शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
2
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
3
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
4
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
5
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
6
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
7
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
8
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
9
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
10
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
11
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
12
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
13
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
14
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
15
टाटा-पेप्सी सारख्या कंपनीतील नोकरी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट! आता वर्षाला कमावतोय ५ कोटी
16
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
17
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
18
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
19
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
20
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य

संपूर्ण विकास होईपर्यंत ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ सुरूच राहणार

By admin | Updated: May 2, 2017 05:03 IST

घनकरचरा, वाहतूक, भ्रष्टाचार, दुष्काळ आदी महाराष्ट्रासमोरील विविध समस्यांच्या निराकरणासाठी, व्यासपीठावरून

मुंबई : घनकरचरा, वाहतूक, भ्रष्टाचार, दुष्काळ आदी महाराष्ट्रासमोरील विविध समस्यांच्या निराकरणासाठी, व्यासपीठावरून अभिनव संकल्पनांची मांडणी करणारे विद्यार्थी आणि समोर प्रेक्षकांमध्ये बसून विद्यार्थ्यांच्या भूमिकेत या संकल्पना समजून घेणारे, प्रसंगी अधिक माहिती विचारत, बदल सुचविणारे खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे अनोखे दृश्य सोमवारी वरळी येथील एनएससीआय सभागृहात पाहायला मिळाले. नव्या महाराष्ट्राच्या निर्मितीत युवावर्गाने सहभाग घ्यावा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राज्यासमोरील समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचवाव्यात, यासाठी ‘अ‍ॅक्शन फॉर कलेक्टिव्ह ट्रान्स्फॉर्मेशन (एसीटी)’अंतर्गत ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत राज्यभर एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात सहा लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत, तब्बल २३०० संकल्पनांचे सादरीकरण केले. त्यातून विविध महाविद्यालयांच्या ११ संघांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली. या ११ संघांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांसमोर उपाययोजनांचे सादरीकरण केले.दुष्काळमुक्त महाराष्ट्र, वाहतूक व्यवस्थेचे एकात्मिकरण, नागरिकांचा प्रशासनातील सहभाग, घनकचरा व्यवस्थापन, नागरी गरिबी निर्मूलन, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, नागरिकांचा प्रशासनात सहभाग, स्टार्टअप इंडिया, ग्रामीण भागातील जीवनस्तर उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, जलद न्यायदानासाठी आधुनिक पद्धतींचा अवलंब आदी एकूण ११ विषयांवर सादरीकरण करण्यात आले. सर्व सादरीकरण निश्चितच चांगले होते. आज गौरविण्यात आलेले ११ संघ नवा महाराष्ट्र घडविण्यात निश्चितच योगदान देतील, त्याचा आम्हीही आमच्या कामकाजात वापर करणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. अंमलबजावणीसाठी स्वतंत्र टीम‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात येईल. यात मंत्रिगटातील एक, मुख्यमंत्री सचिवालयातील संबंधित अधिकारी आदींचा समावेश असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)रतन टाटांसारखे दुसरे नाहीचरतन टाटा यांच्यासारखा कुणी असू शकत नाही, ते एकमेव आहेत, असा गौरवपूर्ण उल्लेख करत, मुख्यमंत्री म्हणाले की, राजकारण आणि कापोर्रेट यांनी राष्ट्राला प्राधान्य देत, हातात हात घालून काम केले पाहिजे. आपण राष्ट्रासाठी काम करतोय, राष्ट्र प्रथम ही भावना लक्षात घेऊन परिवर्तनासाठी प्रयत्न करावे. रतन टाटा यांचे काम उल्लेखनीय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. अक्षयकुमारची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी जुन्या काळातील टेलिफोन बुथच्या धर्तीवर प्रत्येक पाचशे अथवा हजार मीटरच्या अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत. शिवाय, जागोजागच्या स्वच्छतागृहांची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी विशेष अ‍ॅप विकसित करावे, अशी मागणी सुप्रसिद्ध अभिनेता अक्षयकुमार याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावर लवकरच कार्यवाही करून राज्यातील स्वच्छतागृहे जिओ टॅगिंगवर आणण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.या कार्यक्रमात अक्षयकुमार आणि ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रश्नोत्तरादरम्यान अक्षयकुमारने विशेषत: महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.