शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

‘संपुआ’ सरकारने केले होते ४ ‘सर्जिकल स्ट्राईक’ - शरद पवारांचा गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2016 20:36 IST

माझ्या कार्यकाळात 4 वेळा सर्जिकल स्ट्राइक झालं होतं, मात्र आम्ही त्याचा कधीही गवगवा केला नाही

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि.06 -  ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या मुद्द्यावरुन देशातील राजकारण तापायला सुरुवात झाली असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ‘बॉम्बगोळा’ टाकला आहे. मोदी सरकारने उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी टाकलेल्या पावलाचे आम्ही स्वागतच करतो. मात्र त्याचा गवगवा करणे योग्य नाही. ‘संपुआ’ सरकारच्या काळात सैन्याने ४ वेळा पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन हल्ले केले होते. परंतु त्याचा गवगवा करण्यात आला नव्हता, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले. नागपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

उरी येथे सैन्यदलाच्या छावणीवर झालेल्या हल्ल्याने देशवासीयांचे मन हेलावून गेले. सर्वांनाच चीड आली होती व आता बदला घेतलाच पाहिजे ही देशाची भावना होती. एरवी केंद्र शासनाच्या विविध बाबींवर मी टीका करतो. परंतु दहशतवाद्यांची शिबीरे उध्वस्त करण्यासाठी पाकव्याप्त काश्मिरमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे स्वागतच करतो. मात्र अशा संकटांना तोंड द्यायचे असते. कारवाई केल्यानंतर गवगवा करण्याची बाब खटकली आहे. देशाला एकसंघ ठेवणे ही राज्यकर्त्यांची पहिली जबाबदारी आहे, असे पवार म्हणाले. 
 
देशाने एक व्हायला हवे
 
देशाच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर राजकारण व्हायला नको. निवडणूका येतात आणि जातात. परंतु देशाची सीमा अखंड आणि सुरक्षित रहायला हवी. देशावर संकट येत असेल तर संपूर्ण देशाने एकत्र व्हायला हवे. या मुद्द्यावर आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत व कधीही राजकारण आणणार नाही, असे शरद पवार म्हणाले.