शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

शहरीकरण हे संकट नव्हे संधी समजा - नरेंद्र मोदी

By admin | Updated: June 25, 2016 18:52 IST

शहरीकरणाकडे संकट म्हणून नाही तर संधी म्हणून पाहिल्यास त्यावर उपाययोजना करणे अधिक सोपे जाते, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले

ऑनलाइन लोकमत - 
पुणे, दि. 25 - यापूर्वी शहरीकरण हे संकट मानले जायचे, परंतु त्याकडे संकट म्हणून नाही तर, संधी म्हणून पाहिल्यास त्यावर उपाययोजना करणे अधिक सोपे जाते, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेतील प्रकल्पांचा शुभारंभ दिमाखदार सोहळयात शनिवारी बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूलात झाला. यावेळी ते बोलत होते़ कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव,  केंद्रीय नगर विकास मंत्री वैंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री बाबूल सुप्रियो, पुण्याचे पालक मंत्री गिरीष बापट, खासदार अनिल शिरोळे, महापौर प्रशांत जगताप, सचिव स्वाधीन क्षत्रिय महापालिका आयुक्त कुणालकुमार यावेळी उपस्थित होते. 
 
मोदी म्हणाले, शहरीकरणाला संकट समजलो तर त्याच्याशी समरस होणे कठीण होईल. आम्ही शहरीकरणाला संधीमध्ये परावर्तीत करण्याचा प्रयत्न करतोय. गरिबीला पचवण्याची सर्वाधिक ताकद शहरात आहे. त्यामुळेच जिथे जास्त गरिबी असते तेथून लोक शहराकडे कामाच्या शोधात येतात. शहरांना ताकद देणे ही आमची जबाबदारी आहे. त्यातून निर्माण होणारी उर्जा विकासासाठी लावता येईल. प्रत्येक शहरांना इमारती, रस्त्त्याच्या लांबीने मोजता येऊ शकत नाही. शहराचे आपले सौंदर्य, आत्मा, आणि ओळख असते. स्मार्ट सिटीचा विचार करताना ते अबाधित ठेवण्यासाठी जनतेकडून विचार मागवले जातात. आत्मा तोच राहील मात्र कायाकल्प बदलून जाईल. बदलत्या जीवनशैलीत व्यवस्थेला गती प्राप्त व्हायला हवी. तंत्रज्ञानाचा वापर स्मार्टफोन द्वारे होतोय मात्र हे तंत्रज्ञान सामुहिक सेवांचे माध्यम व्हावे. 
 
स्मार्ट सिटीच्या स्पर्धेमुळे वातावरण बदलले, असे सांगून मोदी म्हणाले, महापालिकेच्या अधिकारी, कर्मचा-यांसह नागरिकांनाही वाटतेय आपले शहर क्रमांक एकचे शहर बनावे. देशात आम्ही गरीब आहोत याची स्पर्धा होती. हे शासन पुढे जाण्याची स्पर्धा करीत आहे. पुढे जाण्याचे रस्ते शोधत आहे. शहरांमध्ये स्पर्धा लागली आहे. पुणे असे व्हावे हे दिल्लीपेक्षा पुणेकरच अधिक चांगल्या पद्धतीने विचार करु शकतात. कल्पनांचे आदानप्रदान हा मुख्य विषय होईल. सरकारी खजान्यातून मिळणा-या गोष्टींसाठी असणा-या योजना चांगल्या असे मानले जायचे, त्यामध्ये पहिल्यांदा बदल झाला आहे. पहिल्यांदाच पंतप्रधान काही देत नाही, मात्र स्वच्छतेचा आग्रह धरत आहे. सर्वात अग्रभागी स्वच्छ भारत योजना आहे, हे अनेक सर्वेक्षणातून समोर आले आहे. संधी द्या आम्ही काही करुन दाखवू शकतो या स्वभावाचे आपल्या देशाचे नागरिक आहेत. 
कंपोस्ट खताला अनुदान देणार 
शहरात निर्माण होणाºया कचºयापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाणार आहे़ रासायनिक खतामुळे शेतीचे नुकसान होत असताना हे खत उपयोगी ठरेल़ त्यामुळे हे खत खरेदी करणाºया शेतकºयांना युरियाप्रमाणेच अनुदान दिले जाईल व खतविक्री केल्याने महापालिकांनाही फायदा होईल, अशी विन विन परिस्थिती असेल, असे मोदी यांनी सांगितले़