शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

कर्जमाफी होईपर्यंत ‘संघर्ष’ सुरूच!

By admin | Updated: April 7, 2017 05:24 IST

कृषी अर्थव्यवस्था कोलमडली तर महाराष्ट्र कोलमडेल. शेतकरी दुष्काळाच्या छायेत असताना पूर्ण कर्जमाफीशिवाय पर्याय नाही.

कऱ्हाड (जि. सातारा) : ‘कृषी अर्थव्यवस्था कोलमडली तर महाराष्ट्र कोलमडेल. शेतकरी दुष्काळाच्या छायेत असताना पूर्ण कर्जमाफीशिवाय पर्याय नाही. कर्जमाफीची घोषणा होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या घोषणेसाठी मुहूर्त न शोधता त्वरित घोषणा करावी,’ अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.कऱ्हाड येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘राज्यात फडणवीस सरकार आल्यापासून सुमारे नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, ते स्पष्ट होते. आम्ही विरोधी पक्षात असल्याने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी लावून धरली. पण १९ आमदारांना निलंबित करण्याचे पाप सरकारने केले. तमिळनाडू व उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना काही अटी, शर्ती घालून कर्जमाफी केली. पण महाराष्ट्रात आम्हाला कोणत्याही अटी-शर्तीशिवाय संपूर्ण कर्जमाफी हवी आहे; आणि ती झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.’’सभागृहामध्ये कितीही मुद्दे मांडले तरी हे सरकार त्याला दाद देत नाही. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्ही सर्व विरोधकांनी चांदा ते बांदापर्यंत संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच सर्व विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र आले असून, संघर्ष यात्रेचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये उत्तर महाराष्ट्रात ही संघर्ष यात्रा काढली जाणार आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>...तर मी त्यांना पहिला हार घालेनसुरुवातीला कर्जमाफीला विरोध करणारे मुख्यमंत्री आता योग्यवेळी कर्जमाफीचा निर्णय घेईन, असे सांगतात. परंतु त्यांची ही योग्य वेळ अजून किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर येणार आहे? शेतकऱ्यांचा अंत न पाहता त्यांनी जर संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेतला तर मी पहिल्यांदा त्यांना हार घालून अभिनंदन करेन. - आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री