शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पण... अज्ञात कवीसुद्धा

By admin | Updated: August 21, 2016 02:16 IST

स्वातंत्र्य दिन ही गोष्ट वर्षातून एकदाच साजरा करण्याची गोष्ट आहे का? स्वातंत्र्य ही गोष्ट इतकी बहुमोल आहे की, त्याचे महत्त्व आणि त्यासाठी ज्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला, त्यांचे

- रविप्रकाश कुलकर्णी

स्वातंत्र्य दिन ही गोष्ट वर्षातून एकदाच साजरा करण्याची गोष्ट आहे का? स्वातंत्र्य ही गोष्ट इतकी बहुमोल आहे की, त्याचे महत्त्व आणि त्यासाठी ज्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला, त्यांचे स्मरण म्हणून १५ आॅगस्टचे स्मरण ही एक प्रतिनिधिक गोष्ट आहे. वास्तविक, ही गोष्ट सदैव स्मरणात राहायला पाहिजे. मी हे सगळे १५आॅगस्ट सोहळा होऊन गेल्यानंतरही का सांगतो आहे, याचे कारणही तसेच आहे.शक्यतो, १५ आॅगस्ट रोजी झेंडावंदनासाठी मी सार्वजनिक ठिकाणी जातो. शक्य असेल तर शाळेतच जातो. यंदाही तसाच गेलो. त्या निमित्ताने काही गोष्टी शेअर कराव्याशा वाटत आहेत. आधी ‘जण गण मण’ संबंधात पाहू या रवींद्रनाथ टागोर यांनी जेव्हा ‘जण गण मन’ लिहिले, तेव्हा हिंदुस्थान अखंड एक होता, म्हणून त्यांनी ‘पंजाब, सिंध, गुजरात, मराठा’ असे लिहिले हे खरेच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. या देशाचे दोन तुकडे झाले. हिंदुस्थान-पाकिस्तान हे दोन देश स्वतंत्र्य अस्तित्वात आले. हिंदुस्थान म्हटल्यावर कुणाला जातीय वास येत असेल, तर ‘भारत’ म्हणू या त्याला हरकत असायचे कारण नाही. आपला एके काळचा सिंध प्रांत पाकिस्तानात गेला, ही गोष्ट पूर्ण विचारांती प्रांत आहे. अशा वेळी भारताच्या राष्ट्रगीतात म्हणजे ‘जन गण मन’मध्ये पंजाबनंतर सिंध जरी येत असले, तरी जो प्रांत आपला नाही, तो आपला म्हणून उच्चार कसा करता येईल? म्हणून रवींद्रनाथांच्या गीतात ते जेव्हा राष्ट्रगीत म्हणून ठरवले गेले, तेव्हा सिंधच्या जागी सिंधू हा बदल करण्यात आला. बहुमताने तो मान्य करण्यात आला, पण अजूनही पाहा सिंधूच्या ऐवजी सिंधच ऐकू येते! हे मान्य आहे की, अजूनही सिंधमध्ये आमचा जीव अडकलेला असू शकतो. त्या मनाचा आदरदेखील करावा, पण लोकशाही पद्धतीने सिंधऐवजी सिंधू हे स्वीकारले गेले आहे, ते तसेच म्हणायला हवे की नाही? तरच राष्ट्रगीताचा मान सांभाळला जाईल ना? म्हणून शाळा-कॉलेजमधल्या म्हटले जाणाऱ्या आपल्या राष्ट्रगीतासंबंधात पुन्हा एकदा आवर्जून सांगावसे वाटते की, सिंधऐवजी सिंधू म्हणा! तसेच ठसवले गेले, तर ही पुढच्या पिढीला हा वारसा हस्तांतरित करतील. सिंधची आठवण काढून आता काय साधणार आहोत? दुसरी गोष्ट, राष्ट्रगीत म्हणताना आम्ही सगळे एकाच पद्धतीने ध्वज वंदनासाठी उभे राहायला