शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता 
2
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
3
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
4
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
5
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
6
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
7
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
8
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
9
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
10
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
11
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
12
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
13
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
14
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
15
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
16
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
17
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
18
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
19
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट

कर्जमाफी होईपर्यंत ‘संघर्ष’ सुरूच!

By admin | Updated: April 7, 2017 05:24 IST

कृषी अर्थव्यवस्था कोलमडली तर महाराष्ट्र कोलमडेल. शेतकरी दुष्काळाच्या छायेत असताना पूर्ण कर्जमाफीशिवाय पर्याय नाही.

कऱ्हाड (जि. सातारा) : ‘कृषी अर्थव्यवस्था कोलमडली तर महाराष्ट्र कोलमडेल. शेतकरी दुष्काळाच्या छायेत असताना पूर्ण कर्जमाफीशिवाय पर्याय नाही. कर्जमाफीची घोषणा होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या घोषणेसाठी मुहूर्त न शोधता त्वरित घोषणा करावी,’ अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.कऱ्हाड येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘राज्यात फडणवीस सरकार आल्यापासून सुमारे नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, ते स्पष्ट होते. आम्ही विरोधी पक्षात असल्याने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी लावून धरली. पण १९ आमदारांना निलंबित करण्याचे पाप सरकारने केले. तमिळनाडू व उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना काही अटी, शर्ती घालून कर्जमाफी केली. पण महाराष्ट्रात आम्हाला कोणत्याही अटी-शर्तीशिवाय संपूर्ण कर्जमाफी हवी आहे; आणि ती झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.’’सभागृहामध्ये कितीही मुद्दे मांडले तरी हे सरकार त्याला दाद देत नाही. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्ही सर्व विरोधकांनी चांदा ते बांदापर्यंत संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच सर्व विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र आले असून, संघर्ष यात्रेचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये उत्तर महाराष्ट्रात ही संघर्ष यात्रा काढली जाणार आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>...तर मी त्यांना पहिला हार घालेनसुरुवातीला कर्जमाफीला विरोध करणारे मुख्यमंत्री आता योग्यवेळी कर्जमाफीचा निर्णय घेईन, असे सांगतात. परंतु त्यांची ही योग्य वेळ अजून किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर येणार आहे? शेतकऱ्यांचा अंत न पाहता त्यांनी जर संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेतला तर मी पहिल्यांदा त्यांना हार घालून अभिनंदन करेन. - आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री