शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

मुंबई विद्यापीठाकडून पुन्हा एकदा 'तारीख पे तारीख'; निकालासाठी 19 सप्टेंबरचा नवा वायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 16:56 IST

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देमुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. विद्यापीठाने दिलेल्या सगळ्या तारखा उलटूनही अजून बऱ्याचं विभागांचे निकाल न लागल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.मुंबई विद्यापीठाकडून आता निकालासाठी एका नव्या तारखेचा वायदा करण्यात आला आहे.

मुंबई, दि. 6- मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. विद्यापीठाने दिलेल्या सगळ्या तारखा उलटूनही अजून बऱ्याचं विभागांचे निकाल न लागल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. अशातच मुंबई विद्यापीठाकडून आता निकालासाठी एका नव्या तारखेचा वायदा करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाने निकालासाठी 19 सप्टेंबर ही नवी तारीख दिली आहे. गणेशोत्सव, ईदमुळे निकालासाठी उशिर झाल्याचा अजब दावा मुंबई विद्यापीठाने बुधवारी मुंबई हायकोर्टात केला आहे. दरम्यान, निकालाची डेडलाईन लेखी स्वरूपात देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने विद्यापीठाला दिले आहेत. विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या या नव्या तारखेमुळे निकालासाठी विद्यार्थ्यांना आता 19 सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

मुंबई विद्यापीठात अजूनही उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झालेली नाही. विद्यापीठाला अजूनही १४ निकाल जाहीर करायचे आहेत. ४७७ निकालांपैकी विद्यापीठाने आतापर्यंत ४६३ निकाल जाहीर केले आहेत. पण या निकालांमध्ये गोंधळ झाले आहेत. अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत, काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. तसंच वाणिज्य शाखेचा निकाल लागल्यानंतर मोठा गोंधळ झाला होता. संकेतस्थळ बंद पडल्याने अनेक विद्यार्थी त्रस्त झाले होते. 

उत्तरपत्रिकांची तपासणी संपणार कधी? विद्यार्थ्यांचे निकालाकडे लागले डोळेमुंबई विद्यापीठाच्या निकाल प्रक्रियेला अजूनही वेग प्राप्त झालेला नाही. सप्टेंबर महिना उजाडूनही तब्बल ५० हजार उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे, तर अजूनही विद्यापीठाला २० हून अधिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करायचे आहेत. त्यामुळे आता उत्तरपत्रिकांची तपासणी विद्यापीठ कधी पूर्ण करणार, असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत.निकालाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर, निकाल जाहीर करता येतो, पण इथे अद्याप उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण होत नसल्याने, उर्वरित निकाल विद्यापीठ कधी जाहीर करणार? याकडे विद्यार्थ्यांचे डोळे लागून राहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा मे महिन्यात झाल्या. परीक्षा संपून तीन महिने संपूनही निकाल न लागल्याने, विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.

तक्रारींचे निवारण ऑनलाइन, विद्यार्थ्यांसाठी नवीन संकेतस्थळ सुरूऑनलाइन तपासणीमुळे लागलेल्या निकालात गोंधळ झाला आहे. या विद्यार्थ्यांच्या शंकांचं निराकरण आता मुंबई विद्यापीठ ऑनलाइन पद्धतीनेच करणार आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारी निवारणासाठी विद्यापीठाने नवीन संकेतस्थळ सुरू केली आहेत. मुंबई विद्यापीठात अजूनही उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झालेली नाही. विद्यापीठाला अजूनही १४ निकाल जाहीर करायचे आहेत. ४७७ निकालांपैकी विद्यापीठाने आतापर्यंत ४६३ निकाल जाहीर केले आहेत. पण या निकालांमध्ये गोंधळ झाले आहेत. अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत, काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अथवा नोकरीसाठी योग्य निकाल मिळावा म्हणून विद्यार्थी कालिना कॅम्पसमधील परीक्षा भवनाच्या पायऱ्या झिजवत आहेत. विद्यार्थ्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून विद्यापीठाने नवीन संकेतस्थळ सुरू केले आहे.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठ