शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

अमर्याद मोफत संभाषण

By admin | Updated: April 18, 2015 00:10 IST

बीएसएनएलचा उपक्रम : महाराष्ट्रदिनी होणार सुरूवात

रत्नागिरी : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने आपल्या दूरध्वनी ग्राहकांसाठी एक अनोखी योजना जाहीर केली असून रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत अगदी मोफत संभाषण करायला मिळणार आहे. तेही अगदी कुठल्याही कंपनीच्या दूरध्वनीसेवेसह अगदी भ्रमणध्वनी सेवेसाठीही योजना लागू होणार आहे. एक मे पासून देशभर ही योजना कार्यान्वित होणार आहे. जिल्ह्यातील ४३,८११ दूरध्वनीग्राहक तर ७८४४ वायरलेस सेवा असलेल्या ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. भ्रमणध्वनी सेवा सुरू झाल्यानंतर ग्राहकांनी दूरध्वनी सेवेकडे पाठ फिरवली. दूरध्वनीचा वापर केवळ ब्रॉडबँडसेवेकरिताच होऊ लागला होता. मात्र, भ्रमणध्वनीसेवेचा वापर अधिकाधिक होऊ लागला. अधिकाधिक प्रगत झालेल्या तंत्रज्ञानाने भ्रमणध्वनी सेवेबरोबरच इंटरनेटचीही सुविधा यावर उपलब्ध करून दिली. त्यामुळे मग ब्रॉडबँड सेवाही मागे पडू लागली. आता तर दूरध्वनी सेवा बंद पडते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी ४६,७०० इतकी असलेली दूरध्वनींची संख्या वर्षभरात पुन्हा खाली आली असून आता ४३,८०० झाली आहे. त्यामुळे या सेवेकडे ग्राहकांनी पुन्हा वळावे, यासाठी बीएसएनएलने ही नवी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.आज स्मार्ट फोन घराघरात नव्हे तर एकाकडेच एकापेक्षा जास्त फोन आलेत. त्यामुळे आता घरबसल्या मोबाईलवर हव्या त्या सेवा मिळू शकतात. काही अंशी त्याचा परिणाम दूरध्वनी सेवेवर झाला असला तरी घरातील ज्येष्ठांसाठी अजूनही कुठेतरी मजबूत असे जुने दूरध्वनी सेवेचे यंत्र वाजत असलेले दिसते.अजुनही ग्रामीण भागातील दूरध्वनी सेवा तग धरून आहे. शहरापेक्षा अधिक संख्या ग्रामीण भागात असून २६,३०० ग्राहक ग्रामीण भागातच आहेत. त्यामुळे सर्वच दृष्टीने चांगली असलेली ही सेवा कालबाह्य न होता ग्राहकांनी ती सुरू ठेवावी, यासाठी बीएसएनएल कंपनीने १ मेपासून रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत दूरध्वनीसेवा मोफत केली आहे. यासाठी कॉल दरात कुठलीही वाढ न करता केवळ मासिक दरात किरकोळ २० रूपयांची वाढ करून ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात वन इंडिया, सुलभ योजनांसाठीही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.१ मे पासून सुरू होणाऱ्या या अभिनव योजनेचा लाभ जिल्ह्यातील ४३,८११ दूरध्वनी ग्राहक तर ७८४४ वायरलेस सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी दूरध्वनी सेवेचे भाडे १२० होते ते आता १४० रूपये होणार आहे. शहरी भागात १४० होते ते आता १६० रूपये होणार आहे.‘वन इंडिया’ योजनेचा लाभ घेणाऱ्यांना १९५ रूपयांऐवजी केवळ २२० रूपये द्यावे लागणार आहेत. या अल्प वाढीत रात्री ९ ते सकाळी ७ दहा तास मोफत संभाषणाचा लाभ मिळणार आहे. (प्रतिनिधी)बदलाचा स्वीकार करायला हवा...ग्राहकांचे बीएसएनएलशी अतूट नाते आहे. दूरध्वनी सेवेला फार वर्षांची परंपरा आहे. दूरध्वनीपासून दूर जाणाऱ्या ग्राहकांना पुन्हा या उपयुक्त सेवेकडे वळविण्यासाठी बीएसएनएल कंपनीने ही योजना नव्याने लागू केली आहे. लोक सेवेचा वापर अधिक करीत असल्याने ही योजना नक्कीच यशस्वी होईल.- सुहास कांबळे, महाव्यवस्थापक, बीएसएनएल, रत्नागिरी.