शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
4
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
5
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
6
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
7
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
8
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
9
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
10
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
11
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
12
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
13
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
14
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
15
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
16
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
17
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
18
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
19
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
20
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री

अमर्याद मोफत संभाषण

By admin | Updated: April 18, 2015 00:10 IST

बीएसएनएलचा उपक्रम : महाराष्ट्रदिनी होणार सुरूवात

रत्नागिरी : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने आपल्या दूरध्वनी ग्राहकांसाठी एक अनोखी योजना जाहीर केली असून रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत अगदी मोफत संभाषण करायला मिळणार आहे. तेही अगदी कुठल्याही कंपनीच्या दूरध्वनीसेवेसह अगदी भ्रमणध्वनी सेवेसाठीही योजना लागू होणार आहे. एक मे पासून देशभर ही योजना कार्यान्वित होणार आहे. जिल्ह्यातील ४३,८११ दूरध्वनीग्राहक तर ७८४४ वायरलेस सेवा असलेल्या ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. भ्रमणध्वनी सेवा सुरू झाल्यानंतर ग्राहकांनी दूरध्वनी सेवेकडे पाठ फिरवली. दूरध्वनीचा वापर केवळ ब्रॉडबँडसेवेकरिताच होऊ लागला होता. मात्र, भ्रमणध्वनीसेवेचा वापर अधिकाधिक होऊ लागला. अधिकाधिक प्रगत झालेल्या तंत्रज्ञानाने भ्रमणध्वनी सेवेबरोबरच इंटरनेटचीही सुविधा यावर उपलब्ध करून दिली. त्यामुळे मग ब्रॉडबँड सेवाही मागे पडू लागली. आता तर दूरध्वनी सेवा बंद पडते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी ४६,७०० इतकी असलेली दूरध्वनींची संख्या वर्षभरात पुन्हा खाली आली असून आता ४३,८०० झाली आहे. त्यामुळे या सेवेकडे ग्राहकांनी पुन्हा वळावे, यासाठी बीएसएनएलने ही नवी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.आज स्मार्ट फोन घराघरात नव्हे तर एकाकडेच एकापेक्षा जास्त फोन आलेत. त्यामुळे आता घरबसल्या मोबाईलवर हव्या त्या सेवा मिळू शकतात. काही अंशी त्याचा परिणाम दूरध्वनी सेवेवर झाला असला तरी घरातील ज्येष्ठांसाठी अजूनही कुठेतरी मजबूत असे जुने दूरध्वनी सेवेचे यंत्र वाजत असलेले दिसते.अजुनही ग्रामीण भागातील दूरध्वनी सेवा तग धरून आहे. शहरापेक्षा अधिक संख्या ग्रामीण भागात असून २६,३०० ग्राहक ग्रामीण भागातच आहेत. त्यामुळे सर्वच दृष्टीने चांगली असलेली ही सेवा कालबाह्य न होता ग्राहकांनी ती सुरू ठेवावी, यासाठी बीएसएनएल कंपनीने १ मेपासून रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत दूरध्वनीसेवा मोफत केली आहे. यासाठी कॉल दरात कुठलीही वाढ न करता केवळ मासिक दरात किरकोळ २० रूपयांची वाढ करून ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात वन इंडिया, सुलभ योजनांसाठीही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.१ मे पासून सुरू होणाऱ्या या अभिनव योजनेचा लाभ जिल्ह्यातील ४३,८११ दूरध्वनी ग्राहक तर ७८४४ वायरलेस सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी दूरध्वनी सेवेचे भाडे १२० होते ते आता १४० रूपये होणार आहे. शहरी भागात १४० होते ते आता १६० रूपये होणार आहे.‘वन इंडिया’ योजनेचा लाभ घेणाऱ्यांना १९५ रूपयांऐवजी केवळ २२० रूपये द्यावे लागणार आहेत. या अल्प वाढीत रात्री ९ ते सकाळी ७ दहा तास मोफत संभाषणाचा लाभ मिळणार आहे. (प्रतिनिधी)बदलाचा स्वीकार करायला हवा...ग्राहकांचे बीएसएनएलशी अतूट नाते आहे. दूरध्वनी सेवेला फार वर्षांची परंपरा आहे. दूरध्वनीपासून दूर जाणाऱ्या ग्राहकांना पुन्हा या उपयुक्त सेवेकडे वळविण्यासाठी बीएसएनएल कंपनीने ही योजना नव्याने लागू केली आहे. लोक सेवेचा वापर अधिक करीत असल्याने ही योजना नक्कीच यशस्वी होईल.- सुहास कांबळे, महाव्यवस्थापक, बीएसएनएल, रत्नागिरी.