावीत अशी चर्चा सर्वपक्षीय महिला आमदारांनी केली आणि राज्य महिला आयोगावर तातडीने कुणाची तरी नेमणूक करा, असा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरण्याचा निर्णय झाला. लगेच निवेदन तयार केले गेले, सौ. वर्षा गायकवाड, सौ. मंदाताई म्हात्रे, सौ. अनिता अशोक चव्हाण, श्रीमती सुमनताई पाटील यांच्यासह सर्वपक्षीय महिला आमदारांचा मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या दालनात येऊन धडकला. तेथे काही पत्रकार बसलेले पाहून मंदाताई आणि वर्षा गायकवाड यांच्यात लटकी जुगलबंदीही झाली. वर्षाताई म्हणाल्या, तातडीने आयोगावर नेमणूक केलीच पाहिजे, त्यावर मंदाताई म्हणाल्या, तुमचे सरकार होते तेव्हा का नाही केली. आता आम्ही नक्की करणार आहोत. घाई करू नका... आर.आर. पाटील यांच्या पत्नी सौ. सुमनताई ही तेथे होत्या. त्यांना नेमके काय बोलायचे हे माहीत नसल्याने त्या बुजल्यासारख्या दिसत होत्या. त्यांना वर्षातार्इंनी पुढे आणून बसवले तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अनिता चव्हाण शेवटपर्यंत उभ्याच होत्या. मुख्यमंत्री फडणवीस आले, आणि सगळ्यांनी त्यांना निवेदन दिले. लवकरच नेमणूक करतो, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यावर लवकरच म्हणजे कधी, असा सवाल वर्षातार्इंनी केला. तेव्हा लवकर म्हणजे लवकरात लवकर... असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले आणि सगळ्या महिला मंडळात हंशा पिकला... शिष्टमंडळाचे काम झाल्यानंतर मंदातार्इंनी नवी मुंबईने स्मार्ट सिटीतून अंग काढून घेतल्याची तक्रार करून टाकली...खडसे आणि गुलाबराव एकत्रमहसूलमंत्री एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांचे तसे फारसे सख्य नाही. दोघेही जाहीरपणे एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र आज दोघे एकत्र आले तेही मुख्यमंत्र्यांच्या अ‍ॅन्टी चेंबरमध्ये. निमित्त होते, जळगावच्या केळ्यांना न्याय देण्याचे. शालेय पोषण आहारात केळी देणे सक्तीचे करा, असा आग्रह धरत जळगाव जिल्ह्यातील सगळे आमदार एकत्र आले. गणितज्ज्ञ भास्कराचार्य यांनी पाटणादेवी येथे शून्याचा शोध लावला तर जागतिक दर्जाचे चित्रकार, शिल्पकार केकी मुस चाळीसगावचे. या दोघांचे स्मारक व्हावे, असा आग्रहही जळगावकर आमदारांनी धरला. शून्याचा शोध जर परदेशात लागला असता तर ते जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र झाले असते, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी या कामात लक्ष घालण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. आता आम्ही माध्यमांना काय सांगायचे असेही काहींनी विचारले तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, अधिवेशन संपण्याच्या आत निर्णय घेऊ... या निमित्ताने काही काळ का होईना, गुलाबराव आणि खडसे एकत्र आले. मुख्यमंत्र्यांच्या अ‍ॅन्टी चेंबरला दोन दरवाजे. दोघे दोन दरवाजाने आत आले आणि वेगळ्या दरवाजाने गेले... कोण म्हणतो, अधिवेशनात काम नाही...हिवाळी अधिवेशनात काही काम होताना दिसत नाही. प्रत्येकाच्या सोयीने विषय हाताळले जात आहेत. मात्र ज्यांना येथे थांबण्याशिवाय पर्याय नाही त्यांना मात्र भरपूर कामे लागली आहेत... सकाळी गुलाबी थंडीत लवकर उठून पायी फिरायला जाणे, रोज सकाळी उद्या नक्की जीमला जायचे असा निर्णय घेणे, त्यानंतर नागपुरातील खाण्याचे अड्डे शोधून तेथे ब्रेकफास्ट करणे, विधानभवनात आल्यानंतर नागपुरी संत्र्यांचा ज्यूस पिणे, दुपारी कुणी ना कुणी आणलेले सावजीचे जेवण घेणे, सायंकाळी पुन्हा एकदा ज्यूसचा राऊंड घेत घेत रात्रीचे ‘नियोजन’ करणे यातच त्यांचा दिवस कधी संपतोय हे कळेनासे झाले आहे... उगाच नागपूरबाहेर राहणाऱ्यांना वाटते की नागपुरात असे काय काम असते... गैरसमज दूर व्हावा म्हणून हे सांगायला नको का...४ अतुल कुलकर्णी