शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

विस्कटलेली शैक्षणिक घडी नव्याने बसविली!

By admin | Updated: June 14, 2016 02:49 IST

दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची विस्कटलेली शैक्षणिक घडी आज भारतीय जैन संघटनेने पुन्हा बसविली. जिल्ह्यातील या शेतकऱ्यांच्या २० मुलांचे

सोलापूर : दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची विस्कटलेली शैक्षणिक घडी आज भारतीय जैन संघटनेने पुन्हा बसविली. जिल्ह्यातील या शेतकऱ्यांच्या २० मुलांचे संघटनेने पुण्याजवळील वाघोली येथे ‘बीजेएस’ शाळेमध्ये निवासी स्वरूपाचे शैक्षणिक पुनर्वसन केले. अतिशय भावपूर्ण वातावरणात या मुलांना आज निरोप देण्यात आला. बारावीपर्यंत तेथे मुलांच्या शिक्षणाची सोय होणार आहे.सोलापूर जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात कर्जबाजारीपणामुळे वीसहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण खोळंबले. भारतीय जैन संघटनेने या कुटुंबांना ठोस मदत करून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. या शेतकरी कुटुंबातील १३ मुले आणि ७ मुलींची शिक्षणाची मोफत सोय संघटनेच्या वाघोली येथील शाळेत करण्यात आली. या मुलांना निरोप देण्यासाठी महापौर सुशीला आबुटे, माजी आमदार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप माने, ‘लोकमत’चे संपादक राजा माने, पोलीस उपायुक्त अपर्णा गीते, स्वाती मनासावले उपस्थित होते. भारतीय जैन संघटनेचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून बारावीनंतरच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ, असे दिलीप माने म्हणाले.चांगला माणूस घडविणारवाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या शाळेमध्ये मुलांना शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यात येतील. त्यामुळे पालकांनी मुलांची चिंता करू नये, देशाचा सुजाण नागरिक आणि चांगला माणूस घडविण्याचे आमचे ध्येय असल्याचे प्रा. ज्योतीराम मोरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)