शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
3
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
4
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
5
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
6
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
7
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
8
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
9
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
10
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
11
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
12
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
13
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
14
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
15
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
16
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
17
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
18
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
19
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
20
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड

शहरीकरण हे संकट नव्हे संधी समजा - नरेंद्र मोदी

By admin | Updated: June 25, 2016 18:52 IST

शहरीकरणाकडे संकट म्हणून नाही तर संधी म्हणून पाहिल्यास त्यावर उपाययोजना करणे अधिक सोपे जाते, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले

ऑनलाइन लोकमत - 
पुणे, दि. 25 - यापूर्वी शहरीकरण हे संकट मानले जायचे, परंतु त्याकडे संकट म्हणून नाही तर, संधी म्हणून पाहिल्यास त्यावर उपाययोजना करणे अधिक सोपे जाते, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेतील प्रकल्पांचा शुभारंभ दिमाखदार सोहळयात शनिवारी बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूलात झाला. यावेळी ते बोलत होते़ कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव,  केंद्रीय नगर विकास मंत्री वैंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री बाबूल सुप्रियो, पुण्याचे पालक मंत्री गिरीष बापट, खासदार अनिल शिरोळे, महापौर प्रशांत जगताप, सचिव स्वाधीन क्षत्रिय महापालिका आयुक्त कुणालकुमार यावेळी उपस्थित होते. 
 
मोदी म्हणाले, शहरीकरणाला संकट समजलो तर त्याच्याशी समरस होणे कठीण होईल. आम्ही शहरीकरणाला संधीमध्ये परावर्तीत करण्याचा प्रयत्न करतोय. गरिबीला पचवण्याची सर्वाधिक ताकद शहरात आहे. त्यामुळेच जिथे जास्त गरिबी असते तेथून लोक शहराकडे कामाच्या शोधात येतात. शहरांना ताकद देणे ही आमची जबाबदारी आहे. त्यातून निर्माण होणारी उर्जा विकासासाठी लावता येईल. प्रत्येक शहरांना इमारती, रस्त्त्याच्या लांबीने मोजता येऊ शकत नाही. शहराचे आपले सौंदर्य, आत्मा, आणि ओळख असते. स्मार्ट सिटीचा विचार करताना ते अबाधित ठेवण्यासाठी जनतेकडून विचार मागवले जातात. आत्मा तोच राहील मात्र कायाकल्प बदलून जाईल. बदलत्या जीवनशैलीत व्यवस्थेला गती प्राप्त व्हायला हवी. तंत्रज्ञानाचा वापर स्मार्टफोन द्वारे होतोय मात्र हे तंत्रज्ञान सामुहिक सेवांचे माध्यम व्हावे. 
 
स्मार्ट सिटीच्या स्पर्धेमुळे वातावरण बदलले, असे सांगून मोदी म्हणाले, महापालिकेच्या अधिकारी, कर्मचा-यांसह नागरिकांनाही वाटतेय आपले शहर क्रमांक एकचे शहर बनावे. देशात आम्ही गरीब आहोत याची स्पर्धा होती. हे शासन पुढे जाण्याची स्पर्धा करीत आहे. पुढे जाण्याचे रस्ते शोधत आहे. शहरांमध्ये स्पर्धा लागली आहे. पुणे असे व्हावे हे दिल्लीपेक्षा पुणेकरच अधिक चांगल्या पद्धतीने विचार करु शकतात. कल्पनांचे आदानप्रदान हा मुख्य विषय होईल. सरकारी खजान्यातून मिळणा-या गोष्टींसाठी असणा-या योजना चांगल्या असे मानले जायचे, त्यामध्ये पहिल्यांदा बदल झाला आहे. पहिल्यांदाच पंतप्रधान काही देत नाही, मात्र स्वच्छतेचा आग्रह धरत आहे. सर्वात अग्रभागी स्वच्छ भारत योजना आहे, हे अनेक सर्वेक्षणातून समोर आले आहे. संधी द्या आम्ही काही करुन दाखवू शकतो या स्वभावाचे आपल्या देशाचे नागरिक आहेत. 
कंपोस्ट खताला अनुदान देणार 
शहरात निर्माण होणाºया कचºयापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाणार आहे़ रासायनिक खतामुळे शेतीचे नुकसान होत असताना हे खत उपयोगी ठरेल़ त्यामुळे हे खत खरेदी करणाºया शेतकºयांना युरियाप्रमाणेच अनुदान दिले जाईल व खतविक्री केल्याने महापालिकांनाही फायदा होईल, अशी विन विन परिस्थिती असेल, असे मोदी यांनी सांगितले़