शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
3
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
4
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
5
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
6
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
7
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
8
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
9
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
10
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
11
गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल
12
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
13
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
14
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
15
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
16
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
17
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
18
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
19
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
20
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप

शहरीकरण हे संकट नव्हे संधी समजा - नरेंद्र मोदी

By admin | Updated: June 25, 2016 18:52 IST

शहरीकरणाकडे संकट म्हणून नाही तर संधी म्हणून पाहिल्यास त्यावर उपाययोजना करणे अधिक सोपे जाते, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले

ऑनलाइन लोकमत - 
पुणे, दि. 25 - यापूर्वी शहरीकरण हे संकट मानले जायचे, परंतु त्याकडे संकट म्हणून नाही तर, संधी म्हणून पाहिल्यास त्यावर उपाययोजना करणे अधिक सोपे जाते, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेतील प्रकल्पांचा शुभारंभ दिमाखदार सोहळयात शनिवारी बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूलात झाला. यावेळी ते बोलत होते़ कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव,  केंद्रीय नगर विकास मंत्री वैंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री बाबूल सुप्रियो, पुण्याचे पालक मंत्री गिरीष बापट, खासदार अनिल शिरोळे, महापौर प्रशांत जगताप, सचिव स्वाधीन क्षत्रिय महापालिका आयुक्त कुणालकुमार यावेळी उपस्थित होते. 
 
मोदी म्हणाले, शहरीकरणाला संकट समजलो तर त्याच्याशी समरस होणे कठीण होईल. आम्ही शहरीकरणाला संधीमध्ये परावर्तीत करण्याचा प्रयत्न करतोय. गरिबीला पचवण्याची सर्वाधिक ताकद शहरात आहे. त्यामुळेच जिथे जास्त गरिबी असते तेथून लोक शहराकडे कामाच्या शोधात येतात. शहरांना ताकद देणे ही आमची जबाबदारी आहे. त्यातून निर्माण होणारी उर्जा विकासासाठी लावता येईल. प्रत्येक शहरांना इमारती, रस्त्त्याच्या लांबीने मोजता येऊ शकत नाही. शहराचे आपले सौंदर्य, आत्मा, आणि ओळख असते. स्मार्ट सिटीचा विचार करताना ते अबाधित ठेवण्यासाठी जनतेकडून विचार मागवले जातात. आत्मा तोच राहील मात्र कायाकल्प बदलून जाईल. बदलत्या जीवनशैलीत व्यवस्थेला गती प्राप्त व्हायला हवी. तंत्रज्ञानाचा वापर स्मार्टफोन द्वारे होतोय मात्र हे तंत्रज्ञान सामुहिक सेवांचे माध्यम व्हावे. 
 
स्मार्ट सिटीच्या स्पर्धेमुळे वातावरण बदलले, असे सांगून मोदी म्हणाले, महापालिकेच्या अधिकारी, कर्मचा-यांसह नागरिकांनाही वाटतेय आपले शहर क्रमांक एकचे शहर बनावे. देशात आम्ही गरीब आहोत याची स्पर्धा होती. हे शासन पुढे जाण्याची स्पर्धा करीत आहे. पुढे जाण्याचे रस्ते शोधत आहे. शहरांमध्ये स्पर्धा लागली आहे. पुणे असे व्हावे हे दिल्लीपेक्षा पुणेकरच अधिक चांगल्या पद्धतीने विचार करु शकतात. कल्पनांचे आदानप्रदान हा मुख्य विषय होईल. सरकारी खजान्यातून मिळणा-या गोष्टींसाठी असणा-या योजना चांगल्या असे मानले जायचे, त्यामध्ये पहिल्यांदा बदल झाला आहे. पहिल्यांदाच पंतप्रधान काही देत नाही, मात्र स्वच्छतेचा आग्रह धरत आहे. सर्वात अग्रभागी स्वच्छ भारत योजना आहे, हे अनेक सर्वेक्षणातून समोर आले आहे. संधी द्या आम्ही काही करुन दाखवू शकतो या स्वभावाचे आपल्या देशाचे नागरिक आहेत. 
कंपोस्ट खताला अनुदान देणार 
शहरात निर्माण होणाºया कचºयापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाणार आहे़ रासायनिक खतामुळे शेतीचे नुकसान होत असताना हे खत उपयोगी ठरेल़ त्यामुळे हे खत खरेदी करणाºया शेतकºयांना युरियाप्रमाणेच अनुदान दिले जाईल व खतविक्री केल्याने महापालिकांनाही फायदा होईल, अशी विन विन परिस्थिती असेल, असे मोदी यांनी सांगितले़