शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण विकास होईपर्यंत ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ सुरूच राहणार

By admin | Updated: May 2, 2017 05:03 IST

घनकरचरा, वाहतूक, भ्रष्टाचार, दुष्काळ आदी महाराष्ट्रासमोरील विविध समस्यांच्या निराकरणासाठी, व्यासपीठावरून

मुंबई : घनकरचरा, वाहतूक, भ्रष्टाचार, दुष्काळ आदी महाराष्ट्रासमोरील विविध समस्यांच्या निराकरणासाठी, व्यासपीठावरून अभिनव संकल्पनांची मांडणी करणारे विद्यार्थी आणि समोर प्रेक्षकांमध्ये बसून विद्यार्थ्यांच्या भूमिकेत या संकल्पना समजून घेणारे, प्रसंगी अधिक माहिती विचारत, बदल सुचविणारे खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे अनोखे दृश्य सोमवारी वरळी येथील एनएससीआय सभागृहात पाहायला मिळाले. नव्या महाराष्ट्राच्या निर्मितीत युवावर्गाने सहभाग घ्यावा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राज्यासमोरील समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचवाव्यात, यासाठी ‘अ‍ॅक्शन फॉर कलेक्टिव्ह ट्रान्स्फॉर्मेशन (एसीटी)’अंतर्गत ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत राज्यभर एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात सहा लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत, तब्बल २३०० संकल्पनांचे सादरीकरण केले. त्यातून विविध महाविद्यालयांच्या ११ संघांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली. या ११ संघांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांसमोर उपाययोजनांचे सादरीकरण केले.दुष्काळमुक्त महाराष्ट्र, वाहतूक व्यवस्थेचे एकात्मिकरण, नागरिकांचा प्रशासनातील सहभाग, घनकचरा व्यवस्थापन, नागरी गरिबी निर्मूलन, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, नागरिकांचा प्रशासनात सहभाग, स्टार्टअप इंडिया, ग्रामीण भागातील जीवनस्तर उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, जलद न्यायदानासाठी आधुनिक पद्धतींचा अवलंब आदी एकूण ११ विषयांवर सादरीकरण करण्यात आले. सर्व सादरीकरण निश्चितच चांगले होते. आज गौरविण्यात आलेले ११ संघ नवा महाराष्ट्र घडविण्यात निश्चितच योगदान देतील, त्याचा आम्हीही आमच्या कामकाजात वापर करणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. अंमलबजावणीसाठी स्वतंत्र टीम‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात येईल. यात मंत्रिगटातील एक, मुख्यमंत्री सचिवालयातील संबंधित अधिकारी आदींचा समावेश असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)रतन टाटांसारखे दुसरे नाहीचरतन टाटा यांच्यासारखा कुणी असू शकत नाही, ते एकमेव आहेत, असा गौरवपूर्ण उल्लेख करत, मुख्यमंत्री म्हणाले की, राजकारण आणि कापोर्रेट यांनी राष्ट्राला प्राधान्य देत, हातात हात घालून काम केले पाहिजे. आपण राष्ट्रासाठी काम करतोय, राष्ट्र प्रथम ही भावना लक्षात घेऊन परिवर्तनासाठी प्रयत्न करावे. रतन टाटा यांचे काम उल्लेखनीय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. अक्षयकुमारची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी जुन्या काळातील टेलिफोन बुथच्या धर्तीवर प्रत्येक पाचशे अथवा हजार मीटरच्या अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत. शिवाय, जागोजागच्या स्वच्छतागृहांची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी विशेष अ‍ॅप विकसित करावे, अशी मागणी सुप्रसिद्ध अभिनेता अक्षयकुमार याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावर लवकरच कार्यवाही करून राज्यातील स्वच्छतागृहे जिओ टॅगिंगवर आणण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.या कार्यक्रमात अक्षयकुमार आणि ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रश्नोत्तरादरम्यान अक्षयकुमारने विशेषत: महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.