शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

राज्यात अवकाळीचा तिसरा तडाखा; १४ जिल्ह्यांमधील २८ हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त

By नितीन चौधरी | Updated: April 10, 2023 06:29 IST

अवकाळीच्या तिसऱ्या झटक्यात राज्यातील १४ जिल्ह्यांमधील तब्बल २८ हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली.

पुणे :

अवकाळीच्या तिसऱ्या झटक्यात राज्यातील १४ जिल्ह्यांमधील तब्बल २८ हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली. त्यात सर्वाधिक नाशिक जिल्ह्यातील तब्बल आठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. परिणामी आतापर्यंतचा नुकसानीचा आकडा तब्बल एक लाख तीस हजार हेक्टरवर पोहोचला आहे.

अवकाळीच्या पहिल्या टप्प्यात अर्थात ४ ते ९ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने  राज्यातील १५ जिल्ह्यांमधील ३८ हजार ६०६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर गुढीपाडव्यापूर्वी दुसऱ्यांदा दिलेल्या झटक्याने हजारो शेतकऱ्यांचा पाडवा कडू झाला होता. १५ ते २१ मार्चदरम्यान झालेल्या या पावसामुळे ३० जिल्ह्यांमध्ये तब्बल १ लाख ६० हजार हेक्टरवरील पिके झोपली.

आता तिसऱ्यांदा झालेल्या अवकाळी व गारपिटीमुळे कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अंदाजात २८ हजार २८७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ८ हजार ३ हेक्टरवरील कांदा, भाजीपाला व फळपिकांचा समावेश आहे. त्या खालोखाल नगर जिल्ह्यात ७ हजार ३०५ हेक्टरवरील मका, कांदा, वाटाणा, कलिंगड, आंबा, झेंडू, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, डाळिंब आदी पिकांचे नुकसान झाले. अकोला जिल्ह्यात तब्बल ५ हजार ८५९ हेक्टरवरील भुईमूग, कांदा, गहू, हरभरा व इतर पिकांना फटका बसला आहे.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सोमवारी ते अकोला जिल्ह्यातील पिकांची पाहणी करणार आहेत. मी नाशिक जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करणार आहे. अन्य वरिष्ठ अधिकारी नगर, धाराशिव या जिल्ह्यांत पाहणी करणार आहेत.- सुनील चव्हाण, आय़ुक्त, कृषी

जिल्हानिहाय नुकसान क्षेत्र (हेक्टरमध्ये)रत्नागिरी    ४६रायगड    ५०सिंधुदुर्ग    ३७नाशिक    ८००३धुळे    २९जळगाव    ५३पुणे    ३नगर    ७३०५सातारा    ४७बीड    २७६२धाराशिव    २८५९बुलढाणा    ११७४अकोला    ५८५९नागपूर    ६०एकूण    २८,२८७

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाRainपाऊस