शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

रचनात्मक कामाचा प्रचार न झाल्याने युपीएचा पराभव

By admin | Updated: May 30, 2014 01:02 IST

केंद्र सरकारवर घोटाळ्याचे आरोप होताच त्यावर स्पष्टीकरण देण्याची गरज होती. त्यातच केंद्र शासनाच्या रचनात्मक कामाचा प्रचार न झाल्याने लोकसभा निवडणुकीत युपीएला पराभव झाला, असे मत

मणिशंकर अय्यर  : आरोपावर वेळीच स्पष्टीकरण झाले नाहीनागपूर : केंद्र सरकारवर घोटाळ्याचे आरोप होताच त्यावर स्पष्टीकरण देण्याची गरज होती.   त्यातच केंद्र शासनाच्या रचनात्मक कामाचा प्रचार न झाल्याने लोकसभा निवडणुकीत युपीएला  पराभव झाला, असे मत माजी केंद्रीय मंत्री खा. मणिशंकर अय्यर यांनी गुरुवारी व्यक्त केले. प्रदेश  काँग्रेसचे माजी अध्यक्ष रणजित देशमुख यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त रामटेक येथे  आयोजित कार्यक्रमासाठी आले असता, देशमुख यांच्या निवासस्थानी पत्रपरिषदेत ते बोलत होते.युपीए सरकारने मनरेगा, राष्ट्रीय पेयजल, इंदिरा आवास, अन्नसुरक्षा अशा रचनात्मक योजना हाती  घेतल्या. विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात या योजना केंद्र शासनाने राबविल्याचा प्रचार  करण्यात आम्ही कमी पडलो. काँग्रेसच नव्हे तर समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, अकाली  लोकदल व नॅशनल कॉन्फरन्स अशा पक्षांनाही पराभवाला सामोरे जावे लागले.  पक्षाच्या नेत्या  सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यामुळे किमान ४४ जागा तरी मिळाल्या नाही तर इतक्याही जागा  मिळाल्या नसत्या, असे अय्यर म्हणाले. पक्षाने उमेदवारांची नावे सहा महिन्यापूर्वीच जाहीर  करायला हवी होती. काही उमेदवारांची नावे उमेदवारी अर्ज भरण्याला काही तासाचा अवधी  शिल्लक असताना जाहीर करण्यात आली. घोटाळे झाले नसतानाही याचे वेळीच स्पष्टीकरण दिले  नाही. ज्यांना कोळशाचे कंत्राट मिळाले त्यात विरोधी पक्षाचेच लोक होते. मोदी सरकारचा देशाला  धोका असून आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे. यापूर्वीच्या निवडणुकीतही अनेकदा  काँग्रेसचा पराभव झाला. त्यामुळे  यातून पक्ष लवकरच सावरेल, असा विश्‍वास अय्यर यांनी व्यक्त  केला. यावेळी रणजित देशमुख व डॉ. अमोल देशमुख उपस्थित होते.एसआयटीने निवडणूक खर्चाचाही शोध घ्यावाकाळ्यय़ा पैशाचा शोध घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने भाजपने निवडणुकीत  केलेल्या हजारो कोटींच्या खर्चाचाही शोध घ्यावा. (प्रतिनिधी) त्यांना परदेशातील बँकामध्ये ठेवलेल्या काळ्या पैशाचा शोध घेण्याची गरज भासणार नसल्याचे  मणिशंकर अय्यर म्हणाले. (प्रतिनिधी)