हवे की नाही? कुणी हात पुढे बांधून उभे, कुणी हात पुढे ठेवून, कुणी छातीच्या पुढे आडवा हात ठेवून... हे असे असता, ‘आम्ही सारे एक’ कसे काय होऊ शकते? म्हणून म्हणतो, राष्ट्रगीताच्या वेळी कसे उभे राहायचे हे एकदा निश्चित करू या, त्यात एकवाक्यता यायला हवी. एवढेच काय, ही गोष्ट फक्त १५ आॅगस्टपुरतीच नाही, कायमची आहे. म्हणून त्याची पुन्हा एकदा जाहीर वाच्यता.अनाम लेखक सापडलास्वातंत्र्य युद्धातल्या अनेक वीरांची नावे इतिहासाला माहीतच नाहीत. मग त्यांच्या कर्तृत्वाच्या गाथा कळणे दूरच राहिले. या वेळच्या स्वातंत्र्य दिनाला एक नवीनच ग्रंथ हातात आला. तो आहे साहेबराव ठाणगे संपादित ‘स्वातंत्र्य योद्धा हिंदुराव आप्पा-गाथा आणि गीते’ आता हिंदुराव आप्पा म्हणजे बेचाळीसच्या चळवळीत ज्यांनी वसंतदादा पाटील यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढाईत साथ दिली. एवढेच नव्हे, तर सांगळेच्या तुरुंगातून सफाईने पलायन करून क्रांतीची ज्योत तेवती ठेवली, असे आप्पा पाटील येडेनिपाणीचे पाटील! खरे तर येडेनिपाणीचे पाटील म्हटले की, पी. सावळारामच आठवतात, त्यांची ‘जेथे सागरा धरणी मिळते, तेथे तुझी मी वाट पहाते’, ‘गंगा यमुना डोक्यात उभ्या का’ अशी एकापेक्षा एक गीते आठवतात, पण सावळारामाचे धाकटे भाऊ म्हणजे हिंदुराव आप्पा हे ठाऊक होते. आप्पांना तसे दीर्घायुष्य लाभले. (जन्म १३ नोव्हे. १९१७, मृत्यू ३ सप्टेंबर १९९३) स्वातंत्र्याचे गोड फळ चाखले, तो सगळा इतिहास सगळ्यांनाच ठाऊक आहे, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आप्पाराव तुरुंगात असताना, त्याच्या प्रतिमेला काव्यझरा फुटला आणि त्यांनी विविध विषयांवर लिहिलेले लेखन ते बाड अंधारातच राहिले. पण आता इतक्या वर्षांनंतर त्यांच्या मुलाने अशोक पाटील यांनी हे सगळे बाड साहेबराव ठाणगेंकडे सुपुर्द केले. त्यांनी कवी हृदयानेच त्याचे संपादन केले आणि हा ठेवा आता रसिकजनांसाठी उपलब्ध झाला आहे. क्रांतीचा घेऊन झेंडा। फिरवूया नवखंडाघेऊनिया हाती दंडा ।मारू आपण शत्रूणी खरोखर रे ।। असे लिहिणारे हिंदुराव आप्पा.हलके हलके हलके बोला । पाळण्यात हा बाळ झोपला परसामधल्या केळफुलावर । चिवचिव करती चिऊ पाखरेउढूनी जावा या उठल्यावर । बाळसंगे खेळायाला ।।असे जेव्हा नाजूकपणे लिहितात, तेव्हा स्तिमित व्हायला होते ..... प्रस्तुत संग्रहाला प्रा.अशोक बागवे यांची प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावनेत त्यांनी हिंदुरावांच्या कवितांचा समग्र आढावा घेऊन, त्यांचे कवी म्हणून स्थान अधोरेखित केल आहे. हा सगळा ऐवज पाहताना वाटते, त्याचा कवित्वाचा झरा पुढे कसा बहरला असेल?कुणी सांगावे अशोक पाटील यांना, अजून पडताळाची पडताळणी केली, तर आणखीही काही सापडेल!