शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

अमर्याद मोफत संभाषण

By admin | Updated: April 18, 2015 00:10 IST

बीएसएनएलचा उपक्रम : महाराष्ट्रदिनी होणार सुरूवात

रत्नागिरी : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने आपल्या दूरध्वनी ग्राहकांसाठी एक अनोखी योजना जाहीर केली असून रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत अगदी मोफत संभाषण करायला मिळणार आहे. तेही अगदी कुठल्याही कंपनीच्या दूरध्वनीसेवेसह अगदी भ्रमणध्वनी सेवेसाठीही योजना लागू होणार आहे. एक मे पासून देशभर ही योजना कार्यान्वित होणार आहे. जिल्ह्यातील ४३,८११ दूरध्वनीग्राहक तर ७८४४ वायरलेस सेवा असलेल्या ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. भ्रमणध्वनी सेवा सुरू झाल्यानंतर ग्राहकांनी दूरध्वनी सेवेकडे पाठ फिरवली. दूरध्वनीचा वापर केवळ ब्रॉडबँडसेवेकरिताच होऊ लागला होता. मात्र, भ्रमणध्वनीसेवेचा वापर अधिकाधिक होऊ लागला. अधिकाधिक प्रगत झालेल्या तंत्रज्ञानाने भ्रमणध्वनी सेवेबरोबरच इंटरनेटचीही सुविधा यावर उपलब्ध करून दिली. त्यामुळे मग ब्रॉडबँड सेवाही मागे पडू लागली. आता तर दूरध्वनी सेवा बंद पडते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी ४६,७०० इतकी असलेली दूरध्वनींची संख्या वर्षभरात पुन्हा खाली आली असून आता ४३,८०० झाली आहे. त्यामुळे या सेवेकडे ग्राहकांनी पुन्हा वळावे, यासाठी बीएसएनएलने ही नवी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.आज स्मार्ट फोन घराघरात नव्हे तर एकाकडेच एकापेक्षा जास्त फोन आलेत. त्यामुळे आता घरबसल्या मोबाईलवर हव्या त्या सेवा मिळू शकतात. काही अंशी त्याचा परिणाम दूरध्वनी सेवेवर झाला असला तरी घरातील ज्येष्ठांसाठी अजूनही कुठेतरी मजबूत असे जुने दूरध्वनी सेवेचे यंत्र वाजत असलेले दिसते.अजुनही ग्रामीण भागातील दूरध्वनी सेवा तग धरून आहे. शहरापेक्षा अधिक संख्या ग्रामीण भागात असून २६,३०० ग्राहक ग्रामीण भागातच आहेत. त्यामुळे सर्वच दृष्टीने चांगली असलेली ही सेवा कालबाह्य न होता ग्राहकांनी ती सुरू ठेवावी, यासाठी बीएसएनएल कंपनीने १ मेपासून रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत दूरध्वनीसेवा मोफत केली आहे. यासाठी कॉल दरात कुठलीही वाढ न करता केवळ मासिक दरात किरकोळ २० रूपयांची वाढ करून ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात वन इंडिया, सुलभ योजनांसाठीही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.१ मे पासून सुरू होणाऱ्या या अभिनव योजनेचा लाभ जिल्ह्यातील ४३,८११ दूरध्वनी ग्राहक तर ७८४४ वायरलेस सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी दूरध्वनी सेवेचे भाडे १२० होते ते आता १४० रूपये होणार आहे. शहरी भागात १४० होते ते आता १६० रूपये होणार आहे.‘वन इंडिया’ योजनेचा लाभ घेणाऱ्यांना १९५ रूपयांऐवजी केवळ २२० रूपये द्यावे लागणार आहेत. या अल्प वाढीत रात्री ९ ते सकाळी ७ दहा तास मोफत संभाषणाचा लाभ मिळणार आहे. (प्रतिनिधी)बदलाचा स्वीकार करायला हवा...ग्राहकांचे बीएसएनएलशी अतूट नाते आहे. दूरध्वनी सेवेला फार वर्षांची परंपरा आहे. दूरध्वनीपासून दूर जाणाऱ्या ग्राहकांना पुन्हा या उपयुक्त सेवेकडे वळविण्यासाठी बीएसएनएल कंपनीने ही योजना नव्याने लागू केली आहे. लोक सेवेचा वापर अधिक करीत असल्याने ही योजना नक्कीच यशस्वी होईल.- सुहास कांबळे, महाव्यवस्थापक, बीएसएनएल, रत्नागिरी.